शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

शेतीपंपासाठी परतावा नसणारी ‘डी.डी.एफ.’ योजना

By admin | Updated: February 18, 2015 23:44 IST

शेतकऱ्यांवर अन्याय : घरगुती, औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के परतावा देणारी योजना

दत्ता बीडकर - हातकणंगले -शेतकऱ्यांना शंभर टक्के खर्च करून वीज जोडणी घेतात. कोणताही परतावा न मिळणारी डी. डी. एफ. योजना महावितरणकडून राबविण्यात येत आहे. यामुळे घरगुती, औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के परतावा देणारी योजना आहे. मात्र, शेती पंपाना वीज देताना शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.महावितरणकडे दिवसाला एक औद्योगिक ग्राहक आला, तर शेतीपंपासाठी २५ ग्राहक येतात. अशी आजची स्थिती आहे. विहिरी, ओढे आणि नदी वाहत असून ही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन नसल्याने शेतकरी गप्प आहे. महावितरणकडून घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी नॉन डी. डी. एफ. म्हणजे वीज ग्राहकांने महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे स्वत: रक्कम खर्च करून वीज कनेक्शन तत्काळ घेणे. या नॉन डी. डी. एफ. योजनेतून वीज ग्राहकांना पन्नास टक्के रक्कम वीज बिलातून परतावा देण्याची सोय आहे. यामुळे पन्नास टक्के रक्कम घालून वीज ग्राहक आपली गरज ओळखून वीज कनेक्शन घेत असतो. मात्र, यामध्येही महावितरण या वीज ग्राहकांवर अन्याय करते. एक लाखापासून पाच-दहा लाखांपर्यंत वीज ग्राहक रक्कम खर्च करून वीज कनेक्शन घेत असताना महावितरण आपल्या अंदाजपत्रकातील फक्त माल मटेरिअलची रक्कम वीज ग्राहकांना परतावा करते. या कामासाठी लागणाऱ्या मंजुरीची रक्कम देताना ही वीज ग्राहकांवर अन्याय करते.घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांना नॉन डीडीएफ योजना पन्नास टक्के परताव्यासह चालू असताना ही योजना शेतिप्रधान राज्यामध्ये शेतकऱ्यांना लागू नाही. शेतीपंपाच्या विजेसाठी शेतकऱ्याने शंभर टक्के रक्कम खर्च करायची, त्याचा कोणताही परतावा मिळत नाही. यामुळे शेती वीजपंपाच्या जोडण्या ठप्प आहेत. विहिरी, नाले, नद्यांमध्ये भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे पाण्याकडे बघावे लागत आहे. महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे चार-सहा पोल टाकून वीजपुरवठा करणे मुश्कील झाले आहे. रोहीच्या जोडणीमध्येही सुसूत्रता नाही. यामुळे महावितरणच्या कारभाराला शेतकरी वैतागला आहे. शंभर टक्के रक्कम भरून वीज कनेक्शन घेणे शेतकऱ्यांना शक्य नाही, अशी वस्तुस्थिती असताना महावितरणकडून शेतकऱ्यांचीच अडवणूक केली जात आहे. वीज बिलातून परतावा रक्कम मिळाल्यास आज चार दोन पोलसाठी थांबलेली हजारो वीज कनेक्शन तत्काळ मिळून शेतकऱ्यांच्या जीवनात हिरवीगार बाग फुलेल. शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारे शासन आणि महावितरणचे अधिकारी या योजनेला राजी होतील का? याबाबत साशंकता वाटते. (उत्तरार्थ) शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीज जोडणीबाबत कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि संबंधित कार्यकारी अभियंता यांनी वस्तुस्थितीची माहिती शासनस्तरावर पुरविणे गरजेचे आहे.शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांवर होणारे अन्याय महावितरणच्या यंत्रणेमार्फतच शासनापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे.