शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सधन करवीरमध्येच ‘बेटी बचाओ’ला हरताळ

By admin | Updated: January 22, 2015 00:19 IST

समतोल बिघडला : दरहजार मुलांमागे सर्वांत कमी मुली करवीर तालुक्यात

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -जिल्ह्यात मुलांच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण करवीर तालुक्यात सर्वांत कमी आहे. डिसेंबर २०१४ अखेर एक हजार मुलांमागे ८८७ मुली असे चिंताजनक प्रमाण असून सधन, सुशिक्षित लोकच मुलींचा जन्म नाकारण्यात ‘नंबर वन’ राहिल्याचे पुढे आले आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने हरियाणातील मुलींच्या घटत्या संख्येवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहे. यामुळे स्त्री-भ्रूणहत्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  राज्यात कोल्हापूर जिल्ह्याची ओळख ‘सधन’ म्हणून आहे. सधन जिल्हेच स्त्री-भ्रूणहत्येत आघाडीवर राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक संस्था, आरोग्य विभाग यांच्याद्वारे व्यापक जागृती केली जात आहे. गर्भलिंग चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. अंगणवाडी व आरोग्यसेविका यांच्यातर्फे गर्भवती मातेवर प्रसूती होईपर्यंत अप्रत्यक्षपणे नजर ठेवली जात आहे.सध्या विविध माध्यमांतून मुलींच्या जन्माचे स्वागत होत आहे. आता नुकतेच केंद्र शासनही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा उपक्रम राबवीत आहे. तरीही करवीर तालुक्यात मुलींचा टक्का वाढत नसल्याचे समोर आले आहे. या तालुक्यात शहराचा समावेश होतो. शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सामग्री सहजपणे उपलब्ध आहे. सधन आणि उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. प्रशासनाची करडी नजर असली तरी ‘नकोशी’ला गर्भातच मारले जात आहे. करवीर संस्थानची स्थापना केलेल्या रणरागिणी ताराराणीच्या भूमीतच हे शरम आणणारे वास्तव समोर आले आहे.२००१ पासून ३४ मुली वाढल्याकरवीर तालुक्यात २००१ ते २०१४ अखेर फक्त३४ मुली वाढल्या आहेत. आरोग्य विभागाकडून कितीही प्रयत्न केले तरी मुलींचा टक्का वाढत नाही. याउलट डोंगराळ, खेड्यांचा भाग अधिक असलेल्या चंदगड तालुक्यात २००१ मध्ये ९२१ मुली होत्या. डिसेंबर २०१४ अखेर ९८५ अशी मुलींची संख्या झाली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये चंदगड तालुक्यात मुलग्यांपेक्षा मुलींचीसंख्या ११ ने वाढून १०११ झाली होती. अजूनही ‘मुलगाच वंशाचा दिवा’ अशी मानसिकता आहे. समाजात मान अधिक असल्यामुळे स्त्रीलाही मुलगाच हवा असे वाटते. यामुळे गर्भातच स्त्री-भ्रूणाची हत्या केली जात आहे. सहज उपलब्धता, पैसे, सुशिक्षिततेचे प्रमाण अधिक असल्यामुळे शहरात स्त्री-भ्रूण खुडण्याचे प्रमाण अधिक आहे.- तनुजा शिपूरकर, सचिव, महिला दक्षता समितीसधनता, सुशिक्षितता, सहज गर्भलिंग तपासणी सुविधा, आदी कारणांमुळे करवीर तालुक्यात मुलींची संख्या कमी आहे, हे वास्तव आहे. करवीर तालुक्यात मुलींचे प्रमाण का वाढत नाही, याचा शोध घेण्यासाठी ६०० महिलांचा सर्व्हे येत्या १५ ते २० दिवसांत केला जाणार आहे. सर्व्हेतील अहवालानंतर विशेष उपाययोजनांचा आराखडा करण्यात येईल.- डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारीदर हजार मुलांमागे मुलींची संख्या