शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

राज्यातील ८१ कारखान्यांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 12, 2014 00:53 IST

हंगामास वेग : पुणे विभागात सर्वाधिक कारखाने सुरू

कोल्हापूर : पहिल्या उचलीचा तिढा अजून सुटलेला नाहीच परंतु त्यासाठी यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांनीही आंदोलनाची ‘तलवार म्यान’ केल्याने राज्यातील ८१ म्हणजे निम्म्याहून जास्त कारखाने सुरू झाले आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने १० नोव्हेंबरपर्यंत हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांची माहिती दिली असून त्यावरून हे स्पष्ट होत आहे. ऊस आंदोलन चळवळीच्या गेल्या एका तपाच्या संघर्षात यंदा पहिल्यांदाच असे घडले आहे की, पहिल्या उचलीबाबत काहीच ठोस हाती नसताना हंगाम मात्र जोराने सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्णांतील शाहू (कागल) कारखान्याने २५३० रुपये तर शिरोळ तालुक्यातील ‘गुरुदत्त शुगर्स’ने २५३५ रुपये अशी एफआरपी एवढी एकरकमी पहिली उचल जाहीर केली आहे. अन्यथा राज्यभरातील एखादा अपवादवगळता एकाही कारखान्याने उचल किती देणार हे न सांगताच गाळप सुरू केले आहे व शेतकरीही त्यांना ऊस घालत आहेत. राज्यात यंदा सुमारे १६० कारखाने सुरू होतील, असा शासनाचाच प्राथमिक अंदाज आहे. त्यातील ८१ कारखाने आतापर्यंत सुरू झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ३७ कारखाने खासगी आहेत. या कारखान्यांनी २६ लाख १९ हजार टन गाळप करून २१ लाख ४२ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. परतीचा पाऊस व जमिनीत अजूनही पावसाचा ओलावा असल्याने उतारा अगदीच कमी आहे. प्रतिवर्षी तो हंगामाच्या सुरुवातीला कमीच असतो. सर्वाधिक ४० कारखाने पुणे विभागात त्यातही पुणे व सोलापूर जिल्ह्णांत सुरू झाले आहेत. अमरावती व नागपूर विभागात मात्र अजून एकही कारखाना सुरू झालेला नाही. तिथे हंगाम घेणाऱ्या कारखान्यांची संख्याही अगदीच कमी असते.केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. भाजप प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी होती. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांना सरकार विरोधात लगेच लढ्याचे अस्त्र उगारण्यास मर्यादा आल्याने त्यांनी सरकारला २५ नोव्हेंबरची मुदत दिली आहे. ऊसदर निश्चित करणारे मंडळ कालच अस्तित्वात आले आहे. त्याची पहिली बैठक १५ नोव्हेंबरला होणार असली तरी त्यातून लगेच काही दर निश्चित होण्याची शक्यता नाही. शिवाय सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने ठोस मदत केल्याशिवाय यंदा एफआरपीही एकरकमी देणे शक्य नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. आंदोलनामुळे गेल्यावर्षी हंगाम डिसेंबरमध्ये सुरू झाला होता. यंदा संघर्ष नसल्यामुळे तो किमान महिनाभर अगोदर सुरु झाला आहे. त्यामुळे अन्य काही तोटा झाला तरी लवकर गाळप होऊन शेतकऱ्यांना चांगले टनेज मिळेलच शिवाय जमीन लवकर रिकामी होणार असल्याने रब्बीचे पीकही पदरी पडेल अशी स्थिती आहे.दृष्टिक्षेपात यंदाचा हंगामविभागसुरू झालेले कारखानेऊस गाळपसाखर उत्पादनउतारा (कंसात खासगी)(लाख टन)(लाख क्विंटल)(टक्के)कोल्हापूर८ (२)००.९४००.४०४.२८पुणे२१ (१९)१८.०७१५.९९८.८५नगर१०(३)३.३७२.६४७.८२औरंगाबाद२(७)१.४५०.८२५.६४नांदेड३ (६)२.३६१.५७६.६८एकूण४४(३७)२६.१९२१.४२८.१८गत हंगामावर दृष्टिक्षेप२०१४२०१३कारखाने सुरू१५७ १७० (६२) (६१ खासगी)ऊस गाळप लाख टन६७६.२६७००.२६ साखर लाख टन७७.००८०.०० सरासरी साखर उतारा११.४०११.४०संभाव्य गाळप २०१५कारखाने सुरू १६०गाळप टन ७८५साखर ८८ लाख टन