शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

विस्तारच ठरतो विकासात अडथळा

By admin | Updated: February 27, 2015 23:17 IST

स्मशानभूमी, रस्त्यांची दूरवस्था : जुनी स्वच्छतागृहे दुरुस्ती, नुतणीकरणाच्या प्रतीक्षेत

संकपाळ नगर, निगवे नाका, दत्तमंदिर अशा तीन झोपडपट्ट्यांसह आंबेडकरनगर, सावरकर नगर, जय शिवराय कॉलनी, हनुमान तलाव, पिंजार गल्ली, शिंदे गल्ली, वाडकर गल्ली, अशा विस्तीर्ण आणि विचित्र प्रभाग रचनेमुळे विकासकामे करताना अडथळे येणारा प्रभाग म्हणून कसबा बावडा, हनुमान तलावकडे पाहिले जाते. नगरसेवकांचा संपर्क भागात चांगला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, रस्त्यावरील दिवे यांची स्थिती बऱ्यापैकी आहे. मात्र, मोडकळीस आलेली स्मशानभूमी, शौचालये, आंबेडकरनगरमधील खराब झालेले रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.राजाराम बंधाऱ्यापासून ते प्रिन्स शिवाजी शाळेपर्यंत तसेच मूळ गावठाणातील काही गल्ल्यांमध्ये हा प्रभाग विखुरलेला आहे. त्यामुळे या प्रभागात प्रत्येक नागरिकासी संपर्क साधून नागरी वस्तीपर्यंत पोहोचताना नगरसेवकाला तारेवरची कसरत करावी लागते. मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांची या ठिकाणी जास्त वस्ती आहे.प्रभागात (राजाराम बंधाऱ्याजवळ) स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीवर प्रस्तावित शंभरफुटी रस्ता जात असल्याने स्मशानभूमीचे दोन भाग होणार आहेत. त्यामुळे स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे म्हणावे तसे पालिकेचे लक्ष नाही. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी आंदोलने झाली, निधीची घोषणा झाली; परंतु स्मशानभूमीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. स्मशानभूमीतील राख सध्या थेट पंचगंगा नदीत सोडली जाते. नगरसेवकांनी काही प्रमाणात स्मशानभूमीचे काम केले आहे; परंतु ते अपूर्ण आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण सांगितले जात आहे.या प्रभागात तब्बल १५० सार्वजनिक शौचालये व दहा मुताऱ्या आहेत. ही शौचालये २५ ते ४० वर्षांपूर्वीची असल्याने मोडकळीस आलेली आहेत. किरकोळ दुरुस्ती करण्याऐवजी ही शौचालये पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे. प्रभागात ठिकठिकाणी दहा मुताऱ्या आहेत. त्यांचीही मोडतोड झालेली आहे. काही मुताऱ्यांना आडोसा नाही. यात प्रभागातील हनुमान तलाव, मिनी चौपाटीचीही काही प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. नगरसेवकांनी खेळण्यांची दुरुस्ती करून काही ठिकाणी विद्युत बल्ब बसविले आहेत; परंतु तलावातील पाणी मोठ्याप्रमाणात दूषित झाले आहे. तसेच त्या पाण्याच्या बाजूला गवत, झुडुपे वाढलेली आहेत. त्यामुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा येते.प्रभागातील प्रिन्स शिवाजी नगर झोपडपट्टीतील नागरिक प्रॉपर्टीकार्डाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ७/१२ मिळावा म्हणून ते प्रतीक्षेत आहेत. नगरसेवकांनी अशा १५४ फायली महानगरपालिकेकडे सादर केल्या आहेत; परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही. प्रभागात अन्य ठिकाणाचे रस्ते चांगले आहेत. पिण्याच्या पाण्याची तक्रार नाही. रस्त्यावरील दिव्यांची सोयही चांगली आहे. मात्र, काही ठिकाणी रस्ते साफ करायला आणि गटारींची स्वच्छता करायला मनपा कर्मचारी येत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे.प्रभागाचा विस्तार खूप मोठा आहे. त्यामुळे विकासकामे करताना निधीअभावी अनेक अडचण येतात. तरीही आतापर्यंत तब्बल चार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. भागात पाईपलाईन टाकून पिण्याचा पाण्याची चांगली सोय केली आहे. दहा लाख रुपयांचे एलईडी बल्ब बसविले आहेत. स्मशानभूमीत पेव्हर बॉक्स बसविले. निधी उपलब्ध झाल्यास अन्य कामे केली जातील. भागातील रस्ते केले. आंबेडकरनगरमधील रस्ते लवकरच केले जातील. प्रभागात ४८ घरकुल योजना मार्गी लावली. गटारी केल्या. चॅनेल बांधले. यासाठी माजी मंत्री सतेज पाटील व महापालिका यांच्याकडून निधी उपलब्ध झाला. - डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक.