शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST

कागल : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दिलेला शब्द पाळत तर नाहीच, पण वीज बिलाबाबत दिलेला शब्द ...

कागल

: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दिलेला शब्द पाळत तर नाहीच, पण वीज बिलाबाबत दिलेला शब्द त्यांनी केवळ आठ दिवसांत फिरविला आहे, तसेच प्रोत्साहन अनुदानाबाबत कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली आहे.

राज्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यासाठी आठ दिवसापूर्वी स्थगिती दिली होती; मात्र अधिवेशन संपताच ही स्थगिती उठवली आहे. त्यांच्या या धोरणामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान व लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्यासाठीची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून हे सरकार राज्यातील शेतकरी व ग्राहकांना दिलासा देईल, अशी आशा होती; परंतु यामध्येही सरकारने फसवणूक केली आहे. मराठा आरक्षण मुद्द्यांवरही सरकार अपयशी ठरले आहे.

चौकट

जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल!

थकबाकीदारांचे वीज कनेक्शन न तोडण्याचा आदेश मागे घेताच वीज कर्मचारी आज पहिल्या दिवशी या ग्राहकांच्या दारात जाऊन वीज कनेक्शन कापत आहेत. हा सर्वसामान्य जनतेवर फार मोठा अन्याय आहे. त्यामुळे कनेक्शन कट करणे तत्काळ थांबवा, अन्यथा सरकारला जनतेच्या फार मोठ्या रोषास सामोरे जावे लागेल, असेही घाटगे म्हणाले.

कृपया समरजित घाटगे यांचा फोटो छापावा.