शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

राजकारणासाठी शिक्षण क्षेत्रही सोडले नाही

By admin | Updated: August 25, 2014 22:54 IST

नीती प्रधान : कुडाळ येथे आयोजित उच्च शिक्षणातील गुणवत्ता विषयावरील परिसंवादात व्यक्त केली खंत

कुडाळ : शिक्षण क्षेत्रातही राजकारण्यांनी राजकारण आणले आहे. राजकारणी शिक्षण क्षेत्रापासून दूर गेल्यास या क्षेत्रामध्ये नक्कीच सुधारणा होईल, असा आशावाद एसनडीटी विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. नीती प्रधान यांनी कुडाळ येथील बॅ. नाथ पै संस्थेमार्फत आयोजित केलेल्या ‘उच्च शिक्षणातील गुणवत्ता’ या राष्ट्रीय परिसंवादात व्यक्त केला. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी संपूर्ण योगदान देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्यावतीने महाविद्यालयात उच्च शिक्षणातील गुणवत्ता विषयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिक्षकांनी राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, गोव्याचे उपविभागीय अधिकारी जी. श्रीनिवास यांनी केले. यावेळी मुंबई येथील सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या डॉ. सत्यवती राऊळ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईचे डॉ. सुभाष वाघमारे, संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत, प्राध्यापक अल्ताफ खान, डॉ. सिध्दार्थ खाटविसावे, प्राचार्य फ्रान्सिस डिसोजा, प्राचार्य डॉ. दीपाली काजरेकर, प्राध्यापक जयवंती सावंत, अमृता गाळवणकर आदी उपस्थित होते. डॉ. प्रधान म्हणाल्या, गरजेनुसार अभ्यासक्रमात वारंवार बदल झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर आणि धाकही असावा. खासगी शिक्षण संस्थांमध्ये बऱ्याचवेळा गोंधळाचा कारभार सुरू असतो. परंतु खासगी शिक्षण संस्थांशिवाय सरकारकडे अन्य पर्यायही उपलब्ध नाही, असे सांगितले. डॉ. श्रीनिवासन यांनी, वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वसामान्यांना शैक्षणिक सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत असून याला सध्याची शिक्षणपध्दती जबाबदार आहे, असे सांगितले. परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलांना जेवढा खर्च येतो, त्या खर्चात देशात सुसज्ज अशी सातं आयटी महाविद्यालये निर्माण होऊ शकतील, अशी टीका सध्याच्या शिक्षणपध्दतीवर त्यांनी केली. यावेळी उमेश गाळवणकर, डॉ. वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)युवा पिढी पळतेय पैशामागेसध्याची युवा पिढी पैसे कमवायच्या मागे असून यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करीत आहे. कष्टाने पैसे मिळतात. त्यामुळे लोभाने पैसे मिळविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन डॉ. प्रधान यांनी यावेळी केले.याला शिक्षकच जबाबदारसमाजाच्या सद्यस्थितीला सध्याच्या शिक्षणपध्दतीबरोबरच काही प्रमाणात शिक्षकही जबाबदार आहेत. नोकरी मिळण्याच्या अगोदर आपल्याला पगार किती मिळणार, याची कल्पना असूनही अवास्तव कारणांसाठी शिक्षक संपावर जातात, हे योग्य की अयोग्य ते त्यांनीच ठरवावे, असे डॉ. प्रधान यांनी सांगितले.