शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

प्रबोधनाचा सूर्य अस्ताला..!

By admin | Updated: February 22, 2015 01:05 IST

अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी : कॉम्रेड पानसरें को लाल सलाम..; अण्णांचे अधुरे काम पूर्ण करण्याची शपथ

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील पितामह, सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी चंदनाप्रमाणे झिजणारा लढवय्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी येथील पंचगंगा मुक्तिधाममध्ये कोणताही विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या या लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली. मावळतीला गेलेल्या सूर्याच्या साक्षीने हा महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या प्रबोधनाच्या चळवळीतील सूर्यही कायमचा लुप्त झाला. अंत्यसंस्कारास जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी मुठी आवळल्या. ‘कॉम्रेड गोविंद पानसरे को लाल सलाम..लाल सलाम..’ अशी आरोळी दिली. आपले लाडके अण्णा आता पुन्हा कधीच भेटणार नाहीत, या सत्याने अनेकांचा बांध फुटला. पंचगंगेला महापूर यावा तसाच अश्रूंचा लोट मने रिती करून गेला. स्मशानभूमीतून पाय काढताना प्रत्येकाच्या मनांत आपण कधीच भरून येवू शकणार नाही असे काहीतरी गमावून घरी परतत असल्याची भयाण रुखरुख सोबत राहिली. सांगा हिटलरवाद्यांनो, तुम्ही अजून मुडदे पाडणार किती...? अशी शाहिराने केलेली विचारणा अण्णांच्या दु:खाचीही उंची वाढवून गेली. पानसरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दसरा चौक मैदानावर अलोट गर्दी उसळली. अवघ्या कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद ठेवून पानसरे यांना अखेरचा लाल सलाम केला. शुक्रवारी रात्री गोविंद पानसरे यांच्या निधनाची बातमी येथे पोहोचली आणि अवघे कोल्हापूर शोकसागरात बुडाले. तेव्हापासून पानसरे यांचे पार्थिव कोल्हापुरात केव्हा आणणार याची प्रतीक्षा लागून राहिली होती. दसरा चौक मैदानावर हजारोंचा जनसमुदाय हुंदके देत पार्थिवाच्या प्रतीक्षेत होता. ही प्रतीक्षा पार्थिव घेऊन आलेली रुग्णवाहिका पाहून दुपारी सव्वा वाजता संपली आणि उपस्थितांतून ‘अमर रहे, अमर रहे, गोविंद पानसरे अमर रहे’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. गेली पासष्ट वर्षे कोल्हापूरसह राज्यातील रस्त्यावर संघर्ष करणारा आपला नेता निस्तेज पडलेला पाहून जनसमुदायाला आपल्या भावनांना आवर घालणे केवळ अशक्य झाले. ‘रडायचं नाही’ असं सांगूनही कार्यकर्त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत एकमेकांच्या खांद्यावर मान ठेऊन भावनांना वाट करून दिली. (प्रतिनिधी)