शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: December 2, 2014 23:17 IST

शिरढोण, टाकवडेतील योजना : काम अपूर्ण; ग्रामस्थांची गैरसोय

गणपती कोळी - कुरुंदवाड --शिरढोण व टाकवडे गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दोन्ही गावांच्या नेत्यांनी राजकीय वजन वापरून राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून कामालाही सुरुवात झाली. काम अर्ध्यावर येताच योजनेत कारभाऱ्यांनी इतरांना विश्वासात न घेणे, एकतंत्री कारभार, ठेकेदारांच्या चुका, काहींची दुखावलेली मने यातून निर्माण झालेल्या आंदोलनामुळे दोन्ही गावांच्या योजना रखडल्या आहेत. सत्ताधारी व विरोधकांच्या जुगलबंदीत ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांचा घसा मात्र पाण्याविना कोरडा राहण्याची शक्यता आहे. दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील शिरढोण व टाकवडे गावाला बसतो. टाकवडेसाठी इचलकरंजी नगरपालिकेकडून पिण्यासाठी फिल्टर झालेले पाणी दिले जाते. मात्र, वाढलेली लोकसंख्या, योजनेला असलेली गळती, अपुरा व अनियमित होत असलेला पाणीपुरवठा यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामपंचायतीने पाण्यासाठी कुरुंदवाड येथील कृष्णा नदीतून राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. या योजनेसाठी चार कोटी १६ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर होऊन काम चालू झाले आहे.शिरढोण ग्रामस्थांना पंचगंगेतून पाणीपुरवठा होत असल्यामुळे या दूषित पाण्यापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी या गावानेही स्वतंत्ररीत्या कुरुंदवाड कृष्णा नदीतून चार कोटी ९५ लाख रुपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून घेतली. दोन्ही गावांच्या स्वतंत्र योजना असल्या, तरी ठेकेदार मात्र एकटाच आहे. योजनेतील त्रुटी, कारभाऱ्यांनी इतरांना विश्वासात न घेतल्यामुळे दुखावलेली मने, ठेकेदारांच्या चुका यातून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही योजना स्वतंत्र असताना ठेकेदारांनी एकाच चरीतून दोन्ही गावांच्या जलवाहिन्या घातल्या आहेत. ते चुकीचे आहे. यावरून शिरढोणचे माजी सरपंच रमेश ढाले व मधुकर सासणे यांनी उपोषणाचे शस्त्र घेऊन योजना स्वतंत्र केल्याशिवाय काम चालू न करण्याचा इशारा ठेकेदारांना दिला आहे. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून योजनेचे काम बंद पडले आहे. तर टाकवडेचे माजी सरपंच सुजाउद्दीन मुल्ला, सदाशिव पाटील यांनीही निकृष्ठ दर्जाचे काम निविदेप्रमाणे होत नसल्याचा आरोप करून काम बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला .