शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांच्या दक्षतेने तक्रारीऐवजी पेटीत सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 01:12 IST

नव्या पेट्या बसविल्या : निवारण समितीचे प्रबोधन

कोल्हापूर : छेडछाड करणाऱ्यांविरोधात विद्यार्थिनींनी तक्रार नोंदविण्यासाठी शहरातील महाविद्यालयांत तक्रार, सूचना पेट्या बसविल्या आहेत. मात्र ओळखपत्रांची तपासणी, काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष आणि सीसीटीव्हींची नजर अशा स्वरूपातील महाविद्यालयांच्या दक्षतेमुळे छेडछाड करणाऱ्या प्रवृत्तींना काहीशी जरब बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित पेट्यांमध्ये तक्रारींऐवजी काही सूचनाच विद्यार्थिनींकडून होत असल्याचे दिसत आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) सूचना आणि ‘नॅक’ मूल्यांकनामुळे शहरातील सर्वच महाविद्यालयांनी तक्रार व सूचना पेट्या बसविल्या आहेत. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र होते; पण छेडछाडीला कंटाळून गेल्या दोन महिन्यांपूर्वी बोंद्रेनगर-धनगरवाडा येथील युवती पल्लवी बोडेकरने केलेल्या आत्महत्येमुळे पोलिस, महाविद्यालय प्रशासन हादरले. पोलिस प्रशासनाने महाविद्यालयांना विद्यार्थिनी कक्षात, महाविद्यालयात तक्रारपेटी बसविण्याची सूचना केली. त्यानुसार ज्या महाविद्यालयांत पूर्वीची तक्रार-सूचना पेटी होती, त्यांनी त्यांची जागा बदलली. जेथे पेट्या नव्हत्या, तिथे त्या बसविण्यात आल्या. तसेच शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवी, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करून तक्रार निवारण समित्यांंची स्थापना केली आहे. या समित्यांद्वारे तसेच प्राचार्य स्वत: विद्यार्थिनींना निर्र्भीडपणे तक्रार करण्याबाबत प्रबोधन करीत आहेत. ओळखपत्रांची तपासणी, सीसीटीव्हींची नजर, अशा स्वरूपातील दक्षता महाविद्यालयांकडून घेतली जात असल्याने छेडछाड करणाऱ्यांना जरब बसल्याचे दिसत आहे.पुस्तके मिळत नाहीतविद्यार्थिनींकडून तक्रारी, सूचना केल्या जात आहेत. यामध्ये विद्यार्थिनी कक्षात स्वच्छ पाणी मिळावे, ग्रंथालयात पुस्तके मिळत नाहीत, अशा स्वरूपातील तक्रारी आहेत. महाविद्यालयांतील तक्रार व सूचना पेट्या आठवड्यातून दोन वेळा उघडण्यात येतात. त्यावर अंतर्गत तक्रार निवारण समितीद्वारे कार्यवाही केली जाते. ‘व्हॉट्स अ‍ॅप’ तक्रार छेडछाडविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने महाविद्यालयांच्या आवारात ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर तक्रार नोंद करण्याचे आवाहन केले आहे. यासाठीच्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’ क्रमांकांचे फलक त्यांनी लावले आहेत.एखाद्या विद्यार्थिनीने धाडसाने तक्रार केल्यास तिला न्याय मिळेल, असा विश्वास महाविद्यालयाच्या प्रशासनाने निर्माण करणे आवश्यक आहे. अंतर्गत तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनींचे प्रबोधन करावे.- साधना झाडबुके, संचालिका, संवेदना संस्थाआमच्या महाविद्यालयात तक्रार निवारण समिती कार्यान्वित केली आहे. या समितीसह प्राध्यापक, मी स्वत: विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रबोधन करतो. त्यांना निर्भीडपणे तक्रार करण्यासाठी मार्गदर्शन होते.- आर. पी. लोखंडे, प्राचार्य, महावीर महाविद्यालयमहाविद्यालयात पूर्वीपासूनच तक्रार-सूचना पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याअंतर्गत विविध स्वरूपांतील तक्रारी, सूचनांची दखल घेत आहोत. तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे. - चंद्रशेखर दोडमणी, प्रबंधक, विवेकानंद महाविद्यालयतक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींच्या नावाबाबत गुप्तता राहत नाही. त्यामुळे त्रास होऊनही बहुतांश विद्यार्थिनी तक्रार नोंदवीत नाहीत. शिवाय तक्रारीनंतर ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. - श्वेता परुळेकर, माजी सचिव, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ