शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

...तर बळिराजा समृद्ध होईल

By admin | Updated: November 21, 2015 00:15 IST

विनायक राऊत : किर्लोस कृषी विज्ञान रब्बी मेळाव्याचा समारोप

मालवण : कोकणच्या विकासात शेतीक्षेत्राचे स्थान मोठे आहे. दूध, अंडी, फळभाज्या व अन्य शेती उत्पादनात परावलंबी असलेल्या सिंधुदुर्गला स्वावलंबी आणि समृद्ध बनविण्यासाठी शेतीक्रांती महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांची मानसिकता बदलून व्यावसायिक शेतीकडे वळली पाहिजे. व्यावसायिक शेतीतून येथील शेतकरी राजा नक्कीच समृद्ध होईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. भारतीय कृषी संशोधन परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संचलित कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे आयोजित तीन दिवसीय रब्बी मेळावा-कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची सांगता झाली. यावेळी अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, कल्याण-डोंबिवली नगरसेवक दशरथ घाडीगावकर, सुवर्ण कोकणचे सतीश परब, नगरसेवक गीते, संचालक बंडू सावंत, बाळासाहेब परुळेकर, नितीन सावंत, विज्ञान केंद्राचे पदाधिकारी, शेतकरी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते. महामार्ग चौपदरीकरण, रेल्वे दुपदरीकरण, सावंतवाडी टर्मिनस, चिपी विमानतळ, कोस्टल रोड, कराड चिपळूण मार्गासह होणारा कोल्हापूर सोनवडे घाटमार्ग या मेगा प्रकल्पामुळे येत्या तीन वर्षांत रत्नागिरी, सिंधुदुर्गचा नकाशा निश्चितच बदललेला असेल. कोकण विकासाच्या राजमार्गावर स्वार होईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)शासनाने शेतीला विकासाचा केंद्र्रबिंदू ठेवावासुधीर सावंत म्हणाले, कोकणात शेतीतून प्रगती करताना उत्पादनवाढ महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने ‘मेक इन इंडिया’ आणि औद्योगिकरण हाच विकासाचा केंद्र्रबिंदू न ठेवता शेती, प्रगती आणि विकास यालाही महत्त्व दिले पाहिजे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही याकडे गांभीर्याने पाहून १० ते २३ टक्क्यांपर्यंत दर मिळणाऱ्या शेतकऱ्याला सर्वाधिक दर मिळाल्यास ती खरी क्रांती ठरेल. भारतात स्वातंत्र्यानंतर नांगर धरणारा नेता अथवा बडा अधिकारी झाला नाही. त्यामुळे शेतीचा विकास मागे पडला, असेही सावंत म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले कृषी विषयक विचार मांडले. शासनाने शेतीला विकासाचा केंद्र्रबिंदू ठेवावासुधीर सावंत म्हणाले, कोकणात शेतीतून प्रगती करताना उत्पादनवाढ महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने ‘मेक इन इंडिया’ आणि औद्योगिकरण हाच विकासाचा केंद्र्रबिंदू न ठेवता शेती, प्रगती आणि विकास यालाही महत्त्व दिले पाहिजे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही याकडे गांभीर्याने पाहून १० ते २३ टक्क्यांपर्यंत दर मिळणाऱ्या शेतकऱ्याला सर्वाधिक दर मिळाल्यास ती खरी क्रांती ठरेल. भारतात स्वातंत्र्यानंतर नांगर धरणारा नेता अथवा बडा अधिकारी झाला नाही. त्यामुळे शेतीचा विकास मागे पडला, असेही सावंत म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले कृषी विषयक विचार मांडले.