शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचे राजकारण

By admin | Updated: April 9, 2016 00:07 IST

इचलकरंजीत संतप्त प्रतिक्रिया : वारणेतून आरक्षित पाण्याचा उपसा, शेती सिंचनावर परिणाम नाही : हाळवणकर

राजाराम पाटील -- इचलकरंजी -तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि आसपासच्या खेडेगावांतील ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दानोळी (ता. शिरोळ) परिसरातील काहीजण आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चौगुले राजकीय विरोध करीत असल्याबद्दल इचलकरंजीत शुक्रवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, वारणा नळ पाणी योजनेसाठी इचलकरंजीसाठी आरक्षित असलेलेच पाणी दानोळी येथून उचलले जाणार आहे. त्याचा शेती सिंचन किंवा त्या परिसरातील गावांच्या पाणी कमतरतेवर कसलाही परिणाम होणार नाही, असे आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हटले आहे.शहरास पंचगंगा व कृष्णा अशा दोन नद्यांमधून पाणीपुरवठा होतो. दोन्हीही नद्यांना भरपूर पाणी असताना दररोज ५० दशलक्ष लिटर पाणी उचलून ते शुद्ध करून नागरिकांना पुरविले जाते. त्यावेळी दोन दिवसांतून एक वेळ पाणी दिले जाते. जानेवारी महिन्यात पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्याने तेथून पाणी उपसा बंद होतो. त्यामुळे कृष्णा नदीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. कृष्णा नदी दररोज ४० दशलक्ष लिटर पाणी पुरवत असली तरी दाबनलिकेवरील पाणी गळती आणि पाण्याची चोरी यामुळे प्रत्यक्ष ३५ दशलक्ष लिटर पाणीच जलशुद्धिकरण केंद्रात पोहोचते आणि मग तीन ते चार दिवसांतून एकवेळ पाणी शहरवासीयांना दिले जाते.अलीकडील चार वर्षात कृष्णा नदीवर म्हैसाळ योजना झाली आणि तीमधून प्रचंड पाणी कृष्णेतून उचलले जाऊ लागले. त्याचा परिणाम राजापूर बंधाऱ्यासाठी पाणी कमी पडण्यावर झाला. गेल्या दोन वर्षांपासून मे महिन्यात इचलकरंजीसाठी पाणी उपसा करणारे मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील पंप उघडे पडू लागले. त्यामुळे इचलकरंजीस पाण्यासाठी आणखीन पर्यायी जलस्रोत शोधण्यात आले. काळम्मावाडी धरणातून थेट पाणी आणण्याच्या योजनेस येणारा प्रचंड खर्च (सुमारे ६५० कोटी रुपये) आणि त्यानंतर पालिकेला वीज बिल व देखभाल-दुरूस्ती खर्चही जमणार नाही. म्हणून ‘काळम्मावाडी’ करण्यास शासनानेच नकार दिला. त्यामुळे वारणा नदीतून पाणी आणण्याचा पर्याय समोर आला.अशा पार्श्वभूमीवर यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पंचगंगा नदीतून पाणी उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला. नदीपात्रात पूर्वीपासूनच असलेल्या बंधाऱ्याला बरगे घालून त्यातून पाणी देण्यात येऊ लागले. पिण्यासाठी पाणी उपसा होत असतानाही बंधाऱ्याचे बरगे काढा, नाही तर कृष्णा योजनेचे नळ फोडू, अशी वल्गना ‘स्वाभिमानी’चे चौगुले यांनी करून राजकीय स्टंट केल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. विरोध गैरसमजुतीतून : वस्तूस्थिती समजून घ्यादानोळी येथील वारणा नदीतून इचलकरंजीस पाणी उचलण्यास होणारा विरोध गैरसमजुतीतून आहे. वारणा धरणात इचलकरंजी शहरासाठी आवश्यक एक टीएमसी पाण्याचे आरक्षण असून, टप्प्याटप्प्याने सोडलेले पाणी दानोळी येथून उपसा होणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या आणि वारणा काठावरील अन्य गावांसाठी आवश्यक पाण्याचा अंतर्भाव नाही. अशी वस्तूस्थिती असताना दानोळी परिसरातील लोकांना कोणीतरी उठवून बसविले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली. मात्र, आमदार उल्हास पाटील आणि प्रसंगी खासदार राजू शेट्टी यांना विनंती करून तेथील शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली जाईल; पण पिण्याच्या पाण्यासाठी विरोधाचे राजकारण नको, असेही आमदार म्हणाले.