शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

जळगावकरांची तहान भागविणाऱ्या वाघुर धरणाचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पाच लाख जळगावकरांची तहान भागवणाऱ्या वाघुर धरणाचा जलसाठा ९१ टक्के झाला आहे. लवकरच शंभरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पाच लाख जळगावकरांची तहान भागवणाऱ्या वाघुर धरणाचा जलसाठा ९१ टक्के झाला आहे. लवकरच शंभरी गाठणाऱ्या वाघुर धरणाचे जलपूजन महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी करण्यात आले.

वाघुर धरणावर जळगाव शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने वाघुर पाणीपुरवठा योजना अंमलात आणली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा साठ टक्के झाला होता. परंतु आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसाने धरणाची पाणी पातळी कमालीची वाढली आहे. सध्या वाघुर धरण ९१ टक्के भरले आहे. लवकरच १०० टक्के पाणीसाठा होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी जलपूजन करण्यात आले. जलपूजनाचा मान शहरातील रहिवासी युवराज तांबे व त्यांच्या पत्नीला देण्यात आला. यावेळी साडीचोळी अर्पण करण्यात आली. नंतर महापौरांच्या हस्ते तांबे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, ललित धांडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महापौर महाजन यांनी भारतीय संस्कृतीत नद्या-नाल्यातील वाहत्या पाण्याचे महत्त्व सांगत जलसाठेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तर उपमहापौर पाटील यांनी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या वाघुर धरणाचे प्रत्येक जळगावकरांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्व असून भविष्यात धरणातील जलसाठ्याच्या आकडेवारीवरून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा मानस व्यक्त केला. धरणातील जलसाठा वाढल्याने जळगावकरांना पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.