शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

गटातटाच्या भक्कम तटबंदीचा ‘कागल’

By admin | Updated: September 16, 2014 00:08 IST

जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ : दिग्गज नेत्यांची पिढी राज्याच्या राजकारणात

जहाँगीर शेख - कागल -कोल्हापूर संस्थानाबरोबरच कागलची जहागिरीही भारतात विलीन झाल्यानंतर १९५० मध्ये ८० गावांचा कागल तालुका अस्तित्वात आला. १९९२ पासून कागल विधानसभा मतदारसंघ सुरू झाला. २००९ पर्यंत यात बदल नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ऐवजी १० मतदारसंघ पुनर्रचित करण्याच्या प्रक्रियेत कागल मतदारसंघाला गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज शहर, कडगांव, कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आजरा तालुक्यातील उत्तूर जि. प. मतदारसंघ जोडून हा नवा कागल विधानसभा मतदारसंघ बनविण्यात आला. पुनर्रचित नव्या मतदारसंघानंतरची ही आता दुसरी विधानसभा निवडणूक होत आहे.गटा-तटाच्या भक्कम तटबंदीचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी बिरुदावली मिळविलेल्या या मतदारसंघाने दिग्गज नेत्यांची पिढी राज्याच्या राजकारणाला दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय उलाढालीने जिल्ह्याच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकीय भूगोलात बदल घडवून दाखविले आहेत. १९५२ मध्ये पहिले आमदार शिक्षणमहर्षी एम. आर. देसाई (कोल्हापूर) अपक्ष म्हणून, तर १९५७ ला पहिल्या महिला आमदार विमलाताई कागल एकीकरण समितीकडून, तर १९६२ ला राज्याच्या राजकारणात ‘तरुण तुर्क’ म्हणून प्रसिद्ध झालेले शामराव भिवाजी पाटील (मौ. सांगाव) हे आणि १९६७ला स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्यारूपाने चौथा आमदार लाभला. मात्र, खऱ्या अर्थाने कागलचा राजकीय भूगोल बदलला तो १९७२ नंतर सदाशिवराव मंडलिक हे आमदार झाले. विक्रमसिंह घाटगेंचा राजकीय उदय झाला. १९७८ मध्ये घाटगे आमदार झाले. १९८० मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले, तर १९८५ची विधानसभा ही प्रचंड राजकीय ईर्ष्येतून लढविली जाऊन अवघ्या २६१ मतांनी मंडलिकांनी घाटगेंचा पराभव केला. यानंतरच्या काळात हसन मुश्रीफ यांचा बोलबाला झाला. प्रत्युत्तरादाखल संजय घाटगेंनाही ‘राजकीय ट्रॅक’ मिळाला. १९९५ पर्यंत मंडलिकांनी आमदारकी भूषविली. १९९८ला मंडलिक खासदार झाल्यामुळे पोटनिवडणुकीत संजय घाटगेंनी मुश्रीफांचा पराभव केला; मात्र १९९९ला राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना मुश्रीफांच्या पथ्यावर पडली. त्यांनी संजय घाटगे (कॉँग्रेस)चा पराभव केला. त्यानंतर १५ वर्षे ते आमदार, तर १४ वर्षे मंत्री आहेत. संजय मंडलिकांनीही २००९ची आमदारकी अजमावली. या मतदारसंघावर कॉँग्रेस, राष्ट्रवादी, एस कॉँग्रेस अशा कॉँग्रेशी विचारांचाच प्रभाव दीर्घकाळ राहिला. अपक्ष, शिवसेना, एकीकरण समिती यांनाही येथे संधी मिळालेली आहे.घाटगे-मंडलिकांचा प्रभावया मतदारसंघावर सर्वाधिक प्रभाव विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक या दोन नेत्यांचाच राहिला आहे. मंडलिक चारवेळा, तर घाटगे दोनवेळा आमदार झाले आहेत. या दोघांपासून राजकीय कारकीर्द प्रारंभ करणारे हसन मुश्रीफ यांनी तीनवेळा, तर संजय घाटगेंनी एक वर्षाची आमदारकी भूषविली आहे. यापैकी मंडलिक-मुश्रीफ या दोघांनी जिल्ह्याच्या राजकारणावरही ‘कमांड’ ठेवली आहे.५