शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

काेल्हापूर बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील व्यवहार बंद राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. शहरातील भाजीमंडईत दिवसभर शुकशुकाट होता. दूध संकलन जरी सुरळीत झाले असले तरी वाहतूक लवकर केल्याने संकलनात घट झाली आहे.

‘बंद’मुळे एरव्ही वाहतुकीची कोंडी असणाऱ्या शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसत होती. खासगी कार्यालये, दुकाने, बंद राहिल्याने महत्त्वाची कामे असणारेच घराबाहेर पडले होते. दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र त्याही बंद राहिल्या. शासकीय कार्यालयासह औद्योगिक वसाहती सुरू असल्या तरी कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल आलाच नाही. त्यामुळे भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, गूळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. आवक-जावक थांबल्याने साडेचार कोटींची उलाढाल ठप्प झाली. दुधासह जीवनावश्यक वस्तूंना बंदमधून सवलत दिली होती. तरीही ‘गोकुळ’, ‘वारणा’सह इतर दूध संघांनी लवकर संकलन करून वाहने दूध संघात येण्यासाठी प्रयत्न केले. एरव्ही सात वाजता संकलन सुरू होणाऱ्या ठिकाणी साडेपाच वाजताच दूध घेतल्याने संकलन कमी झाले. ‘गोकुळ’चे सकाळच्या पाळीत ५० हजार लिटर, तर ‘वारणा’चे सुमारे पाच हजार लिटर संकलन घटल्याचे सांगण्यात आले. मेडिकल, पेट्रोल-डिझेलचे पंप सुरू असले तरी त्या ठिकाणची उलाढाल कमी झाली. एस. टी. व के. एम. टी.च्या काही बसेस सोडण्यात आल्या; मात्र प्रवासी नसल्याने गाड्या दिवसभर स्थानकातच लावून होत्या. त्यामुळे एस. टी. महामंडळ व के. एम. टी. प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

या दिल्या घोेषणा :

‘जय जवान - जय किसान’, ‘चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव’, ‘शेतकऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्या केंद्राचा धिक्कार असो’, ‘कोण म्हणते कायदा रद्द होत नाही, केल्याशिवाय राहत नाही.’

‘नांगर’ आणि काळ्या टोप्या

‘मावळा कोल्हापूर’ संघटनेचे पदाधिकारी ‘लाकडी नांगर’ घेऊनच बिंदू चौकात आल्याने तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांचे स्कार्फ गळ्यात घातले होते; तर काहींनी काळ्या टोप्या घालून केंद्र सरकारचा निषेध केला.

घोषणांनी बिंदू चौक दणाणला

शिवसेना व डाव्यांचे आंदोलन म्हणजे घोषणांचा अक्षरश: पाऊस असतो. त्यात कॉग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आल्याने बिंदू चौक दणाणून गेला हाेता.

- राजाराम लाेंढे