शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

राज्यातील ८१ कारखान्यांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 12, 2014 00:53 IST

हंगामास वेग : पुणे विभागात सर्वाधिक कारखाने सुरू

कोल्हापूर : पहिल्या उचलीचा तिढा अजून सुटलेला नाहीच परंतु त्यासाठी यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांनीही आंदोलनाची ‘तलवार म्यान’ केल्याने राज्यातील ८१ म्हणजे निम्म्याहून जास्त कारखाने सुरू झाले आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने १० नोव्हेंबरपर्यंत हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांची माहिती दिली असून त्यावरून हे स्पष्ट होत आहे. ऊस आंदोलन चळवळीच्या गेल्या एका तपाच्या संघर्षात यंदा पहिल्यांदाच असे घडले आहे की, पहिल्या उचलीबाबत काहीच ठोस हाती नसताना हंगाम मात्र जोराने सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्णांतील शाहू (कागल) कारखान्याने २५३० रुपये तर शिरोळ तालुक्यातील ‘गुरुदत्त शुगर्स’ने २५३५ रुपये अशी एफआरपी एवढी एकरकमी पहिली उचल जाहीर केली आहे. अन्यथा राज्यभरातील एखादा अपवादवगळता एकाही कारखान्याने उचल किती देणार हे न सांगताच गाळप सुरू केले आहे व शेतकरीही त्यांना ऊस घालत आहेत. राज्यात यंदा सुमारे १६० कारखाने सुरू होतील, असा शासनाचाच प्राथमिक अंदाज आहे. त्यातील ८१ कारखाने आतापर्यंत सुरू झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ३७ कारखाने खासगी आहेत. या कारखान्यांनी २६ लाख १९ हजार टन गाळप करून २१ लाख ४२ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. परतीचा पाऊस व जमिनीत अजूनही पावसाचा ओलावा असल्याने उतारा अगदीच कमी आहे. प्रतिवर्षी तो हंगामाच्या सुरुवातीला कमीच असतो. सर्वाधिक ४० कारखाने पुणे विभागात त्यातही पुणे व सोलापूर जिल्ह्णांत सुरू झाले आहेत. अमरावती व नागपूर विभागात मात्र अजून एकही कारखाना सुरू झालेला नाही. तिथे हंगाम घेणाऱ्या कारखान्यांची संख्याही अगदीच कमी असते.केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. भाजप प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी होती. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांना सरकार विरोधात लगेच लढ्याचे अस्त्र उगारण्यास मर्यादा आल्याने त्यांनी सरकारला २५ नोव्हेंबरची मुदत दिली आहे. ऊसदर निश्चित करणारे मंडळ कालच अस्तित्वात आले आहे. त्याची पहिली बैठक १५ नोव्हेंबरला होणार असली तरी त्यातून लगेच काही दर निश्चित होण्याची शक्यता नाही. शिवाय सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने ठोस मदत केल्याशिवाय यंदा एफआरपीही एकरकमी देणे शक्य नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. आंदोलनामुळे गेल्यावर्षी हंगाम डिसेंबरमध्ये सुरू झाला होता. यंदा संघर्ष नसल्यामुळे तो किमान महिनाभर अगोदर सुरु झाला आहे. त्यामुळे अन्य काही तोटा झाला तरी लवकर गाळप होऊन शेतकऱ्यांना चांगले टनेज मिळेलच शिवाय जमीन लवकर रिकामी होणार असल्याने रब्बीचे पीकही पदरी पडेल अशी स्थिती आहे.दृष्टिक्षेपात यंदाचा हंगामविभागसुरू झालेले कारखानेऊस गाळपसाखर उत्पादनउतारा (कंसात खासगी)(लाख टन)(लाख क्विंटल)(टक्के)कोल्हापूर८ (२)००.९४००.४०४.२८पुणे२१ (१९)१८.०७१५.९९८.८५नगर१०(३)३.३७२.६४७.८२औरंगाबाद२(७)१.४५०.८२५.६४नांदेड३ (६)२.३६१.५७६.६८एकूण४४(३७)२६.१९२१.४२८.१८गत हंगामावर दृष्टिक्षेप२०१४२०१३कारखाने सुरू१५७ १७० (६२) (६१ खासगी)ऊस गाळप लाख टन६७६.२६७००.२६ साखर लाख टन७७.००८०.०० सरासरी साखर उतारा११.४०११.४०संभाव्य गाळप २०१५कारखाने सुरू १६०गाळप टन ७८५साखर ८८ लाख टन