शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

पावसाच्या ओढीने शेतकरी घायाळ !

By admin | Updated: July 8, 2014 01:06 IST

परिस्थिती गंभीर नाही : जिल्ह्यात उपसा बंदी नाहीच; एक महिना पुरेल एवढे पाणी शिल्लक

कोल्हापूर : वेळेवर आणि भरपूर पाऊस पडणारा जिल्हा अशी संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने यंदा ओढ दिल्यामुळे शेतकरी पुरता घायाळ झाला आहे. पाऊस आज पडेल, उद्या पडेल म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या शेतकऱ्यांचे डोळे मात्र सध्या ढगांकडे लागले आहेत. पावसाने ओढ दिली असल्याने सर्वांचीच चिंता कायम असली तरी परिस्थिती मात्र गंभीर नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. अद्यापही एक महिना पुरेल इतका पाणीसाठा धरणात असल्याने जिल्ह्यात कोठेही पाणी उपसा बंदी लागू केलेली नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी व नागरिकांना पिण्यासाठी नद्यांत पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यात सगळीकडेच पाऊस म्हणावा तितका झालेला नाही. दरवर्षी हमखास चांगला पाऊस होतो. विशेष म्हणजे वेळेवर पडतो. कालचक्रानुसार पंधरा तीन आठवडे इकडे तिकडे होतात. परंतु, यावर्षी एक महिना ओलांडून गेला. मृग आणि आद्रा नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. वास्तविक आद्रा नक्षत्रात मोठा पाऊस होऊन नद्या-नाले भरून वाहात असतात. परंतु, यंदा महत्त्वाची दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक तर जिल्ह्यात खरिपाच्या फक्त २५.४९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उसाचे क्षेत्र धरून ५६.६३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित क्षेत्रात भाताची लागवड व्हायची बाकी आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके करपण्याची शक्यता आहे.पावसाने ओढ दिली असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण आपल्याकडील धरणात अद्याप एक महिना शेतीला व पिण्यास पाणी पुरवू शकेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितले. भोगावती नदीत पूर्वी २०० क्युसेक्स पाणी सोडले जात होते. त्याचा विसर्ग वाढवून ६०० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. इचलकरंजी शहराला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वारणा धरणातून पाणी सोडले असून, उद्या, मंगळवारपर्यंत हे पाणी इचलकरंजीला पोहोचणार आहे. अगदीच परिस्थिती नाजूक बनली तर रोेटेशन पद्धतीने पाणी सोडले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी व्यवस्थित पुरवठा होत आहे. एकाही गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही, असा दावा जिल्हाधिकारी माने यांनी केला. (प्रतिनिधी)