शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचे राजकारण

By admin | Updated: April 9, 2016 00:07 IST

इचलकरंजीत संतप्त प्रतिक्रिया : वारणेतून आरक्षित पाण्याचा उपसा, शेती सिंचनावर परिणाम नाही : हाळवणकर

राजाराम पाटील -- इचलकरंजी -तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि आसपासच्या खेडेगावांतील ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दानोळी (ता. शिरोळ) परिसरातील काहीजण आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चौगुले राजकीय विरोध करीत असल्याबद्दल इचलकरंजीत शुक्रवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, वारणा नळ पाणी योजनेसाठी इचलकरंजीसाठी आरक्षित असलेलेच पाणी दानोळी येथून उचलले जाणार आहे. त्याचा शेती सिंचन किंवा त्या परिसरातील गावांच्या पाणी कमतरतेवर कसलाही परिणाम होणार नाही, असे आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हटले आहे.शहरास पंचगंगा व कृष्णा अशा दोन नद्यांमधून पाणीपुरवठा होतो. दोन्हीही नद्यांना भरपूर पाणी असताना दररोज ५० दशलक्ष लिटर पाणी उचलून ते शुद्ध करून नागरिकांना पुरविले जाते. त्यावेळी दोन दिवसांतून एक वेळ पाणी दिले जाते. जानेवारी महिन्यात पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्याने तेथून पाणी उपसा बंद होतो. त्यामुळे कृष्णा नदीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. कृष्णा नदी दररोज ४० दशलक्ष लिटर पाणी पुरवत असली तरी दाबनलिकेवरील पाणी गळती आणि पाण्याची चोरी यामुळे प्रत्यक्ष ३५ दशलक्ष लिटर पाणीच जलशुद्धिकरण केंद्रात पोहोचते आणि मग तीन ते चार दिवसांतून एकवेळ पाणी शहरवासीयांना दिले जाते.अलीकडील चार वर्षात कृष्णा नदीवर म्हैसाळ योजना झाली आणि तीमधून प्रचंड पाणी कृष्णेतून उचलले जाऊ लागले. त्याचा परिणाम राजापूर बंधाऱ्यासाठी पाणी कमी पडण्यावर झाला. गेल्या दोन वर्षांपासून मे महिन्यात इचलकरंजीसाठी पाणी उपसा करणारे मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील पंप उघडे पडू लागले. त्यामुळे इचलकरंजीस पाण्यासाठी आणखीन पर्यायी जलस्रोत शोधण्यात आले. काळम्मावाडी धरणातून थेट पाणी आणण्याच्या योजनेस येणारा प्रचंड खर्च (सुमारे ६५० कोटी रुपये) आणि त्यानंतर पालिकेला वीज बिल व देखभाल-दुरूस्ती खर्चही जमणार नाही. म्हणून ‘काळम्मावाडी’ करण्यास शासनानेच नकार दिला. त्यामुळे वारणा नदीतून पाणी आणण्याचा पर्याय समोर आला.अशा पार्श्वभूमीवर यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पंचगंगा नदीतून पाणी उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला. नदीपात्रात पूर्वीपासूनच असलेल्या बंधाऱ्याला बरगे घालून त्यातून पाणी देण्यात येऊ लागले. पिण्यासाठी पाणी उपसा होत असतानाही बंधाऱ्याचे बरगे काढा, नाही तर कृष्णा योजनेचे नळ फोडू, अशी वल्गना ‘स्वाभिमानी’चे चौगुले यांनी करून राजकीय स्टंट केल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. विरोध गैरसमजुतीतून : वस्तूस्थिती समजून घ्यादानोळी येथील वारणा नदीतून इचलकरंजीस पाणी उचलण्यास होणारा विरोध गैरसमजुतीतून आहे. वारणा धरणात इचलकरंजी शहरासाठी आवश्यक एक टीएमसी पाण्याचे आरक्षण असून, टप्प्याटप्प्याने सोडलेले पाणी दानोळी येथून उपसा होणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या आणि वारणा काठावरील अन्य गावांसाठी आवश्यक पाण्याचा अंतर्भाव नाही. अशी वस्तूस्थिती असताना दानोळी परिसरातील लोकांना कोणीतरी उठवून बसविले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली. मात्र, आमदार उल्हास पाटील आणि प्रसंगी खासदार राजू शेट्टी यांना विनंती करून तेथील शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली जाईल; पण पिण्याच्या पाण्यासाठी विरोधाचे राजकारण नको, असेही आमदार म्हणाले.