शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत सात बालके झाली ‘नकोशी’

By admin | Updated: December 10, 2014 00:02 IST

‘बालकल्याण’मध्ये मायेचे छत्र : कायदेशीर प्रक्रियेनंतर दिले जाते दत्तक

इंदुमती गणेश- कोल्हापूर -बालपण हे फुलपाखरासारखं असतं, असं म्हणतात. मन कधी या वेलीवर कधी त्या. पण ते अनुभवण्याआधीच टाकलेपणाचे ओरखडे म्हणजे त्यांच्या भावविश्वाचा विध्वंसच . दुपट्यात लपेटलेले निरागस बाळ जोरजोराने आक्रंदत असते. कधी ते रस्त्यावर टाकलेले असते तर कधी नदीकाठी, कधी रेल्वेस्टेशनवर, तर अगदी कचराकुंडीतसुद्धा. काही धडधाकट तर काही अत्यवस्थ. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत विविध कारणांमुळे अशी नकोशी झालेली सात नवजात अर्भके येथील बालकल्याण संकुलात दाखल झाली आहेत. काल शिरोली परिसरात पंचगंगा नदीकाठाजवळ पंचवीस दिवसांचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना सापडले. सध्या त्याच्यावर सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन या बाळास बालकल्याण संकुलमध्ये पाठविण्यातयेणार आहे. काही महिन्यांपूर्वी एका प्राध्यापिकेने बाळ रस्त्यावर टाकण्याचा प्रयत्न केला पण हे करताना ती सापडली. कारणमिमांसा झाली तेव्हा बाळाचा बाप त्याची जबाबदारी सांभाळायला तयार नव्हता, असे समजले. अनेक कारणांनी लहान बाळांना रस्त्यात टाकून दिले जाते. पण जर मूल सांभाळणे शक्यच नसेल तर त्याला कुठेही टाकण्यापेक्षा संस्थेकडे रितसर देणे कधीही योग्य. पालक म्हणून आपण कितीही अगतिक असलो तरी शेवटी प्रश्न येतो की या सगळ््यात त्या बाळांचा दोष काय..? एकदा मूल सापडले की पोलिसांना त्याच्या पालकांना शोधण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. यादरम्यान पालकांना चूक उमगली ते परत आलेच तर बाळाला पुन्हा मायेची ऊब मिळते पण असे नाही झाले की मूल बेवारस घोषित केले जाते. त्यानंतर हे मूल अन्य कोणालाही दत्तक देता येते. आता बालकल्याण संकुल किंवा शिशुआधार केंद्र अशा संस्थांमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बाळांना सांभाळले जाते. त्यामुळे मूल नकोच असेल तर त्यांना कुठेही टाकून देण्यापेक्षा अशा संस्थांमध्ये रितसर दाखल केले पाहिजे. माताच ठरते दोषीबेवारस अवस्थेत बाळ सापडले की त्याचे खापर आईवर फोडले जाते. ‘माता न तू वैरीणी’ किंवा ‘दगडाच्या काळजाची’ अशी काही विशेषणे लावली जातात पण मूल ही फक्त आईची नव्हे तर वडिलांचीही जबाबदारी असते. एखादी स्त्री फसवली गेली असेल तर तितकाच दोषी पुरुषही असतो. आधीच फसवणूक, अवहेलना बाळंतपणाच्या कळा झेललेल्या त्या स्त्रीला मूल सोबत घेऊन समाजात जगूच दिले जात नाही. अशावेळी मूल रस्त्यावर टाकताना किंवा संस्थेत सोडताना त्या आईच्या काळजाचे दु:ख कधी समजूनच घेतले जात नाही. पुरुषांना मात्र या सगळ््याच दोषातून मुक्तता. ही विषमताच बालकांच्या या अवस्थेला कारणीभूत ठरते. जंतूसंसर्ग आणि उपचार या नवजात बालकांना रस्त्यावर किंवा घाणीच्या ठिकाणी ठेवून गेले की काहीवेळा कुत्रे बाळाचे लचके तोडण्यासही कमी करत नाहीत. काहीवेळा बाळांना जंतुसंसर्ग झालेला असतो, आजारी पडलेली असतात..अशा अवस्थेत बाळ सापडल्यानंतर सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार करावे लागतात नंतर हे बाळ बालकल्याण समितीकडे पाठविले जातात. त्यानंतर बाळ आजारी पडले किंवा दुर्धर आजार झाला असेल तर बालकल्याणच्यावतीनेही मोठ्या दवाखान्यांमध्ये बाळांवर उपचार केले जातात. या सगळ््यात या शिशुगृहात बाळांच्या आईचीच भूमिका येथील महिला कर्मचारी आनंदाने पार पाडत असतात. विशेष म्हणजे एवढ्या वर्षात संस्थेत आलेले एकही बाळ दगावलेले नाही..केवळ अनैतिक संबंधातूनच बाळं टाकली किंवा संस्थेत सोडली जातात हा गैरसमज आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. आमच्या संस्थेत आलेल्या बाळांना लवकरात लवकर मायेचे छत्र मिळावे यासाठी प्रयत्न करतो आणि बाळांना दत्तक देतो. गेल्या दहा वर्षांत आमच्याकडे आलेल्या पंच्याहत्तरपैकी साठ बालकांना आम्ही मायेचे छत्र देऊ शकलो. - प्रमिला जरग(संचालिका, शिशु आधार केंद्र)बालके सोडण्याची कारणेबालके सोडण्याची कारणेअनैतिक संबंधातून जन्मकुमारीमाता मुलगी झाली म्हणूनआर्थिक अडचणी, दारिद्र्यबाळाचे अपंगत्वपालकांना असाध्य आजार सेक्सवर्करची मुलेअधिक अपत्ये सांभाळण्याची क्षमता नसणेनातेवाइकांचा आधार नाही