शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

वाहनचालकांना वीस कोटींचा गंडा

By admin | Updated: February 16, 2015 23:10 IST

ऊसतोडणी मुकादमांकडून फसवणूक : जिल्ह्यातील सुमारे सव्वादोनशे वाहनमालकांचा समावेश

खोची-आयुब मुल्ला - कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड वाहनचालकांना ऊसतोडणी मुकादमांनी सुमारे २० कोटी रुपयांना गंडा घातल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना हा सिझन आर्थिकदृष्ट्या फटका देणारा ठरला आहे. यामध्ये जवळपास सव्वादोनशे ऊस वाहतूक वाहनमालकांचा समावेश आहे. यास शासन अन् कारखानदारही जबाबदार नसल्याने स्वत:च्या हिमतीवरच त्यांना ही रक्कम वसूल करावी लागणार आहे.गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वीपासून ऊतोडणी मजुरांची टोळी करतो म्हणून वाहनचालकांककडून पैसे घेऊन तोडणीस मजूरच न आणण्याचे प्रमाण मुकादमांकडून होत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांची फसवणूक होतानाचे चित्र दिसत आहे. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकाराची २० कोटींची फसवणूक होऊन वाहनमालकांना चांगलाच गंडा घातला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून हळूहळू या संदर्भातील चित्र समोर येऊ लागले. त्यातूनच ही माहिती मिळाली आहे.जिल्ह्यात २१ पैकी पंधरा सहकारी, तर सहा खासगी साखर कारखाने आहेत. यामध्ये २५०० पासून ९००० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेले कारखाने आहेत. २५०० मे. टन क्षमता असलेल्या कारखान्याला ४०० ऊसतोड मजुरांच्या टोळ्या लागतात. सर्वसाधारणपणे हा सर्व व्यवसायाचा भाग म्हणून अभ्यास केला. फसवणुकीचे प्रमाण हे जास्त आहे. अनेक कारखान्यांनी याबद्दल माहिती देण्यास असमर्थता दाखविली आहे; परंतु पाच टक्क्यांची फसवणूक ही गृहितच धरली, तर नुकसानीचा अंदाज समोर येतो. प्रत्येक टोळीला आठ लाख रुपये इतका जवळपास अ‍ॅडव्हान्स दिल्याचे समजते. त्यामुळे अंदाज गृहीत धरून १६ कारखान्यांच्या प्रती दहा टोळ्या आल्याच नाहीत, असा हिशोब केला, तर फसवणुकीचा आकडा १३ कोटी रुपयांपर्यंत जातो. यामध्ये जादाची वाढ निश्चित आहे. त्यामुळे हा आकडा १५ कोटी सहज आहे. उलट पाच कोटी सहा लाखांची फसवणूक झाल्याची माहिती जिल्ह्यातील चार कारखान्यांच्या वाहनमालकांनी दिली आहे. २० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे सर्वच कारखाना क्षेत्रातील चित्र समोर येते. हे पैसे अ‍ॅडव्हान्स वाहनमालकांनी मुकादमला दिलेले आहेत. पूर्वी साखर कारखाने हमीपत्र देत त्यामुळे बॅँका अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी पैसे उपलब्ध करून देत. आता मात्र स्वत:च्या मालमत्तेवर कर्ज काढून वाहनमालकांनी अ‍ॅडव्हान्ससाठी पैसे दिले आहेत. ते आता कसे वसूल करायचे असा प्रश्न फसवणूक झालेल्या वाहनधारकांसमोर आहे. चालू हंगामात अल्पमजुरांवर कसे-बसे तोडणी वाहतुकीचे काम वाहनधारक करीत आहेत; परंतु अपेक्षित व्यवसाय झालेला नाही. त्यामुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे. शासन, कारखानदार यांनी वाहनधारकांना सहकार्य करीत फसवणुकीचा प्रकार होणार नाही यासाठी कायदेशीर अटींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.कारखानानिहाय तपशीलकारखान्याचे नाववाहनमालकांची संख्याथकबाकी रक्कम रु. लक्ष१) छ. राजाराम, बावडा१७९१२) छ. शाहू, कागल५३२०७३) शरद साखर, नरंदे२२१७४४) दत्त, शिरोळ२६२३४