शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दखल घ्यावी असा प्रयोग-

By admin | Updated: November 30, 2015 01:06 IST

-राज्य नाट्य स्पर्धा

नाटकाची निवड हा स्पर्धेतच नव्हे, तर एरव्ही व्यावसायिक, अव्यावसायिक कोणत्याही निमित्ताने सादर करावयाच्या प्रयोगासाठी महत्त्वाची बाब ठरते. निदान नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यास योग्य असावे, ही प्रेक्षकांची निसंयोजकांची पण अपेक्षा असते. स्पर्धेच्या या प्रयोगशाळेत रंगभूमी ह्या माध्यमाच्या विविध शक्यता तपासून पाहण्याची एक संधी असते नि त्याची सुरुवात नाटकाच्या निवडीपासून होते. स्पर्धेच्या नियमांनुसार मिळणाऱ्या पाच गुणांची काळजी न करता जुने नाटक निवडले / उरलेल्या ५५ गुणांपैकी जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा हक्क दिग्दर्शक नि संस्थेला असतोच. नवे नाटक म्हणून पाच गुण विनासायास मिळविणाऱ्या संस्था स्पर्धात्मक यश मिळवितातच असे नाही.ऐंशी-नव्वदच्या दशकात धंदेवाईक नाटकांचे पेव फुटले होते तेव्हाचे हे नाटक. जसे ते पेव आज काल टी.व्ही. मालिकांच्या बाबतीत फुटले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियांचा बकासूर नि त्याची भूक अमर्याद आहे. टी.व्ही.चा स्वीच आॅन केल्यावर कुणी ना कुणी टाईमपास करायला बडबडतंय अगर नाचतंय, एवढीच अपेक्षा टी. व्ही. पाहणाऱ्यांची असते. संयोजकांचे घोळ न संपणारे असले तरी रंगभूमी ह्या प्रचंड ताकदीच्या माध्यमाचे भान ठेवून प्रेक्षकांच्या केवळ करमणूक या तत्कालिक गरजेसाठी फरफटत न जाता रंगभूमीवर अर्थपूर्ण प्रयोग करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची संख्या आजही लक्षणीय आहे आणि म्हणूनच राज्य नाट्य स्पर्धा अस्तित्वात आहेत.गेली अनेक वर्षे रंगभूमीशी निगडित असलेल्या दिग्दर्शक राजेंद्र बांबूळकर यांनी रूद्राक्ष अकॅडमी संस्थेतर्फे सादर केलेले प्र. ल. बयेकरलिखित ‘डॅडी आय लव्ह यू’ हे नाटक पाहिल्यानंतर त्यांच्या या बहुतेक पहिल्या प्रयत्नांबद्दल जे विचार मनात आले ते असे. कलाकारांची आणि तांत्रिक साथ असताना होती गरज ती फक्त सुयोग्य रचनेची. जी दिग्दर्शकाने गंभीरपणे लक्षात घेऊन स्वीकारलेल्या बऱ्या-वाईट नाटकाला न्याय द्यायला हवा होता. दिग्दर्शन आणि अभिनय करता-करता होणारी दमछाक पण टाळता येणे शक्य होते. त्यामुळे ‘आदिनाथ’ किंवा ‘दीनानाथ’ यांच्या दिसण्यातले साम्यवगळता त्या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. या लेखकाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा लागला नसता. मुळात नाटकाच्या नि लॉ अँड आॅर्डरचा नाटकात इन्स्पेक्टर आहे म्हणून संबंध आहे, म्हणावे लागते. सर्व प्रकारच्या योगायोगांनी ठसाठस भरलेले हे नाटक टी.व्ही. सिरीयलसारखेच तद्दन टाईमपास नाटक आहे; पण दिग्दर्शकाबरोबर समर्थ अभिनयाचे सुप्त गुण असलेल्या कलाकारांची झालेली फरफट आणि प्रयोग सादर करण्याची जिद्द पुढच्या प्रवासात एक अनुभव म्हणून उपयोगाला यावी.प्रयोगाबद्दल दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी दिलेले लेखी म्हणणे आणि प्रत्यक्ष प्रयोग याचा अर्थाअर्थी संबंध असलाच पाहिजे असे काही नसते. त्यामुळे बांबूळकरनी अशा म्हणण्याचा दिलेला गठ्ठा, प्रयोग सुविहित करण्यास किती उपयोगाचा ठरला, याचे आत्मपरीक्षण केल्यास त्यांच्या लक्षात येईल. नाटकाचा, त्यातून स्पर्धेतील नाटकांचा प्रेक्षक हा सहिष्णूच असतो. जे काही समोर दिलेले आहे ते विना तक्रार स्वीकारतो. या संधीचा फायदा या नाटकाला मिळालाच आहे. गरज आहे ती भविष्यात चांगले प्रयोग करून याच प्रेक्षकांना एक विरळा अनुभव देण्याची. ती क्षमता या ग्रुपमध्ये निर्विवाद आहे. पण...!प्रसन्न जी. कुलकर्णी