शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

कृषिक्रांतीचे शिलेदार

By admin | Updated: June 23, 2015 00:16 IST

फलोद्यानशास्त्राचे जनक

वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये वनस्पतींचे सर्व घटक अन्न म्हणून स्वीकारले गेले आहेत. गाजर, बीट, कंदमुळे ही मुळे जशी आहारात वापरली जातात, तशीच पाने हीदेखील अन्न म्हणून वापरली जातात. तृणधान्य ही तर प्रमुख अन्नघटक बनली आहेत. विविध जीवनसत्वे, क्षार यासाठी फळांचा वापर मानवी संस्कृतीचा जेव्हापासूनचा इतिहास माहिती आहे तेव्हापासून दिसून येतो. शबरीची बोरे हे रामायणातील महत्त्वाचे प्रकरण आहे. फळांचे उत्पादन वाढावे यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने फळबागांची निर्मिती करणारे आणि भारतात फलोद्यानशास्त्र विकसित करणारे असे फलोद्यानशास्त्राचे जनक म्हणजे डॉ. एम. एच. मरिगौडा. डॉ. मरिगौडा यांचा जन्म ८ आॅगस्ट १९१६ रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूर येथे झाले. त्यांनी लखनौ विद्यापीठातून वनस्पतीशास्त्राची एम.एस्सी. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९४२ मध्ये सहाय्यक त्यांची उद्यान अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. शासकीय उद्यानाचे अधीक्षक रावबहाद्दूर एच. सी. जावराया यांच्या देखरेखीखाली ते लालबाग उद्यानाचे काम पाहू लागले. त्यांच्या कामातील प्रगती पाहून १९४७ मध्ये फलोद्यानाचे सखोल प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांना रॉयल बोटॅनिकल गार्डन, इंग्लंड येथे पाठविले. येथे सहा महिने उद्यानांचा अभ्यास करून ते अमेरिकेला गेले. तेथे प्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठात पीएच.डी. प्राप्त केली. त्यानंतर लगेच १९५१ मध्ये ते भारतात परतले. परत येताच त्यांना पदोन्नत करून उद्यान उपअधीक्षकाचे पद दिले आणि थोड्याच दिवसांत ते लालबाग उद्यानाचे अधीक्षक बनले. १९६३ मध्ये त्यांना फलोद्यान विभागाचे म्हैसूर राज्याचे संचालक केले. म्हैसूर राज्यात अत्यंत दुर्लक्षित असणाऱ्या फलोद्यान क्षेत्राचा त्यांनी मोठा प्रसार केला. लोकांना फळबागा लावण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यापूर्वी कृषी विभागांतर्गत फलोद्यान विभाग होता. मात्र, मारिगौडा यांनी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून फलोद्यान विभागाची स्वतंत्र निर्मिती केली. त्यांनी फलोद्यानासाठी चतु:सूत्री तयार केली. पूर्ण राज्यात ३८० ठिकाणी फळबागा आणि रोपवाटिका तयार केल्या. या रोपवाटिका नवीन वाणांची निर्मिती करणारे केंद्र होत्या. फळांच्या लागवडीची आणि संगोपनाची नवी तंत्रे निर्मिती केंद्रे बनली. विशेषत: नारळाच्या नव्या वाणांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. बेल्लार आणि कन्नमंगल या केंद्रांनी केलेल्या कायार्मुळे डॉ. मारिगौडा यांचे नाव भारतभर झाले. फळबागांच्या प्रयोगासाठी मारिगौडा यांनी रोपवाटिकाबरोबर प्लॅट प्रोटेक्शन, लॅबोरेटरी, मृद संधारण प्रयोगशाळा आणि बीज चाचणी प्रयोगशाळांची लालबाग उद्यानात स्थापना केली. फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यावर त्यांचे जतन करणे आणि ग्राहकापर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे असते. फळातून अनावश्यक पाणी काढून टाकण्याचे तंत्र आणि यंत्र विकसित केले. त्यांनी विविध वाण स्वत: तयार केले आणि जनतेपर्यंत पोहोचवले. जिरायती शेतीत फळबागा लावण्यासाठी त्यांनी जनतेला प्रोत्साहित केले. निव्वळ पावसाच्या पाण्यावर फळबागा निर्माण करून आदर्श उभा केला. शेतकऱ्यांनीही अनुकरण केले. कोणत्या फळबागेत कोणते आंतरपीक घ्यावे हे स्वत: प्रयोग करून त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या या स्वकामगिरीमुळे कर्नाटक फळांचे राज्य बनले. भरपूर उत्पादन देणारे मलिका आंबा वाण त्यांच्याच काळात प्रसिद्ध झाले. १९७६ ला ते सेवानिवृत्त झाले आणि १९९२ ला निधन होईपर्यंत बंगलोर येथे वास्तव्य केले. मात्र, अखेरच्या श्वासापर्यंत ग्राम विकास आणि फलोद्यान क्षेत्रात ते कार्यरत राहिले.- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर