शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाच हजारजणांनी केला सूर्यनमस्कार

By admin | Updated: February 22, 2015 01:04 IST

जयसिंगपुरात आयोजन : सूर्यनमस्कार, प्रज्ञासंवर्धन महाकुंभची सांगता

जयसिंगपूर : गीता परिवार व कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने येथील जयसिंगपूर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित सूर्यनमस्कार व प्रज्ञासंवर्धन महाकुंभात शनिवारी पाच हजारजणांनी सहभाग घेतला. सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. या उपक्रमास शिरोळ तालुक्यातील ६१ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. सूर्यनमस्कार हा उपक्रम निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. बुद्धीचा विकास, कार्य याला चालना देणारा गीता परिवाराचा जयसिंगपूर- मधून सुरू झालेला हा प्रयोग भारतभर पोहोचेल, असा विश्वास मालपाणी यांनी व्यक्त केला. केंद्र शासनाकडे या उपक्रमाबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोल्हापूर माध्यमिक शिक्षक विभागाचे उपसंचालक एम. के. गोंधळी म्हणाले, गीता परिवार हे संस्काराचे केंद्र आहे. सूर्यनमस्कारातून होणारी मनाची एकाग्रता ही काळाची गरज असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला निश्चितच चालना शिक्षण मिळणार आहे. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आबासाहेब सूर्यवंशी यांनी स्वागत केले. गीता परिवाराच्या अध्यक्षा प्रमिला माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी नगराध्यक्षा सुनीता खामकर, माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, विनोद घोडावत, राजकुमार पाटील, पद्माकर पाटील, शैलेश सूर्यवंशी, डॉ. शिरीष रणभिसे, दीपक बियाणी, अशोक सारडा, आबासाहेब सूर्यवंशी, बी. बी. गुरव, मनीषा पाटील, कांतीलाल मालू, एस. आर. कळसापनावर, आदी उपस्थित होते. स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पाटील यांनी आभार मानले. उपक्रमात सहभागी शाळांना व शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.