शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जलयुक्त शिवारासाठी झटताहेत २० गावे

By admin | Updated: January 29, 2015 23:54 IST

कागल तालुका : जलसमृद्धीकडे वाटचाल; नाला बंधारे, मातीसह सिमेंट नाल्यातील गाळ काढणे सुरू

दत्तात्रय पाटील -म्हाकवे -कमी-अधिक प्रमाण, बदललेले कालमान यामुळे भविष्यात पाणीटंचाईस सामोरे जावे लागू नये या हेतूने शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बृहत् आराखडा आखला आहे. या अभियानाला कागल तालुक्यातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २० हून अधिक गावांमध्ये लोकसहभागातून सिमेंट नाला बंधारे बांधणे, मातीसह सिमेंट नाल्यातील गाळ काढण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.काळम्मावाडी धरणासह चिकोत्रा, सर्फनाला, पारगाव, आदी धरणांच्या माध्यमातून दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा नदींसह उजव्या कालव्यातून बारमाई पाणी वाहत आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी शेती-शिवार हिरवाईने नटला आहे. मात्र, अद्यापही शेकडो हेक्टर जमीन पाण्याअभावी पडीक राहिली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून पाणीसाठा (वॉटर बॅँक) वाढविण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ सरसावले आहेत.नंद्याळ (ता. कागल) येथे कृषी विभागामार्फत सिमेंट नाला बंधारे मंजूर झालेल्या कामाला सुरुवात झाली आहे, तर सोनाळी, चौंडाळ, जैन्याळ, माद्याळ, केनवडे, क।। सांगाव, दौलतवाडी, सावर्डे खुर्द येथील सिमेंट नाल्यातील गाळ काढण्याची कामे सुरू आहेत, तर करड्याळ येथील माती नाल्यामध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले आहे.या कामासाठी लोकवर्गणीतून जेसीबी मशीन आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये मातीवजा गाळ टाकायचा आहे, त्यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे.त्याचबरोबर गलगले, बामणी, म्हाकवे, मेतगे, वंदूर, यमगे, आदी गावांमध्ये वनराई बंधाऱ्याची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यात जलसमृद्धीमध्ये भर पडणार आहे.‘शासनाने केलेल्या आवाहनांना प्रतिसाद देत तालुक्यातील गावांनी समृद्धी पर्वालाच सुरुवात केली आहे. बंधाऱ्यातील अनेक वर्षांपासून साचलेला गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर या बंधाऱ्यातील पाणीसाठा दुपट्टीने वाढणार आहे. तसेच बंधाऱ्याच्या खालील भागातील विहिरींची पाणीपातळीही वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे अभियान शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.-दीपक चव्हाण, गटविकास अधिकारी, कागल.