शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सुरळीत ऊसतोडणीमुळे चाऱ्याचा प्रश्न निकाली

By admin | Updated: November 21, 2015 00:14 IST

कारखान गट आॅफिसवर गर्दी : ऊस लवकर जाणयासाठी प्रयत्न, रस्ते ऊस वाहतुकीच्या वाहनांनी गजबजले

संजय पाटील -- सरूड --सध्या ग्रामीण भागामध्ये गेल्या १५ दिवसांपासून ऊस तोडणी सुरळीत चालू असल्यामुळे जनावरांना लागणाऱ्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न उसाच्या वाड्याच्या माध्यमातून सुटला आहे. ऊस उत्पादनात घट होत असली तरी शेतकरी वर्गाचे लक्ष चालू वर्षी उसाला किती ‘एफआरपी’ जाहीर होते व आपला ऊस कारखान्यास कसा लवकर घालवून अन्य पीक कसे घेता येईल, याकडे लागले असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध शेतकरी संघटना व शासन कारखानदार यांच्यात ऊसदरावरून आंदोलने होत होती. त्याकाळी आधी आंदोलन व त्यानंतरच कारखाने चालू असे चित्र बनले होते. त्याचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होत होता. शासन व कारखानदार यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ऊस दर जाहीर होण्यास विलंब लागत होता. आंदोलन तीव्र झाली की मात्र शासन जागे होत होते व विविध शेतकरी संघटना जो म्हणेल तो दर मान्य करून कारखाने दीड महिना उशिरा चालू होत होते. परंतु, निव्वळ मोलमजुरी तसेच ऊस तोडणीवर उदरनिर्वाह करणारे सर्वसामान्य लोक, तसेच शेतकरी वर्ग यांच्यावरती विपरीत परिणाम होत होता. कारखाने चालू नसल्यामुळे लोकांच्या हाताला काम नव्हते. त्याचा परिणाम गावागावांतील विविध व्यापारी वर्गावर होत होता. परंतु, चालू वर्षी मात्र गेल्या अनेक वर्षापेक्षा चित्र वेगळे दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कारखाने विना आंदोलन करता चालू झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सध्या शांततेच्या मार्गाने यावरती तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपर्यंत या संघटनेने शासन, कारखानदार यांच्याकडून गतवर्षी गेलेल्या उसाचे बिल ‘एफआरपी’प्रमाणे देऊन चालू गळीत हंगामासाठी शासन, कारखानदार किती ‘एफआरपी’ जाहीर करणार? अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. जर शासन अपेक्षित दर जाहीर करणार नसेल तर अपेक्षित दर मिळविण्यासाठी योग्य मार्गाने पावले उचलली जातील, असा इशाराही या निमित्ताने ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. चालू वर्षी पावसाचे घटलेले प्रमाण लक्षात घेता ऊस उताऱ्यावर देखील कमालीचा परिणाम झाला आहे. त्यातच वाढती महागाई, आर्थिक टंचाई यासारख्या समस्या जनतेसमोर आवासून उभ्या आहेत. ग्रामीण पट्ट्यात मात्र चालू वर्षी सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र, ऊसतोडी चालू झाल्यामुळे उसाचे वाडे विकून का होईना घरसंसार चालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.एकूणच चालू वर्षी ऊसतोडी व कारखाने लवकर चालू झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. ग्रामीण भागात मोलमजुरी करणारी काही कुटुंबे आहेत, त्यांच्यातही चैतन्याचे वातावरण आहे. परंतु, शेतकरी वर्गाचे लक्ष चालू वर्षाच्या ‘एफआरपी’कडे लागले असल्याचे चित्र दिसत आहे.