शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जिल्ह्यात 'मनसे'चे इंजिन झाले ब्लॉक

By admin | Updated: October 20, 2014 00:44 IST

माजी आमदारांनादीड हजार मते

 

नाशिक : प्रचंड चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशी काडीमोड घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या शिवसेनेला ही विधानसभा निवडणूक संमिश्र ठरली असून, त्या तुलनेत भाजपाचे कमळ एकावरून चारवर गेल्याचे दिसून आले. मात्र सेनेची संख्या चारवरून चारच राहिल्याने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वाने ही निवडणूक गेल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांचे राज्यात शिवसेनाच नंबर एकला राहण्याच्या अभिवचनाला जिल्ह्यातील शिवसैनिकांबरोबरच मतदारही जागल्याचेच यानिमित्ताने पुढे आले आहे. राज्यभरात सभांची हाफ सेंच्युरी पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात एक- दोन नव्हे, तर चक्क तीन-तीन सभा घेतल्या. त्यात मनमाड, येवला व नाशिकच्या सभेचा चांगलाच परिणाम देवळाली, सिन्नर, मालेगाव बाह्य आणि निफाड मतदारसंघाला झाल्याचे निकालावरून दिसून येते.येवल्यात तर पालकमंत्र्यांसारखा मातब्बर आणि कसलेला राजकारणी असूनही तुलनेने नवख्या असलेल्या संभाजी पवार यांनी बऱ्यापैकी लढत दिली. इगतपुरी मतदारसंघात शिवसेनेचे तसे पाहिले तर प्राबल्य नसले, तरी राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमधीलच काही बंडखोर आणि एकवटलेला निष्ठावान शिवसैनिक यांच्यामुळे इगतपुरीतून शिवराम झोले निवडून येण्याची शक्यता होती; मात्र आदिवासी मतदारांनी पुन्हा पंजालाच हात दिला. त्यामानाने सिन्नर विधानसभेची निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याने डोंगराएवढी विकासकामे करूनही माणिकराव कोकाटेंनी आमदारकी तोंडाळ वाणीने घालविली अन् त्याला काही अंशी वंजारी समाजाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जोड लाभल्यानेच शिवसेनेचे राजाभाऊ वाजे हे माणिकरावांना हरवू शकले, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. नाशिक शहरात अक्षरश: गुंडगिरी आणि तडीपारीची प्रतिमा तयार झालेल्या सुहास कांदेना विधानसभेत पाठविण्याची तयारी केल्याचे बोलले जात होते; मात्र मतदारांनी पुन्हा एकदा विकासालाच पसंती दिल्याने येथील सेनेची जागा येण्याची शक्यताही मावळली, असेच म्हणावे लागेल. शिवसेनेची सर्वात खात्रीशीर जागा असलेल्या मालेगाव बाह्यमधून अपेक्षेप्रमाणे आणि काहीशी अपेक्षित आघाडी घेऊन दादा भुसे तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले असून, कदाचित त्यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. तीच बाब काठावर पास झालेल्या अनिल कदम यांच्या बाबतीतही होऊ शकते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पराभूत मनोवृत्ती बाळगणाऱ्या अनिल कदम यांना शिवसैनिकांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्याच सभेचे टॉनिक आणि राष्ट्रवादीची छुपी मदत मिळाल्याची चर्चा आहे. सेनेने मागील वेळेप्रमाणेच चार जागा राखण्यात यश मिळविले असले, तरी त्यांना दिंडोरीची जागा गमवावी लागली. मात्र दिंडोरीच्या बदल्यात त्यांना सिन्नरच्या जागेचा लाभ झाला. सेनेला जिल्ह्यातून किमान सहा ते सात जागांची अपेक्षा होती; मात्र त्यांची निराशाच झाली. शहरात तर बबनराव घोलपांचा करिश्माच योगेश घोलप यांना तारू शकला असला, तरी बोरस्ते आणि बडगुजर कंपनी सपेशल अपयशी ठरली. शहरात काही मावळ्यांनीच फंदफितुरी केल्याची चर्चा आहे.