शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

‘गॅलिडियर’ शेतीतून दररोज उत्पन्न

By admin | Updated: December 9, 2014 00:26 IST

कोगे येथील कृष्णात चव्हाण यांचा शेतीत प्रयोग : गुलाब शेतीतून सलग सहा वर्षे उत्पन्नाचा स्रोत

प्रकाश पाटील - कोपार्डे -नोकरीची शाश्वती नसली तरी हक्काची शेती होती. जवळपास ८ ते १० एक र जमीन असली तरी ती पारंपरिक ऊस पीक शेतीसाठीच वापरली जात होती. यातून मिळणारे उत्पन्न हे ऊस तुटून गेल्यानंतर साखर कारखानदार कधी देतील तेव्हाच, म्हणून कोगे (ता. करवीर) येथील तरुण शेतकरी कृष्णात दत्तात्रय चव्हाण याने दररोज शेतीतून किमान उत्पन्नाचा स्रोत राहावा यासाठी शोध सुरू केला. त्यातून त्यांना गॅलिडियर (गुलाब) हा पर्याय मित्रांनी सुचविला. यातून माहिती व तंत्रज्ञान घेत त्यांनी जून २००९ मध्ये आपल्या जमिनीतील केवळ अर्धा एकर जमीन गुलाब शेतीखाली आणली आहे. कृष्णात चव्हाण हे ‘गोकुळ’मध्ये रोजंदारीवर होते. मात्र, बरीच वर्षे नोकरी करूनही रोजंदारी नोकरीला कायम नोकरीची हमी मिळेना. त्यातच ८ ते १० एकर असणारी जमीन दुर्लक्षित होऊ लागली म्हणून त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. मात्र, दररोजचा घरखर्च व शेतीचा खर्च भागविण्यासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण मार्ग स्वीकारायचा प्रयत्न त्यांनी केला. मित्राच्या सल्ल्याने त्यांनी गुलाबशेती करण्याचा निर्णय घेतला. जून २००९ मध्ये कृष्णात यांनी आष्टा (ता. वाळवा) येथून गॅलिडियर (गुलाब)ची जंगली रोपे आणून २० गुंठ्यांत लावण केली. डिसेंबर २००९ मध्ये टपोरी गुलाबाची फुले लागू लागली. तासगाव, विटा या भागांत दुष्काळी परिस्थिती असल्याने तेथून गुलाब फुलांची कोल्हापूरमध्ये आवक कमी होती. त्यातच लग्नसराई असल्याने या हंगामात फुलाला ५ रुपयांपासून १० रुपयांपर्यंत दर आला. पहिल्याच वर्षी किमान दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. तेव्हापासून याच रोपांच्या लावणीतून सतत सहा वर्षे आपण किमान वार्षिक लाख ते सव्वा लाख रुपये घेत आहे. दररोज टपोरी फुलांची झाडांना आवक होत असते. दररोज ३०० ते ४०० रुपयांची फुले आपण शेतात, गावात व बाजारात विकत असल्याचे सांगत गॅलिडियर शेती (गुलाब शेती) फायद्याची असल्याचे सांगितले. सर्व खर्च वजा जाता ७० ते ८० टक्के नफा राहत असल्याचेही कृष्णात चव्हाण यांनी सांगितले. ही शेती उसासारखी आळस करून चालत नाही. दररोज हवामानाप्रमाणे कीड व रोगांचे निरीक्षण करून कीटकनाशक फवारणी करावी लागते. इतर पिकांना जी खते आहेत तीच वापरात आहे. आता ठिबक पद्धतीचा अवलंब केल्याने महिन्यातून एकदाच खुरपणी करावी लागते. ऊसशेतीला पूरक अशी गॅलिडियर शेती (गुलाब शेती) होऊन दररोजचा आर्थिक स्रोत मिळू शकतो. - कृष्णात चव्हाण