शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

शेतकरी अपघात विमा भरपाई दुप्पट

By admin | Updated: November 30, 2015 01:06 IST

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : १ डिसेंबरपासून योजनेसाठी लाभार्थी पात्र

प्रकाश पाटील -- कोपार्डे -शेतकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या शेतकरी विमा योजनेच्या भरपाईची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) याबाबतची घोषणा करण्यात आली असून अपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी आता एक लाख रुपये मिळणारी भरपाई दुप्पट करण्यात आली असून त्याची रक्कम दोन लाख करण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने वार्षिक २७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात सन २००४ पासून शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. सन २०१०-११ ला या योजनेचे नामकरण शेतकरी जनता अपघात विमा योजना करण्यात आले. या योजनेत १० ते ७५ वयोगटातील खातेदार शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी एक लाख रूपये भरपाई देण्यात येत होती. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भरपाईमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता अपघाती मृत्यू झाल्यास आणि कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये विमा संरक्षण त्या शेतकऱ्याला मिळणार आहे, तर ५० टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये भरपाई शेतकरी अपघात विम्यापोटी मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेतून राष्ट्रीय विमा कंपनीची (नॅशनल इन्शुरन्स कंपनी) निवड करण्यात आली आहे. राज्य सरकार प्रत्येक खातेदार शेतकऱ्याच्या पोटी १९ रुपये खर्च करणार आहे. राज्यभरातील १ कोटी ३७ लाख खातेधारक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यभरातील सर्व खातेधारक शेतकऱ्यांचा एकरकमी विमा हप्ता भरण्यासाठी राज्य सरकार २७ कोटी रुपये खर्च करणार आहे. शेती करताना अपघाती मृत्यू होणे, कायमचे अथवा काहीअंशी अपंगत्व येणे, वीज पडून मृत्यू होणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धक्का बसून मृत्यू आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे झालेल्या अपघातात अपंगत्व येणे किंवा मृत्यू पावणारे शेतकरी या योजनेस पात्र होतील.शेतकऱ्यास लाभदायक : त्रुटी दूर कराअपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी एक लाखऐवजी मिळणार शेतकऱ्याला दोन लाख रूपये.एक कोटी ३७ लाख खातेदार शेतकऱ्यांना होणार लाभशासनाने अपघात विम्याच्या भरपाईत वाढ केल्याने दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. मात्र, यातील अटी व शर्र्थींमुळे काहीवेळा अडथळे निर्माण होऊन लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होतो. त्याबाबत पारदर्शकता हवी. - विठ्ठल पाटील, शेतकरी, पाटपन्हाळा, ता. पन्हाळाहा शासनाचा दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा आहे. मात्र, बहुतांश शेतकरी कुटुंबात एक खातेदार असतो. मात्र, काम करणारे सर्व कुटुंब असते. खातेदाराव्यतिरिक्त कुटुंबातील इतर व्यक्तीला त्याचा लाभ होत नाही. याबाबत सर्व कुटुंबाला संरक्षण मिळणारे धोरण ठरवावे. - कृष्णात पाटील, शेतकरी, वाकरे, ता. करवीर