शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

शेतीपंपासाठी परतावा नसणारी ‘डी.डी.एफ.’ योजना

By admin | Updated: February 18, 2015 23:44 IST

शेतकऱ्यांवर अन्याय : घरगुती, औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के परतावा देणारी योजना

दत्ता बीडकर - हातकणंगले -शेतकऱ्यांना शंभर टक्के खर्च करून वीज जोडणी घेतात. कोणताही परतावा न मिळणारी डी. डी. एफ. योजना महावितरणकडून राबविण्यात येत आहे. यामुळे घरगुती, औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के परतावा देणारी योजना आहे. मात्र, शेती पंपाना वीज देताना शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.महावितरणकडे दिवसाला एक औद्योगिक ग्राहक आला, तर शेतीपंपासाठी २५ ग्राहक येतात. अशी आजची स्थिती आहे. विहिरी, ओढे आणि नदी वाहत असून ही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन नसल्याने शेतकरी गप्प आहे. महावितरणकडून घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी नॉन डी. डी. एफ. म्हणजे वीज ग्राहकांने महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे स्वत: रक्कम खर्च करून वीज कनेक्शन तत्काळ घेणे. या नॉन डी. डी. एफ. योजनेतून वीज ग्राहकांना पन्नास टक्के रक्कम वीज बिलातून परतावा देण्याची सोय आहे. यामुळे पन्नास टक्के रक्कम घालून वीज ग्राहक आपली गरज ओळखून वीज कनेक्शन घेत असतो. मात्र, यामध्येही महावितरण या वीज ग्राहकांवर अन्याय करते. एक लाखापासून पाच-दहा लाखांपर्यंत वीज ग्राहक रक्कम खर्च करून वीज कनेक्शन घेत असताना महावितरण आपल्या अंदाजपत्रकातील फक्त माल मटेरिअलची रक्कम वीज ग्राहकांना परतावा करते. या कामासाठी लागणाऱ्या मंजुरीची रक्कम देताना ही वीज ग्राहकांवर अन्याय करते.घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांना नॉन डीडीएफ योजना पन्नास टक्के परताव्यासह चालू असताना ही योजना शेतिप्रधान राज्यामध्ये शेतकऱ्यांना लागू नाही. शेतीपंपाच्या विजेसाठी शेतकऱ्याने शंभर टक्के रक्कम खर्च करायची, त्याचा कोणताही परतावा मिळत नाही. यामुळे शेती वीजपंपाच्या जोडण्या ठप्प आहेत. विहिरी, नाले, नद्यांमध्ये भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे पाण्याकडे बघावे लागत आहे. महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे चार-सहा पोल टाकून वीजपुरवठा करणे मुश्कील झाले आहे. रोहीच्या जोडणीमध्येही सुसूत्रता नाही. यामुळे महावितरणच्या कारभाराला शेतकरी वैतागला आहे. शंभर टक्के रक्कम भरून वीज कनेक्शन घेणे शेतकऱ्यांना शक्य नाही, अशी वस्तुस्थिती असताना महावितरणकडून शेतकऱ्यांचीच अडवणूक केली जात आहे. वीज बिलातून परतावा रक्कम मिळाल्यास आज चार दोन पोलसाठी थांबलेली हजारो वीज कनेक्शन तत्काळ मिळून शेतकऱ्यांच्या जीवनात हिरवीगार बाग फुलेल. शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारे शासन आणि महावितरणचे अधिकारी या योजनेला राजी होतील का? याबाबत साशंकता वाटते. (उत्तरार्थ) शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीज जोडणीबाबत कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि संबंधित कार्यकारी अभियंता यांनी वस्तुस्थितीची माहिती शासनस्तरावर पुरविणे गरजेचे आहे.शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांवर होणारे अन्याय महावितरणच्या यंत्रणेमार्फतच शासनापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे.