शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

बळिराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST

कोल्हापूर : देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होऊन शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा ...

कोल्हापूर : देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होऊन शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा हत्तींचे बळ मिळाले आहे. यामुळे बळिराजाचा झेंडा केंद्र सरकारच्या छाताडावर ठेवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हापुरातील बिंदू चौक येथे पिठलं-भाकरी व सत्याग्रह आंदोलन केले.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना रस्त्यावर यावे लागते हे दुर्दैवी आहे. सर्व पिकांना हमीभाव निश्चित झाला पाहिजे. माजी आमदार संपतराव पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, बाबा पार्टे, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, संदीप देसाई, बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, नामदेव गावडे, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, आदील फरास, प्रकाश गवंडी, सचिन पाटील, तौफीक मुल्लाणी, सुनील पाटील, श्रावण फडतारे, आदी उपस्थित होते.

चौकट

ढेकणे झाली म्हणून घर जाळू नका

व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी प्रथम बाजार समिती आणल्या. कमी उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांचा माल बहुराष्ट्रीय कंपनी खरेदी करणार नसल्याने बाजार समित्यांशिवाय पर्याय नाही. ढेकणे झाली म्हणून कोणी घर जाळत नाही, तर ढेकणाचा बंदोबस्त करणे हाच मार्ग असल्याचे शेट्टी यांनी सुनावले.

चंद्रकांत पाटील यांना बिंदू चौकात येण्याचे खुले आव्हान

चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदा कायदा वाचावा आणि मग चर्चेसाठी त्यांनी बिंदू चौकात यावे. ज्यांच्या नखाला माती लागली नाही, बांधावर कधी गेले नाहीत, त्यांनी शेतकरीहिताचे बोलू नये, असा टोला शेट्टी यांनी हाणला.

विनोद...