शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

राजकीय हस्तक्षेपामुळे पुरस्कारांची उंची खालावली

By admin | Updated: September 6, 2014 00:41 IST

दर्जाबाबत प्रश्नचिन्ह : पुरस्कार म्हणजे चेष्टेचा विषय

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘आदर्श’ पुरस्कारांमधील राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांच्या दर्जासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराबरोबर कर्मचारी व सदस्यांना राजर्षी शाहूंच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे निकष बदलून निवड केली तरच या पुरस्कारांची उंची वाढू शकते. जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येक वर्षी शाहू जयंतीपूर्वी सदस्य व कर्मचाऱ्यांना ‘शाहू पुरस्कार’ व शिक्षक दिनानिमित्त ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार दिले जातात. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा गौरव व्हावा, हा त्यामागील हेतू असतो. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्यही आपल्या मतदारसंघातील विविध कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करतो, विविध योजनांतून निधी खेचून आणून मतदारसंघाचे रूपडे पालटतो. अशा सदस्यांना ‘राजर्षी शाहू’ पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. वर्षभरात शाळेत राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, वर्गाची गुणवत्ता पाहून हे पुरस्कार दिले जातात. सुरुवातीच्या काळात या निकषांचे तंतोतंत पालन व्हायचे; त्यामुळे पुरस्काराला एक वेगळीच उंची असायची. हस्तक्षेपाला कंटाळून शिक्षण सभापती महेश पाटील यांनी ‘पुणे पॅटर्न’चा आग्रह धरला होता. या पॅटर्नप्रमाणे शिक्षकांची निवड झाली तर या प्रवृत्तीला थोडासा चाप लागला असता; पण या पॅटर्नचा विचार होण्याआधीच तो बासनात गुंडाळून ठेवण्याचा उद्योग काही कारभारी सदस्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)