शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

टंचाईच्या भीतीने साखर दरात तेजी

By admin | Updated: January 17, 2017 00:35 IST

भीती अनाठायी : साखर कारखानदारीला मात्र चांगले दिवस

चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूरयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याच्या भीतीने साखरेच्या दरात तेजी आली आहे. गेल्या गुरुवारी घाऊक बाजारात साखरेला प्रतिक्विंटल ४०२० रुपये दर मिळाला. गेल्या सात वर्षांतील हा उच्चांकी दर आहे. सध्या दर ३६०० ते ३७०० रुपये (एक्स फॅक्टरी) आहे. यामुळे साखर कारखानदारीला चांगले दिवस आले आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास कारखान्यांना कर्जाची परतफेड आणि शेतकऱ्यांची थकीत बिले भागविणे सोयीचे होणार आहे.देशातील यंदाच्या हंगामातील साखरेचे उत्पादन २३५ लाख टन होईल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ते २१५ लाख टनांच्या आसपास राहील, असे दिसते. यामुळे यंदा साखरेची टंचाई जाणवणार अशी शंका व्यापाऱ्यांना येऊ लागल्याने त्यांनी साखर खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. परिणामी, घाऊक बाजारातील मागणी पुरवठ्यापेक्षा जादा होऊ लागल्याने साखरेचे दर वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या साखरेला ४०२० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा शिल्लक साठा ७७ लाख टन होता. चालू हंगामात उत्पादन २१५ लाख टन गृहित धरले तरी २९२ लाख टन साखर उपलब्ध होते. देशांतर्गत विक्री वर्षाला सुमारे २५० लाख टन आहे. त्यामुळे यंदा देशाला वर्षभर पुरेल इतकी साखर उपलब्ध होईलच, शिवाय पुढील साखर हंगामाच्या सुरुवातीला ४० ते ४२ लाख टन इतकी साखर शिल्लक राहील. त्यामुळे व्यापाऱ्यांची शंका अनाठायी आहे. साखरेच्या दरात आणखी फारशी वाढ होणार नाही, असे साखर कारखानदारीतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वायदे व्यवहारातील मार्जिन वाढविलेवायदे बाजारातील साखरेचे दर वाढविण्यात येत असल्याने सध्या घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत, असे लक्षात आल्याने एनसीडीएक्सने (कमोडिटी एक्स्चेंज) दरवाढीला आळा घालण्यासाठी वायदे व्यवहारातील ५० टक्के रक्कम कारखान्यांकडे लगेच जमा करण्याचा आदेश दिला आहे. आधी हे प्रमाण ४५ टक्के इतके होते. याचाच अर्थ साखर खरेदीचा वायदा केल्यानंतर निम्मी रक्कम लगेच आणि उर्वरित साखर उचलतेवेळी द्यावी लागणार आहे.महाराष्ट्राचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटणारसलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यातच उसाला चांगला दर मिळाल्याने उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. याचा परिणाम पुढील वर्षातील महाराष्ट्रातील साखर उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात मात्र हे उत्पादन गतवर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी म्हणजेच आठ लाख टनांवरून ते पाच लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.