शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

पावसाच्या ओढीने शेतकरी घायाळ !

By admin | Updated: July 8, 2014 01:06 IST

परिस्थिती गंभीर नाही : जिल्ह्यात उपसा बंदी नाहीच; एक महिना पुरेल एवढे पाणी शिल्लक

कोल्हापूर : वेळेवर आणि भरपूर पाऊस पडणारा जिल्हा अशी संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने यंदा ओढ दिल्यामुळे शेतकरी पुरता घायाळ झाला आहे. पाऊस आज पडेल, उद्या पडेल म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या शेतकऱ्यांचे डोळे मात्र सध्या ढगांकडे लागले आहेत. पावसाने ओढ दिली असल्याने सर्वांचीच चिंता कायम असली तरी परिस्थिती मात्र गंभीर नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. अद्यापही एक महिना पुरेल इतका पाणीसाठा धरणात असल्याने जिल्ह्यात कोठेही पाणी उपसा बंदी लागू केलेली नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी व नागरिकांना पिण्यासाठी नद्यांत पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यात सगळीकडेच पाऊस म्हणावा तितका झालेला नाही. दरवर्षी हमखास चांगला पाऊस होतो. विशेष म्हणजे वेळेवर पडतो. कालचक्रानुसार पंधरा तीन आठवडे इकडे तिकडे होतात. परंतु, यावर्षी एक महिना ओलांडून गेला. मृग आणि आद्रा नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. वास्तविक आद्रा नक्षत्रात मोठा पाऊस होऊन नद्या-नाले भरून वाहात असतात. परंतु, यंदा महत्त्वाची दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक तर जिल्ह्यात खरिपाच्या फक्त २५.४९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उसाचे क्षेत्र धरून ५६.६३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित क्षेत्रात भाताची लागवड व्हायची बाकी आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके करपण्याची शक्यता आहे.पावसाने ओढ दिली असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण आपल्याकडील धरणात अद्याप एक महिना शेतीला व पिण्यास पाणी पुरवू शकेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितले. भोगावती नदीत पूर्वी २०० क्युसेक्स पाणी सोडले जात होते. त्याचा विसर्ग वाढवून ६०० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. इचलकरंजी शहराला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वारणा धरणातून पाणी सोडले असून, उद्या, मंगळवारपर्यंत हे पाणी इचलकरंजीला पोहोचणार आहे. अगदीच परिस्थिती नाजूक बनली तर रोेटेशन पद्धतीने पाणी सोडले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी व्यवस्थित पुरवठा होत आहे. एकाही गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही, असा दावा जिल्हाधिकारी माने यांनी केला. (प्रतिनिधी)