शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

महापूर लवकर ओसरला; ऊस नुकसानाने शेतकरी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST

सरदार चौगुले, लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : कमी वेळेत जादा पाऊस लागल्याने जिल्ह्यातील नद्यांनी महापुराची परिसीमा गाठली ...

सरदार चौगुले,

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : कमी वेळेत जादा पाऊस लागल्याने जिल्ह्यातील नद्यांनी महापुराची परिसीमा गाठली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा आलेल्या महापुराने माती मिश्रित गाळयुक्त वाहून आणलेले पाणी बुडालेल्या पिकांना बाधित ठरल्याने नुकसानाचा टक्का वाढला आहे. महापूर लवकर ओसरला असला तरी गाळयुक्त माती पिकांच्या शेंड्यात आणि पानावर साचून राहिल्याने हळूहळू नुकसानाची तीव्रता गडद होताना दिसत आहे. ऊस पिकावर आर्थिक घडी बसवणारा शेतकरी गाळयुक्त महाराष्ट्र पुराच्या धोक्याने आर्थिकदृष्ट्या चांगला घसरला आहे.

आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पूर ओसरण्यासाठी केलेला प्रयत्न सकारात्मक असला तरी पीक नुकसानाचे चित्र भयावह आहे. पुराच्या पाण्यात कुजलेल्या उसाची उन्हाच्या तीव्रतेने खोडवी होते. नदीकाठच्या पिकांचा नुकसानाने रंग बदलेला असतानासुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आणि सवलतीच्या योजनांसाठी झगडावे लागते. हीच बळीराजाच्या वाट्याला आलेली मोठी शोकांतिका आहे.

प्रत्येक पावसाळ्यात जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात नदीला एक-दोन पूर येऊन जात असल्याचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. पहिल्या पुरादरम्यान वाहून आलेली माती मिश्रीत गाळ पाण्याच्या प्रवाहात निघून गेल्यामुळे त्यानंतर येणाऱ्या मोठ्या पुरात पिकांची हानी होत नाही. त्यामुळे पीक नुकसानाचे प्रमाण कमी असते; परंतु यंदा सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे लहानसहान येणारे पूर आले नाही, त्यामुळे माती मिश्रीत गाळ आणि केपटा वाहून गेला नाही. अतिवृष्टी आणि कमी वेळेत जादा पाऊस लागल्यामुळे नद्यांचे पाणी झपाट्याने वाढले. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे डोंगरमाथ्यावरील माती वाहून आल्यामुळे, माती मिश्रीत गाळाचे प्रमाण वाढले. बुड क्षेत्रात सर्वत्र गाळयुक्त पाणी पसरल्याने पूर ओसरेल तसा गाळ उसाच्या शेंड्यात आणि पानावर साचून राहिला. परिणामी, ऊसाचा शेंडा कुजला आहे, तर पाने करपून गेली आहेत. याचा उसाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात कमालीची घट होणार आहे. काबाडकष्ट आणि भरमसाठ उत्पादन खर्च करून वाढविलेले ऊस पीक महापुराच्या संकटाने वाया गेल्याने त्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या आकडेवारी आणि तारखेकडे लक्ष लावून आहे.

प्रतिक्रिया

प्रत्येक वर्षी मोठ्या पुराच्या अगोदर लहानसहान एक-दोन पूर आल्यामुळे नदीकाठचे कमी क्षेत्र पाण्याखाली जाते, त्यामुळे नुकसानाचे प्रमाण कमी असते. यावर्षीची परिस्थिती गंभीर होती. पहिलाच माती मिश्रीत गाळयुक्त महापूर आल्याने ऊस पिकासाठी बाधिकार ठरला आहे.

पूर लवकर ओसरूनही २०१९ पेक्षा नुकसानाचा टक्का जादा आहे. त्यामुळे शासनाने १०० टक्के नुकसान गृहित धरून नुकसान भरपाई त्वरित द्यावी.

रामराव चेचर, पन्हाळा तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

चौकट

पूर बाधित क्षेत्रात माती मिश्रीत गाळ ऊसाच्या शेंडा गेल्याने तो कुजून बाहेर पडतो. पानावर गाळ साचल्याने अन्नद्रव्य निर्मितीसाठी उपयुक्त असलेली सूर्य संश्लेषण प्रक्रिया थांबते. परिणामी,उसाची वाढ थांबते. शेंडा कुजल्यामुळे खालच्या उसाला फुटवे सुटतात. सुटलेले फुटवे उसातील अन्न रस शोषून घेतल्यामुळे जिवंत असलेला उसाचा बुडका पोकळ होतो. त्याचा परिणाम उसाच्या वाढीवर झाल्याने उत्पादनात कमालीची घट येते.