शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत ऊसतोडणीमुळे चाऱ्याचा प्रश्न निकाली

By admin | Updated: November 21, 2015 00:14 IST

कारखान गट आॅफिसवर गर्दी : ऊस लवकर जाणयासाठी प्रयत्न, रस्ते ऊस वाहतुकीच्या वाहनांनी गजबजले

संजय पाटील -- सरूड --सध्या ग्रामीण भागामध्ये गेल्या १५ दिवसांपासून ऊस तोडणी सुरळीत चालू असल्यामुळे जनावरांना लागणाऱ्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न उसाच्या वाड्याच्या माध्यमातून सुटला आहे. ऊस उत्पादनात घट होत असली तरी शेतकरी वर्गाचे लक्ष चालू वर्षी उसाला किती ‘एफआरपी’ जाहीर होते व आपला ऊस कारखान्यास कसा लवकर घालवून अन्य पीक कसे घेता येईल, याकडे लागले असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध शेतकरी संघटना व शासन कारखानदार यांच्यात ऊसदरावरून आंदोलने होत होती. त्याकाळी आधी आंदोलन व त्यानंतरच कारखाने चालू असे चित्र बनले होते. त्याचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होत होता. शासन व कारखानदार यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ऊस दर जाहीर होण्यास विलंब लागत होता. आंदोलन तीव्र झाली की मात्र शासन जागे होत होते व विविध शेतकरी संघटना जो म्हणेल तो दर मान्य करून कारखाने दीड महिना उशिरा चालू होत होते. परंतु, निव्वळ मोलमजुरी तसेच ऊस तोडणीवर उदरनिर्वाह करणारे सर्वसामान्य लोक, तसेच शेतकरी वर्ग यांच्यावरती विपरीत परिणाम होत होता. कारखाने चालू नसल्यामुळे लोकांच्या हाताला काम नव्हते. त्याचा परिणाम गावागावांतील विविध व्यापारी वर्गावर होत होता. परंतु, चालू वर्षी मात्र गेल्या अनेक वर्षापेक्षा चित्र वेगळे दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कारखाने विना आंदोलन करता चालू झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सध्या शांततेच्या मार्गाने यावरती तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपर्यंत या संघटनेने शासन, कारखानदार यांच्याकडून गतवर्षी गेलेल्या उसाचे बिल ‘एफआरपी’प्रमाणे देऊन चालू गळीत हंगामासाठी शासन, कारखानदार किती ‘एफआरपी’ जाहीर करणार? अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. जर शासन अपेक्षित दर जाहीर करणार नसेल तर अपेक्षित दर मिळविण्यासाठी योग्य मार्गाने पावले उचलली जातील, असा इशाराही या निमित्ताने ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. चालू वर्षी पावसाचे घटलेले प्रमाण लक्षात घेता ऊस उताऱ्यावर देखील कमालीचा परिणाम झाला आहे. त्यातच वाढती महागाई, आर्थिक टंचाई यासारख्या समस्या जनतेसमोर आवासून उभ्या आहेत. ग्रामीण पट्ट्यात मात्र चालू वर्षी सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र, ऊसतोडी चालू झाल्यामुळे उसाचे वाडे विकून का होईना घरसंसार चालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.एकूणच चालू वर्षी ऊसतोडी व कारखाने लवकर चालू झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. ग्रामीण भागात मोलमजुरी करणारी काही कुटुंबे आहेत, त्यांच्यातही चैतन्याचे वातावरण आहे. परंतु, शेतकरी वर्गाचे लक्ष चालू वर्षाच्या ‘एफआरपी’कडे लागले असल्याचे चित्र दिसत आहे.