शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

१२ हजार कामगार लाभांपासून वंचित

By admin | Updated: December 25, 2014 00:08 IST

सेवापुस्तकांचा घोळ : प्रशासनाचे बोटचेपे धोरण

प्रवीण देसाई - कोल्हापूर -सेवापुस्तकांच्या नूतनीकरणाच्या घोळात जिल्ह्यातील सुमारे १२ हजार बांधकाम कामगारांवर लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे बोटचेपे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाच्या निर्देशानुसार दिल्या जाणाऱ्या लाभांना या कामगारांना मुकावे लागत आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या ४४ हजार आहे.कामगारांना ज्यामुळे लाभ मिळू शकतात, त्या सेवापुस्तकांचे नूतनीकरण करण्याचा कालावधी १५ महिन्यांचा आहे. पंधरा महिने पूर्ण झाल्यानंतर कामगारांनी वारंवार सहायक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून नूतनीकरणाबाबत मागणी केली; परंतु प्रत्येक वेळी कुठले ना कुठले कारण सांगून या कार्यालयाने त्याबाबत टाळाटाळच केली आहे. याबाबत सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला कळविले आहे. त्यांच्याकडून नवीन सेवापुस्तक काढा किंवा मुंबइतून नूतनीकरण करून या, अशी उत्तरे दिली जातात. नवीन सभासदासाठी ८५ रुपये, तर नूतनीकरणासाठी ६० रुपये शुल्क आहे. सेवापुस्तकाच्या कागदपत्रांची यादी क्लिष्ट आहे. ती जमवतानाच दमछाक होते. त्यातच नवीन पुस्तक काढणे त्रासदायक ठरणार आहे. सेवापुस्तकांचे नूतनीकरण ज्या-त्या भागात व्हावे यासाठी प्रत्येक तालुक्याला महिन्यातून दोन वेळा शिबिरे घेतली जाणार आहेत. मुळातच या कार्यालयात चार क्लार्क आहेत. मूळ कामामध्ये २७ कामगार कायद्यांसह इतर विषय येतात. त्यामध्ये कामगार कल्याण मंडळाचे अतिरिक्त काम आल्याने नूतनीकरणासारखी कामे वेळेत करणे शक्य होत नाही. - सुहास कदम, सहायक कामगार आयुक्तसेवापुस्तकांच्या नूतनीकरणासंदर्भात वेळोवेळी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला आहे. कामगारांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे; परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांची सबब पुढे करीत याबाबत टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.- कॉ. जोतिराम मोरे, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनाबांधकाम कामगारांना मिळणारे लाभकामगाराची पत्नी किंवा बांधकाम कामगार महिला गर्भवती असल्यास नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास १० हजार रुपये व सिझेरियन झाल्यास १५ हजार रुपयेकामगारांच्या पाल्यांना इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वार्षिक १२०० रुपये शिष्यवृत्ती. इयत्ता आठवी ते १० वीपर्यंत २४०० रुपये, ११वी ते पुढील शिक्षणासाठी २००० पासून ३५ हजार रुपये शिष्यवृत्ती वर्षाला कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून दोन लाख रुपये मिळतात; तर काम करताना अपंगत्व आल्यास १ लाख रुपये.कामगारांच्या विवाहासाठी १० हजार रुपयेक्षयरोग, कर्करोग, आदी दुर्धर आजार असल्यास उपचारांसाठी २५ हजार रुपये.नैसर्गिक मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयेकामगाराचा मृत्यू झाल्यास वारसांना वर्षाला १२ हजार रुपयांची पेन्शन.