शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

संप, मंदी, तणावाने वस्त्रनगरीला ग्रासले

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

कुठे आहेत नेते : सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न

इचलकरंजी : कामगारांचा संप, वस्त्रोद्योगात आलेली मंदी, वारंवार निर्माण होणाऱ्या तणावामुळे संवेदनशील शहर म्हणून होणारा लौकिक यामुळे वस्त्रनगरीची प्रगती व विकास खुंटत आहे. अशा स्थितीत शहराचे पुढारीपण करणारे नेतृत्व कुठे आहे, असा प्रश्न उद्योजक, व्यापारी व सर्वसामान्यांना पडला आहे.इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असून, येथील कारखानदार व कामगार यांच्या सलोख्याच्या वातावरणामुळे येथील उद्योग-धंद्याची प्रगती झाली. कामगारांना मिळणाऱ्या वेतनात वाढ व्हावी, यासाठी इचलकरंजीत अनेकवेळा आंदोलने झाली. मेळावे, सभा, मोर्चे, धरणे, उपोषण असे अनेकविध प्रकार आंदोलनात अवलंबले गेले; पण त्यावेळच्या कामगार नेत्यांना आंदोलनाची योग्य वेळ जशी समजत होती, तशी आंदोलन तुटेपर्यंत कधीही ताणले गेले नाही. त्यामुळे कॉ. के. एल. मलाबादे यांच्यासारख्या कामगार नेतृत्वाची अद्याप आठवण निघते. तसेच आपल्याला मिळणाऱ्या चार पैशांतील दोन पैसे कामगाराला देण्याची येथील यंत्रमाग कारखानदारांतही प्रवृत्ती आहे.वस्त्रोद्योगात येणारी मंदी वस्त्रनगरीला काही नवीन नाही. मात्र, त्या-त्यावेळी शासनाशी लढा देऊन काही सवलती मिळवत मंदीवर मात करण्याचे बळ त्यावेळी दाखविले गेले. सन २००० नंतर आलेल्या अभूतपूर्व मंदीच्या काळात तत्कालीन आवाडे समितीने वस्त्रोद्योगासाठी २३ कलमी पॅकेजची शिफारस केली आणि शासनाने स्वीकारली, तेव्हा मंदीवर मात तर केलीच; पण यंत्रमाग उद्योगाने त्यातून प्रगती साधली. आता एकूणच वस्त्रोद्योग मंदीच्या संक्रमणात सापडला आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी कुणाकडे पाहावे, अशी स्थिती उद्योग-व्यापारी आणि व्यावसायिकांची झाली आहे.अलीकडील काळात सन २००९ पासून शहरात वारंवार तणाव निर्माण होताना दिसतो आहे. सण, उत्सव, देशात कोठेही होणाऱ्या घातपाताच्या घटना किंवा दंगली यामुळे शहरात तणाव निर्माण होतोय. फलक लागणे किंवा पताका बांधणे यासारख्या किरकोळ घटनाही तणावाला कारणीभूत ठरत आहेत. ज्या परिसरात अशी घटना घडेल, तेथील दुकाने पटापट बंद होतात, नागरिकांत भीतीचे वातावरण पसरते. उद्योग-व्यावसायिकांना वित्त-जीविताची भीती वाटू लागते. अशावेळी अगदी गल्लीबोळांतून ते शहराचे पुढारीपण करणारे नेते कुठे गायब होतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतो आहे. (प्रतिनिधी)मोठे उद्योजक येत नाहीतइचलकरंजीमध्ये वारंवार होणारे संप आणि तणावाच्या घटना यामुळे गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत शहर व परिसरामध्ये कोणताही मोठा उद्योग आलेला नाही. स्थानिक फाळकूटदादा व स्वत:ला कामगार पुढारी म्हणवून घेणाऱ्यांच्या सतावण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून बीआरएफएलसारखा बडा उद्योग येथून निघून गेला. वास्तविक पाहता गारमेंट, रेडीमेड आणि प्रोसेसिंग उद्योगामधील मोठे कारखाने उभ्या राहण्यासारख्या पायाभूत सुविधा या परिसरात असतानाही मोठे उद्योजक येथे यायचे धाडस दाखवीत नाहीत, याचाही विचार नेतेमंडळींबरोबरच राजकीय व कामगार क्षेत्रातील पुढाऱ्यांनी करावा, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.