शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पाच हजारजणांनी केला सूर्यनमस्कार

By admin | Updated: February 22, 2015 01:04 IST

जयसिंगपुरात आयोजन : सूर्यनमस्कार, प्रज्ञासंवर्धन महाकुंभची सांगता

जयसिंगपूर : गीता परिवार व कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने येथील जयसिंगपूर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित सूर्यनमस्कार व प्रज्ञासंवर्धन महाकुंभात शनिवारी पाच हजारजणांनी सहभाग घेतला. सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. या उपक्रमास शिरोळ तालुक्यातील ६१ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. सूर्यनमस्कार हा उपक्रम निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. बुद्धीचा विकास, कार्य याला चालना देणारा गीता परिवाराचा जयसिंगपूर- मधून सुरू झालेला हा प्रयोग भारतभर पोहोचेल, असा विश्वास मालपाणी यांनी व्यक्त केला. केंद्र शासनाकडे या उपक्रमाबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोल्हापूर माध्यमिक शिक्षक विभागाचे उपसंचालक एम. के. गोंधळी म्हणाले, गीता परिवार हे संस्काराचे केंद्र आहे. सूर्यनमस्कारातून होणारी मनाची एकाग्रता ही काळाची गरज असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला निश्चितच चालना शिक्षण मिळणार आहे. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आबासाहेब सूर्यवंशी यांनी स्वागत केले. गीता परिवाराच्या अध्यक्षा प्रमिला माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी नगराध्यक्षा सुनीता खामकर, माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, विनोद घोडावत, राजकुमार पाटील, पद्माकर पाटील, शैलेश सूर्यवंशी, डॉ. शिरीष रणभिसे, दीपक बियाणी, अशोक सारडा, आबासाहेब सूर्यवंशी, बी. बी. गुरव, मनीषा पाटील, कांतीलाल मालू, एस. आर. कळसापनावर, आदी उपस्थित होते. स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पाटील यांनी आभार मानले. उपक्रमात सहभागी शाळांना व शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.