शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८१ कारखान्यांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 12, 2014 00:53 IST

हंगामास वेग : पुणे विभागात सर्वाधिक कारखाने सुरू

कोल्हापूर : पहिल्या उचलीचा तिढा अजून सुटलेला नाहीच परंतु त्यासाठी यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांनीही आंदोलनाची ‘तलवार म्यान’ केल्याने राज्यातील ८१ म्हणजे निम्म्याहून जास्त कारखाने सुरू झाले आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने १० नोव्हेंबरपर्यंत हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांची माहिती दिली असून त्यावरून हे स्पष्ट होत आहे. ऊस आंदोलन चळवळीच्या गेल्या एका तपाच्या संघर्षात यंदा पहिल्यांदाच असे घडले आहे की, पहिल्या उचलीबाबत काहीच ठोस हाती नसताना हंगाम मात्र जोराने सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्णांतील शाहू (कागल) कारखान्याने २५३० रुपये तर शिरोळ तालुक्यातील ‘गुरुदत्त शुगर्स’ने २५३५ रुपये अशी एफआरपी एवढी एकरकमी पहिली उचल जाहीर केली आहे. अन्यथा राज्यभरातील एखादा अपवादवगळता एकाही कारखान्याने उचल किती देणार हे न सांगताच गाळप सुरू केले आहे व शेतकरीही त्यांना ऊस घालत आहेत. राज्यात यंदा सुमारे १६० कारखाने सुरू होतील, असा शासनाचाच प्राथमिक अंदाज आहे. त्यातील ८१ कारखाने आतापर्यंत सुरू झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ३७ कारखाने खासगी आहेत. या कारखान्यांनी २६ लाख १९ हजार टन गाळप करून २१ लाख ४२ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. परतीचा पाऊस व जमिनीत अजूनही पावसाचा ओलावा असल्याने उतारा अगदीच कमी आहे. प्रतिवर्षी तो हंगामाच्या सुरुवातीला कमीच असतो. सर्वाधिक ४० कारखाने पुणे विभागात त्यातही पुणे व सोलापूर जिल्ह्णांत सुरू झाले आहेत. अमरावती व नागपूर विभागात मात्र अजून एकही कारखाना सुरू झालेला नाही. तिथे हंगाम घेणाऱ्या कारखान्यांची संख्याही अगदीच कमी असते.केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. भाजप प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी होती. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांना सरकार विरोधात लगेच लढ्याचे अस्त्र उगारण्यास मर्यादा आल्याने त्यांनी सरकारला २५ नोव्हेंबरची मुदत दिली आहे. ऊसदर निश्चित करणारे मंडळ कालच अस्तित्वात आले आहे. त्याची पहिली बैठक १५ नोव्हेंबरला होणार असली तरी त्यातून लगेच काही दर निश्चित होण्याची शक्यता नाही. शिवाय सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने ठोस मदत केल्याशिवाय यंदा एफआरपीही एकरकमी देणे शक्य नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. आंदोलनामुळे गेल्यावर्षी हंगाम डिसेंबरमध्ये सुरू झाला होता. यंदा संघर्ष नसल्यामुळे तो किमान महिनाभर अगोदर सुरु झाला आहे. त्यामुळे अन्य काही तोटा झाला तरी लवकर गाळप होऊन शेतकऱ्यांना चांगले टनेज मिळेलच शिवाय जमीन लवकर रिकामी होणार असल्याने रब्बीचे पीकही पदरी पडेल अशी स्थिती आहे.दृष्टिक्षेपात यंदाचा हंगामविभागसुरू झालेले कारखानेऊस गाळपसाखर उत्पादनउतारा (कंसात खासगी)(लाख टन)(लाख क्विंटल)(टक्के)कोल्हापूर८ (२)००.९४००.४०४.२८पुणे२१ (१९)१८.०७१५.९९८.८५नगर१०(३)३.३७२.६४७.८२औरंगाबाद२(७)१.४५०.८२५.६४नांदेड३ (६)२.३६१.५७६.६८एकूण४४(३७)२६.१९२१.४२८.१८गत हंगामावर दृष्टिक्षेप२०१४२०१३कारखाने सुरू१५७ १७० (६२) (६१ खासगी)ऊस गाळप लाख टन६७६.२६७००.२६ साखर लाख टन७७.००८०.०० सरासरी साखर उतारा११.४०११.४०संभाव्य गाळप २०१५कारखाने सुरू १६०गाळप टन ७८५साखर ८८ लाख टन