शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पहिली उचल २५००च

By admin | Updated: October 31, 2016 00:24 IST

ऊसदराचा प्रश्न : एफआरपी एकरकमी देऊ; रुपयाही जादा देता येणार नाही; साखर कारखानदारांच्या भूमिकेमुळे बैठक निष्फळ; उद्या पुन्हा चर्चा

कोल्हापूर : जिल्ह्यातील उसाची सरासरी एफआरपी प्रती टन २५०० रुपये येते. ही एफआरपी एकरकमी देऊ त्यापेक्षा एक रुपयाही जादा देता येत नाही, अशी स्पष्ट भूमिका साखर कारखानदारांनी घेतल्याने शेतकरी संघटना, साखर कारखानदार व प्रशासन यांच्यात रविवारी झालेल्या बैठकीत ऊस दराची कोंडी फुटू शकली नाही. तब्बल दोन तास चर्चा होऊन ठोस निर्णय होऊ न शकल्याने ही बैठक निष्फळ ठरली. शेतकरी संघटना व कारखानदार आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत उद्या, मंगळवारी पुन्हा बैठक बोलावली आहे. पहिल्या उचलीबाबत रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रतिनिधींच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी अमित सैनी, प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सतेज पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, ‘जवाहर’चे अध्यक्ष प्रकाश आवाडे, ‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘शाहू’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, जिल्हा उपनिबंधक तथा ‘बिद्री’चे प्रशासक अरुण काकडे, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, पी. जी. मेढे, विजय औताडे आदी उपस्थित होते. सरकार सकारात्मक असल्याने कोंडी फुटेल : सदाभाऊ खोत मागील सरकार व कारखानदार एकच असल्याने चर्चेला कोणच पुढे येत नव्हते. किमान या दोन वर्षांत सरकार चर्चा तर घडवून आणते. कारखानदारी टिकली पाहिजे, याविषयी आमचे दुमत नाही, पण शेतकऱ्यांना दरही मिळाला पाहिजे. शेवटी हा प्रश्न चर्चेने सोडवायचा आहे, दोन्हींकडून चर्चेची दारे खुली असल्याने ५ नोव्हेंबरपूर्वी प्रश्न सुटून दराची कोंडी फुटेल, असा विश्वास राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. कायदा गेल्यावर्षी कुठे गेला होता : शेट्टी यावर्षी एकरकमी ‘एफआरपी’ व ‘७० : ३०’च्या कायद्याची भाषा करणाऱ्या कारखानदारांना गेल्यावर्षी कायदा कुठे गेला होता? असा सवाल करत पहिल्या उचलीबाबत आम्ही लवचिक असलो तरी एकदम खाली येणार नाही, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. मार्च २०१६ नंतर साखरेचे वाढलेल्या दरातून कारखान्यांकडे शिल्लक असलेले पैसे, सध्याचा भाव पाहूनच आम्ही ३२०० रुपयांचे गणित मांडले आहे. केंद्राने आयात शुल्क वाढविल्याने आयात होणार नाही, त्यात यंदा साखरेचे अतिरिक्त उत्पादन होणार नसल्याने दर चांगले राहणार आहेत. राज्य बँकेने मूल्यांकनाच्या ९० टक्के रक्कम दिली तर सध्याच्या उचलीत १६० रुपये जादा वाढणार आहेत. त्यामुळे ‘एफआरपी’पेक्षा जास्त रक्कम देणे सहज शक्य आहे. परिस्थिती बघून आम्ही लवचिकता स्वीकारण्यास तयार आहे, पण एकदमच खाली येणार नाही, सामोपचाराने निर्णय घ्यावा. एकरकमी ‘एफआरपी’ तर कायदाच आहे, त्यात कारखानदारांनी वेगळे काय केले? असेही शेट्टी यांनी सांगितले. ऊसदराचा कायदा असताना दरवर्षी आंदोलन कशासाठी : मुश्रीफ कायद्याने ऊस दर देणे बंधनकारक असताना दरवर्षी आंदोलने कशासाठी, असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळाला पाहिजे, यासाठी कारखानदारांचा प्रयत्न आहे. यावर्षी एकरकमी एफआरपी देणार असल्याने गतवर्षी किमान पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या हातात जादा मिळणार आहेत. सध्याचे साखरेचे दर, कर्जाचे हप्ते पाहता, ‘एफआरपी’पेक्षा जास्त पैसे देणे शक्य नाही; पण आगामीकाळात दर चांगला राहिला तर जादा देण्यास आमची हरकत नाही शिवाय ‘७० : ३०’ फॉर्मुल्यानुसार बसत असेल तर जादा पैसे द्यावेच लागतील. ‘एफआरपी’चा कायदा आपणच केला, असे शेट्टी म्हणतात, त्याप्रमाणे दर देत असताना पुन्हा आंदोलन कशासाठी करत आहेत. सरकारने आमच्याबरोबर चर्चा करताना पाचशे रुपये टनाला मदत करावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली. उचलीबाबत उत्सुकता! हंगाम तोंडावर आल्याने उचलीबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे. रविवारी पहिल्या उचलीचा आकडा काय फुटतो, याविषयी कमालीची उत्सुकता होतील, याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे विचारणा होत होती. कारखानदारांशी स्वतंत्र चर्चा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरुवातीला कारखानदार व संघटना प्रतिनिधींच्यासोबत एकत्रित चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कारखानदारांशी स्वतंत्र चर्चा करून कितीपर्यंत उचल देता येते, याचा अंदाज घेतला. विनय कोरेंची बैठकीकडे पाठ ‘स्वाभिमानी’चा आकडा फुटण्यापूर्वीच वारणा कारखान्याने आपला हंगाम सुरू केल्याने संघटना कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीत विनय कोरे येणार का? ते नेमकी काय भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता होती, त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली नंतर बैठकीतील माहिती फोनद्वारे घेतली. कारखानदारांनी रिस्क घ्यावी गेल्या हंगामात साखरेचे दर कमी होते, त्यावेळी ‘एफआरपी’ देताना रिस्क घेऊन पैसे उभे केले. उत्तर प्रदेशमध्ये ऊस उत्पादन अधिक आहे, त्यात तिथे निवडणुका असल्याने यंदा साखरेचे दर चांगले राहणार आहेत. त्यामुळे ‘एफआरपी’ सोडून द्याव्या लागणाऱ्या रकमेसाठी