शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

महापूर लवकर ओसरला; ऊस नुकसानाने शेतकरी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST

सरदार चौगुले, लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : कमी वेळेत जादा पाऊस लागल्याने जिल्ह्यातील नद्यांनी महापुराची परिसीमा गाठली ...

सरदार चौगुले,

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : कमी वेळेत जादा पाऊस लागल्याने जिल्ह्यातील नद्यांनी महापुराची परिसीमा गाठली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा आलेल्या महापुराने माती मिश्रित गाळयुक्त वाहून आणलेले पाणी बुडालेल्या पिकांना बाधित ठरल्याने नुकसानाचा टक्का वाढला आहे. महापूर लवकर ओसरला असला तरी गाळयुक्त माती पिकांच्या शेंड्यात आणि पानावर साचून राहिल्याने हळूहळू नुकसानाची तीव्रता गडद होताना दिसत आहे. ऊस पिकावर आर्थिक घडी बसवणारा शेतकरी गाळयुक्त महाराष्ट्र पुराच्या धोक्याने आर्थिकदृष्ट्या चांगला घसरला आहे.

आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पूर ओसरण्यासाठी केलेला प्रयत्न सकारात्मक असला तरी पीक नुकसानाचे चित्र भयावह आहे. पुराच्या पाण्यात कुजलेल्या उसाची उन्हाच्या तीव्रतेने खोडवी होते. नदीकाठच्या पिकांचा नुकसानाने रंग बदलेला असतानासुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आणि सवलतीच्या योजनांसाठी झगडावे लागते. हीच बळीराजाच्या वाट्याला आलेली मोठी शोकांतिका आहे.

प्रत्येक पावसाळ्यात जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात नदीला एक-दोन पूर येऊन जात असल्याचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. पहिल्या पुरादरम्यान वाहून आलेली माती मिश्रीत गाळ पाण्याच्या प्रवाहात निघून गेल्यामुळे त्यानंतर येणाऱ्या मोठ्या पुरात पिकांची हानी होत नाही. त्यामुळे पीक नुकसानाचे प्रमाण कमी असते; परंतु यंदा सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे लहानसहान येणारे पूर आले नाही, त्यामुळे माती मिश्रीत गाळ आणि केपटा वाहून गेला नाही. अतिवृष्टी आणि कमी वेळेत जादा पाऊस लागल्यामुळे नद्यांचे पाणी झपाट्याने वाढले. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे डोंगरमाथ्यावरील माती वाहून आल्यामुळे, माती मिश्रीत गाळाचे प्रमाण वाढले. बुड क्षेत्रात सर्वत्र गाळयुक्त पाणी पसरल्याने पूर ओसरेल तसा गाळ उसाच्या शेंड्यात आणि पानावर साचून राहिला. परिणामी, ऊसाचा शेंडा कुजला आहे, तर पाने करपून गेली आहेत. याचा उसाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात कमालीची घट होणार आहे. काबाडकष्ट आणि भरमसाठ उत्पादन खर्च करून वाढविलेले ऊस पीक महापुराच्या संकटाने वाया गेल्याने त्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या आकडेवारी आणि तारखेकडे लक्ष लावून आहे.

प्रतिक्रिया

प्रत्येक वर्षी मोठ्या पुराच्या अगोदर लहानसहान एक-दोन पूर आल्यामुळे नदीकाठचे कमी क्षेत्र पाण्याखाली जाते, त्यामुळे नुकसानाचे प्रमाण कमी असते. यावर्षीची परिस्थिती गंभीर होती. पहिलाच माती मिश्रीत गाळयुक्त महापूर आल्याने ऊस पिकासाठी बाधिकार ठरला आहे.

पूर लवकर ओसरूनही २०१९ पेक्षा नुकसानाचा टक्का जादा आहे. त्यामुळे शासनाने १०० टक्के नुकसान गृहित धरून नुकसान भरपाई त्वरित द्यावी.

रामराव चेचर, पन्हाळा तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

चौकट

पूर बाधित क्षेत्रात माती मिश्रीत गाळ ऊसाच्या शेंडा गेल्याने तो कुजून बाहेर पडतो. पानावर गाळ साचल्याने अन्नद्रव्य निर्मितीसाठी उपयुक्त असलेली सूर्य संश्लेषण प्रक्रिया थांबते. परिणामी,उसाची वाढ थांबते. शेंडा कुजल्यामुळे खालच्या उसाला फुटवे सुटतात. सुटलेले फुटवे उसातील अन्न रस शोषून घेतल्यामुळे जिवंत असलेला उसाचा बुडका पोकळ होतो. त्याचा परिणाम उसाच्या वाढीवर झाल्याने उत्पादनात कमालीची घट येते.