शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

बळिराजाला पावसाची आस...

By admin | Updated: June 29, 2014 00:49 IST

खरीप करपू लागले : दहा दिवस पावसाचा थेंबही नाही; पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

कोल्हापूर : गेली दहा दिवस पावसाचा एक थेंबही पडला नसल्याने खरीप पिके करपू लागल्याने बळिराजाच्या नजरा ढगांकडे लागल्या आहेत. आणखी पाच-सहा दिवस पावसाने दडी मारली, तर दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यावर येण्याची शक्यता आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत धूळवाफ पेरण्या लवकर झाल्या होत्या. गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाने एकदम सुरुवात केल्याने शेतकरी अडकला होता. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात वळीव पाऊस चांगला झाल्याने धूळवाफ पेरण्या वेळेत झाल्या. परिणामी, खरिपाची उगवणही चांगली झाली. १९ जूनला मान्सून सक्रीय झाला. जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप ज्वारी, सोयाबीन, भूईमुगाच्या पेरण्या धूमधडाक्यात केल्या. या पिकांची उगवणही जोमात झाली. पण गेली दहा दिवस पाऊस नसल्याने विशेषत: माळरानावरील पिकांची वाईट अवस्था झाली आहे. भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांची उगवण होऊन जेमतेम आठ दिवस झाल्याने त्यांची मुळे कोवळी आहेत. ती वरच असल्याने पिके करपण्याची क्रिया वेगाने होऊ लागली आहे. उनापासून पिकाच्या मुळांचा बचाव व्हावा, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. कोळपणीने तयार झालेली माती पिकांच्या मूळाभोवती लावली जात आहे. जिथे पाण्याची सोय आहे, तिथे पाणी दिले जात असले तरी वीजेच्या लपंडावामुळे ही पीकेही करपू लागली आहेत. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ५ जुलैनंतरच पाऊस सुरू होईल. आणखी पाच-सहा दिवस पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार, हे निश्चित आहे. पावसाने सुरुवात केल्याने मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. ही रोप लागण अडचणीत आली आहे. कावडीने पाणी आणून रोपे जगवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. उसाची मुळे खोलवर जातात. पाण्याविना महिनाभर ऊस पीक तग धरू शकते. त्यामुळे या उघडिपीचा ऊस पिकावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. मात्र माळरानावरील शेतातील पिकांवर मात्र दुबार पेरणीचे संकट आहे. (प्रतिनिधी)