शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

बळिराजाला पावसाची आस...

By admin | Updated: June 29, 2014 00:49 IST

खरीप करपू लागले : दहा दिवस पावसाचा थेंबही नाही; पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

कोल्हापूर : गेली दहा दिवस पावसाचा एक थेंबही पडला नसल्याने खरीप पिके करपू लागल्याने बळिराजाच्या नजरा ढगांकडे लागल्या आहेत. आणखी पाच-सहा दिवस पावसाने दडी मारली, तर दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यावर येण्याची शक्यता आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत धूळवाफ पेरण्या लवकर झाल्या होत्या. गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाने एकदम सुरुवात केल्याने शेतकरी अडकला होता. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात वळीव पाऊस चांगला झाल्याने धूळवाफ पेरण्या वेळेत झाल्या. परिणामी, खरिपाची उगवणही चांगली झाली. १९ जूनला मान्सून सक्रीय झाला. जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप ज्वारी, सोयाबीन, भूईमुगाच्या पेरण्या धूमधडाक्यात केल्या. या पिकांची उगवणही जोमात झाली. पण गेली दहा दिवस पाऊस नसल्याने विशेषत: माळरानावरील पिकांची वाईट अवस्था झाली आहे. भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांची उगवण होऊन जेमतेम आठ दिवस झाल्याने त्यांची मुळे कोवळी आहेत. ती वरच असल्याने पिके करपण्याची क्रिया वेगाने होऊ लागली आहे. उनापासून पिकाच्या मुळांचा बचाव व्हावा, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. कोळपणीने तयार झालेली माती पिकांच्या मूळाभोवती लावली जात आहे. जिथे पाण्याची सोय आहे, तिथे पाणी दिले जात असले तरी वीजेच्या लपंडावामुळे ही पीकेही करपू लागली आहेत. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ५ जुलैनंतरच पाऊस सुरू होईल. आणखी पाच-सहा दिवस पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार, हे निश्चित आहे. पावसाने सुरुवात केल्याने मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. ही रोप लागण अडचणीत आली आहे. कावडीने पाणी आणून रोपे जगवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. उसाची मुळे खोलवर जातात. पाण्याविना महिनाभर ऊस पीक तग धरू शकते. त्यामुळे या उघडिपीचा ऊस पिकावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. मात्र माळरानावरील शेतातील पिकांवर मात्र दुबार पेरणीचे संकट आहे. (प्रतिनिधी)