शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

गटातटाच्या भक्कम तटबंदीचा ‘कागल’

By admin | Updated: September 16, 2014 00:08 IST

जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ : दिग्गज नेत्यांची पिढी राज्याच्या राजकारणात

जहाँगीर शेख - कागल -कोल्हापूर संस्थानाबरोबरच कागलची जहागिरीही भारतात विलीन झाल्यानंतर १९५० मध्ये ८० गावांचा कागल तालुका अस्तित्वात आला. १९९२ पासून कागल विधानसभा मतदारसंघ सुरू झाला. २००९ पर्यंत यात बदल नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ऐवजी १० मतदारसंघ पुनर्रचित करण्याच्या प्रक्रियेत कागल मतदारसंघाला गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज शहर, कडगांव, कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आजरा तालुक्यातील उत्तूर जि. प. मतदारसंघ जोडून हा नवा कागल विधानसभा मतदारसंघ बनविण्यात आला. पुनर्रचित नव्या मतदारसंघानंतरची ही आता दुसरी विधानसभा निवडणूक होत आहे.गटा-तटाच्या भक्कम तटबंदीचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी बिरुदावली मिळविलेल्या या मतदारसंघाने दिग्गज नेत्यांची पिढी राज्याच्या राजकारणाला दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय उलाढालीने जिल्ह्याच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकीय भूगोलात बदल घडवून दाखविले आहेत. १९५२ मध्ये पहिले आमदार शिक्षणमहर्षी एम. आर. देसाई (कोल्हापूर) अपक्ष म्हणून, तर १९५७ ला पहिल्या महिला आमदार विमलाताई कागल एकीकरण समितीकडून, तर १९६२ ला राज्याच्या राजकारणात ‘तरुण तुर्क’ म्हणून प्रसिद्ध झालेले शामराव भिवाजी पाटील (मौ. सांगाव) हे आणि १९६७ला स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्यारूपाने चौथा आमदार लाभला. मात्र, खऱ्या अर्थाने कागलचा राजकीय भूगोल बदलला तो १९७२ नंतर सदाशिवराव मंडलिक हे आमदार झाले. विक्रमसिंह घाटगेंचा राजकीय उदय झाला. १९७८ मध्ये घाटगे आमदार झाले. १९८० मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले, तर १९८५ची विधानसभा ही प्रचंड राजकीय ईर्ष्येतून लढविली जाऊन अवघ्या २६१ मतांनी मंडलिकांनी घाटगेंचा पराभव केला. यानंतरच्या काळात हसन मुश्रीफ यांचा बोलबाला झाला. प्रत्युत्तरादाखल संजय घाटगेंनाही ‘राजकीय ट्रॅक’ मिळाला. १९९५ पर्यंत मंडलिकांनी आमदारकी भूषविली. १९९८ला मंडलिक खासदार झाल्यामुळे पोटनिवडणुकीत संजय घाटगेंनी मुश्रीफांचा पराभव केला; मात्र १९९९ला राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना मुश्रीफांच्या पथ्यावर पडली. त्यांनी संजय घाटगे (कॉँग्रेस)चा पराभव केला. त्यानंतर १५ वर्षे ते आमदार, तर १४ वर्षे मंत्री आहेत. संजय मंडलिकांनीही २००९ची आमदारकी अजमावली. या मतदारसंघावर कॉँग्रेस, राष्ट्रवादी, एस कॉँग्रेस अशा कॉँग्रेशी विचारांचाच प्रभाव दीर्घकाळ राहिला. अपक्ष, शिवसेना, एकीकरण समिती यांनाही येथे संधी मिळालेली आहे.घाटगे-मंडलिकांचा प्रभावया मतदारसंघावर सर्वाधिक प्रभाव विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक या दोन नेत्यांचाच राहिला आहे. मंडलिक चारवेळा, तर घाटगे दोनवेळा आमदार झाले आहेत. या दोघांपासून राजकीय कारकीर्द प्रारंभ करणारे हसन मुश्रीफ यांनी तीनवेळा, तर संजय घाटगेंनी एक वर्षाची आमदारकी भूषविली आहे. यापैकी मंडलिक-मुश्रीफ या दोघांनी जिल्ह्याच्या राजकारणावरही ‘कमांड’ ठेवली आहे.५