शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पाचवी ते आठवीचे वर्ग उद्यापासून दोन सत्रांमध्ये भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:11 IST

कोल्हापूर : शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवार (दि. २७) पासून दोन सत्रांमध्ये भरणार ...

कोल्हापूर : शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवार (दि. २७) पासून दोन सत्रांमध्ये भरणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शाळांमधील शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था आदी स्वरूपातील तयारी शाळांकडून करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि लसीकरणाची सुरूवात करण्यात आल्याने शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तब्बल दहा महिन्यांनंतर बुधवारपासून हे वर्ग सुरू होतील. शाळेच्या वेळेत वर्ग भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात बहुतांश शाळांनी सकाळी आठ ते अकरा आणि सकाळी अकरा ते दुपारी दोन या सत्रांमध्ये वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे. पालकांची संमतीपत्रे असलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एका बेंचवर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था असणार आहे. वर्ग सुरू होण्यापूर्वी संबंधित शाळेतील किमान एका तरी शिक्षकाची आरटीपीसीआर चाचणी होणे आवश्यक आहे. वर्ग सुरू करण्याबाबत काही शाळांनी पालकांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेऊन वर्ग सुरू करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना केल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सोमवारी दिली.

चौकट

तपासणी केंद्रांअभावी अडचण

इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग हे दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्याने माध्यमिकच्या बहुतांश शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी त्यावेळी पूर्ण झाली आहे. पाचवी ते आठवीच्या वर्गांच्या ५०३६ शिक्षकांची चाचणी होणे बाकी आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर चाचणीसाठीची सहा केंद्रे कार्यान्वित आहे. त्याची क्षमता लक्षात घेता, ही केंद्रे कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांची अडचण होणार असल्याचे चित्र आहे.

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

शाळांची संख्या : १०५४

शिक्षकांची संख्या :१२६२९

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या : २,३१,९९६