शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

टंचाईच्या भीतीने साखर दरात तेजी

By admin | Updated: January 17, 2017 00:35 IST

भीती अनाठायी : साखर कारखानदारीला मात्र चांगले दिवस

चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूरयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याच्या भीतीने साखरेच्या दरात तेजी आली आहे. गेल्या गुरुवारी घाऊक बाजारात साखरेला प्रतिक्विंटल ४०२० रुपये दर मिळाला. गेल्या सात वर्षांतील हा उच्चांकी दर आहे. सध्या दर ३६०० ते ३७०० रुपये (एक्स फॅक्टरी) आहे. यामुळे साखर कारखानदारीला चांगले दिवस आले आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास कारखान्यांना कर्जाची परतफेड आणि शेतकऱ्यांची थकीत बिले भागविणे सोयीचे होणार आहे.देशातील यंदाच्या हंगामातील साखरेचे उत्पादन २३५ लाख टन होईल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ते २१५ लाख टनांच्या आसपास राहील, असे दिसते. यामुळे यंदा साखरेची टंचाई जाणवणार अशी शंका व्यापाऱ्यांना येऊ लागल्याने त्यांनी साखर खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. परिणामी, घाऊक बाजारातील मागणी पुरवठ्यापेक्षा जादा होऊ लागल्याने साखरेचे दर वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या साखरेला ४०२० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा शिल्लक साठा ७७ लाख टन होता. चालू हंगामात उत्पादन २१५ लाख टन गृहित धरले तरी २९२ लाख टन साखर उपलब्ध होते. देशांतर्गत विक्री वर्षाला सुमारे २५० लाख टन आहे. त्यामुळे यंदा देशाला वर्षभर पुरेल इतकी साखर उपलब्ध होईलच, शिवाय पुढील साखर हंगामाच्या सुरुवातीला ४० ते ४२ लाख टन इतकी साखर शिल्लक राहील. त्यामुळे व्यापाऱ्यांची शंका अनाठायी आहे. साखरेच्या दरात आणखी फारशी वाढ होणार नाही, असे साखर कारखानदारीतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वायदे व्यवहारातील मार्जिन वाढविलेवायदे बाजारातील साखरेचे दर वाढविण्यात येत असल्याने सध्या घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत, असे लक्षात आल्याने एनसीडीएक्सने (कमोडिटी एक्स्चेंज) दरवाढीला आळा घालण्यासाठी वायदे व्यवहारातील ५० टक्के रक्कम कारखान्यांकडे लगेच जमा करण्याचा आदेश दिला आहे. आधी हे प्रमाण ४५ टक्के इतके होते. याचाच अर्थ साखर खरेदीचा वायदा केल्यानंतर निम्मी रक्कम लगेच आणि उर्वरित साखर उचलतेवेळी द्यावी लागणार आहे.महाराष्ट्राचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटणारसलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यातच उसाला चांगला दर मिळाल्याने उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. याचा परिणाम पुढील वर्षातील महाराष्ट्रातील साखर उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात मात्र हे उत्पादन गतवर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी म्हणजेच आठ लाख टनांवरून ते पाच लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.