शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

परीक्षेच्या तोंडावर सात जिल्ह्यांतील महाविद्यालये ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:59 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, ठाणे, वाशिम आणि यवतमाळमधील महाविद्यालयात तास होत नसल्याने तेथील शिकविणे बंद आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, ठाणे, वाशिम आणि यवतमाळमधील महाविद्यालयात तास होत नसल्याने तेथील शिकविणे बंद आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि मराठवाड्यात आंदोलनाचा फारसा परिणाम झाला नसून, येथील महाविद्यालयात नियमितपणे तास होत आहेत.महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशनच्या (एम्फुक्टो) नेतृत्वाखाली राज्यातील प्राध्यापकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एम्फुक्टो आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे एम्फुक्टोने आंदोलनाची तीव्रता वाढविली. या आंदोलनाला तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनीही पाठिंबा दिला आहे.कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालयांतील १२४३ प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत. या जिल्ह्यांतील ८० टक्के महाविद्यालयांमध्ये तास होत नाहीत. नाशिक जिल्ह्यातील ८०० प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत. अहमदनगरमधील प्राध्यापक आपआपल्या महाविद्यालयासमोर रोज निदर्शने करतात. वाशिम आणि यवतमाळमधील प्राध्यापकांनी ‘खडूफळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. ठाणे शहरातील ८० टक्के प्राध्यापक आंदोलनात सहभागी असल्याने येथील महाविद्यालयात वर्ग भरत नाहीत. मराठवाड्यात मोर्चा, सामूहिक रजा आंदोलनाद्वारे ते निषेध व्यक्त करीत आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे पुनर्परीक्षार्थीं विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. पुणे शहरात आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद आहे. पुणे ग्रामीण, नगर भागात काही परिणाम जाणवत आहे.याठिकाणी एक-दोन दिवसांचे आंदोलनचंद्रपूर जिल्ह्यात ‘बेमुदत कामबंद’ आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शासनाचा निषेध करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत असलेल्या नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये एक ते दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. गडचिरोलीमध्ये दि. २५ आणि २६ सप्टेंबरला निदर्शने करण्यात आली. त्यानंतर नियमितपणे तासिका आणि महाविद्यालयांचे कामकाज सुरू आहे.