शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
3
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
4
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
5
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
6
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
7
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
8
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
9
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
11
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
12
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
13
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
14
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
15
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
16
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
17
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
18
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
19
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
20
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं

आठ महिन्यांत सात बालके झाली ‘नकोशी’

By admin | Updated: December 10, 2014 00:02 IST

‘बालकल्याण’मध्ये मायेचे छत्र : कायदेशीर प्रक्रियेनंतर दिले जाते दत्तक

इंदुमती गणेश- कोल्हापूर -बालपण हे फुलपाखरासारखं असतं, असं म्हणतात. मन कधी या वेलीवर कधी त्या. पण ते अनुभवण्याआधीच टाकलेपणाचे ओरखडे म्हणजे त्यांच्या भावविश्वाचा विध्वंसच . दुपट्यात लपेटलेले निरागस बाळ जोरजोराने आक्रंदत असते. कधी ते रस्त्यावर टाकलेले असते तर कधी नदीकाठी, कधी रेल्वेस्टेशनवर, तर अगदी कचराकुंडीतसुद्धा. काही धडधाकट तर काही अत्यवस्थ. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत विविध कारणांमुळे अशी नकोशी झालेली सात नवजात अर्भके येथील बालकल्याण संकुलात दाखल झाली आहेत. काल शिरोली परिसरात पंचगंगा नदीकाठाजवळ पंचवीस दिवसांचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना सापडले. सध्या त्याच्यावर सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन या बाळास बालकल्याण संकुलमध्ये पाठविण्यातयेणार आहे. काही महिन्यांपूर्वी एका प्राध्यापिकेने बाळ रस्त्यावर टाकण्याचा प्रयत्न केला पण हे करताना ती सापडली. कारणमिमांसा झाली तेव्हा बाळाचा बाप त्याची जबाबदारी सांभाळायला तयार नव्हता, असे समजले. अनेक कारणांनी लहान बाळांना रस्त्यात टाकून दिले जाते. पण जर मूल सांभाळणे शक्यच नसेल तर त्याला कुठेही टाकण्यापेक्षा संस्थेकडे रितसर देणे कधीही योग्य. पालक म्हणून आपण कितीही अगतिक असलो तरी शेवटी प्रश्न येतो की या सगळ््यात त्या बाळांचा दोष काय..? एकदा मूल सापडले की पोलिसांना त्याच्या पालकांना शोधण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. यादरम्यान पालकांना चूक उमगली ते परत आलेच तर बाळाला पुन्हा मायेची ऊब मिळते पण असे नाही झाले की मूल बेवारस घोषित केले जाते. त्यानंतर हे मूल अन्य कोणालाही दत्तक देता येते. आता बालकल्याण संकुल किंवा शिशुआधार केंद्र अशा संस्थांमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बाळांना सांभाळले जाते. त्यामुळे मूल नकोच असेल तर त्यांना कुठेही टाकून देण्यापेक्षा अशा संस्थांमध्ये रितसर दाखल केले पाहिजे. माताच ठरते दोषीबेवारस अवस्थेत बाळ सापडले की त्याचे खापर आईवर फोडले जाते. ‘माता न तू वैरीणी’ किंवा ‘दगडाच्या काळजाची’ अशी काही विशेषणे लावली जातात पण मूल ही फक्त आईची नव्हे तर वडिलांचीही जबाबदारी असते. एखादी स्त्री फसवली गेली असेल तर तितकाच दोषी पुरुषही असतो. आधीच फसवणूक, अवहेलना बाळंतपणाच्या कळा झेललेल्या त्या स्त्रीला मूल सोबत घेऊन समाजात जगूच दिले जात नाही. अशावेळी मूल रस्त्यावर टाकताना किंवा संस्थेत सोडताना त्या आईच्या काळजाचे दु:ख कधी समजूनच घेतले जात नाही. पुरुषांना मात्र या सगळ््याच दोषातून मुक्तता. ही विषमताच बालकांच्या या अवस्थेला कारणीभूत ठरते. जंतूसंसर्ग आणि उपचार या नवजात बालकांना रस्त्यावर किंवा घाणीच्या ठिकाणी ठेवून गेले की काहीवेळा कुत्रे बाळाचे लचके तोडण्यासही कमी करत नाहीत. काहीवेळा बाळांना जंतुसंसर्ग झालेला असतो, आजारी पडलेली असतात..अशा अवस्थेत बाळ सापडल्यानंतर सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार करावे लागतात नंतर हे बाळ बालकल्याण समितीकडे पाठविले जातात. त्यानंतर बाळ आजारी पडले किंवा दुर्धर आजार झाला असेल तर बालकल्याणच्यावतीनेही मोठ्या दवाखान्यांमध्ये बाळांवर उपचार केले जातात. या सगळ््यात या शिशुगृहात बाळांच्या आईचीच भूमिका येथील महिला कर्मचारी आनंदाने पार पाडत असतात. विशेष म्हणजे एवढ्या वर्षात संस्थेत आलेले एकही बाळ दगावलेले नाही..केवळ अनैतिक संबंधातूनच बाळं टाकली किंवा संस्थेत सोडली जातात हा गैरसमज आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. आमच्या संस्थेत आलेल्या बाळांना लवकरात लवकर मायेचे छत्र मिळावे यासाठी प्रयत्न करतो आणि बाळांना दत्तक देतो. गेल्या दहा वर्षांत आमच्याकडे आलेल्या पंच्याहत्तरपैकी साठ बालकांना आम्ही मायेचे छत्र देऊ शकलो. - प्रमिला जरग(संचालिका, शिशु आधार केंद्र)बालके सोडण्याची कारणेबालके सोडण्याची कारणेअनैतिक संबंधातून जन्मकुमारीमाता मुलगी झाली म्हणूनआर्थिक अडचणी, दारिद्र्यबाळाचे अपंगत्वपालकांना असाध्य आजार सेक्सवर्करची मुलेअधिक अपत्ये सांभाळण्याची क्षमता नसणेनातेवाइकांचा आधार नाही