शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

150 वर्षाची परंपरा असलेली रामलीला

By admin | Updated: April 24, 2017 17:08 IST

वीकेण्ड या सदरात निपाणे गावात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सादर होणा:या रामलिलेवर जगदीश बियाणी यांनी केलेले लिखाण.

 निपाणे गावात अंदाजे 150 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला गेला. तेव्हापासून भगवंताचे दशावतारी रूप या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोंगरुपी रामलीलेतून भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी प्रकट होतात.

निपाणे गावातील रामलीला केव्हा सुरू झाली हे माहीत नाही. पण ही अलिखित परंपरा ज्याच्यावर सोपवली आहे ते कलावंत  मोठय़ा आनंदाने ती सादर करतात. अक्षय्यतृतीयेला माहेरी आलेल्या लेकी, माता भगिनी, पाहुणे मंडळे, शेजारील गावामधील  मंडळी दोन दिवस रात्रभर जागून या दशावतारी रामलीलेचा आनंद घेत असतात.
अक्षय्यतृतीयेच्या दुस:या दिवशी सूर्योदयाच्या आत रावणाला संपवून श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांना गावातून फिरतात. प्रत्येक घरासमोर माताभगिनी औक्षण कतात व भगवंताचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतात.
रामलीलेची तयारी
100 फूट लांब व 15 फूट रुंद असे मैदान ज्याला गावात रामलीला मैदान म्हटले जाते. त्या प्रांगणात कलावंतांना कला सादर करताना पायाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. मंडपात पुरेशी रोशणाई, पताकांनी सजवून (पूर्वीच्या काळी मशाली रात्रभर पेटवत ठेवून त्या उजेडात रामलीला सादर केली जात होती.) वाजंत्री, सनई, संबळ वाजविणारे चार वादक एका बाजूला तर चार वादक दुस:या बाजूला खर तर वाजंत्रीवरच या रामलीलेचं यश (सादरीकरण) अवलंबून असतं.  गणपती भगवंतांच्या आगमनाची व नृत्याची वाद्य वेगळय़ा पद्धतीचे असते. तर सरस्वती, निमदेव, सूत्रधार, श्रीकृष्ण अग्निदेव, शंकर पार्वती, श्रीराम, रावण, इंद्रजीत, कुंभकर्ण, वैदू, भीम, बकासूर, म्हैशासूर, भवानी माता पात्रानुसार वाद्याची चाल व नृत्य बदलते.
पात्र सादर करणारा कलावंत ज्या पद्धतीने ते आत्मसात करतो. संवाद फेक, जे संवाद पुराणामधून, रामायण व महाभारताच्या पुस्तकाचा आधार घेऊन तयार केलेले असतात. 
त्या पात्रांना योग्य वाटतील ते निवडक श्रवणीय व अर्थपूर्ण संवाद घेतले आहेत. श्रीराम कुंभकर्णीला रणांगणात म्हणतात, ज्यावेळी सीता स्वयंवरात पण मांडला गेला होता, त्यावेळी कुठे रे गेले होते तुमचे बळ! माङया सत्व सखी जानकीला चोरून तुम्ही व्यर्थ कुलाक्षय करून घेतला. हे तुमच्या सारख्या पराक्रमी योद्धाला शोभत नाही. आता माङया ह्या तीक्ष्ण बाणांपासून साक्षात ब्रrादेवसुद्धा तुमचे रक्षण करू शकत नाही! 
या संवादात रावण, कुंभकर्ण, मेघनाथ, शुर्पणखा यांच्या पराक्रमचे वर्णन, त्यांनी केलेली चूक (अपराध) व त्याचा गंभीर परिणाम ज्यातून या राक्षसांचे मानसिक खच्चीकरण करून ब्रrादेवसुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही तेथेच कुंभकर्ण मनाने पराभूत होतो.
तर श्रीराम रावणाला म्हणतात
क्या धुंदभरा, क्या फुंद भरा
क्या दिखते हो तुम चौरस
ऐसा लगावू तीर, उषावू तेरे दशोशीर
ज्या वेळी पृथ्वी तीन वेळा कळकळीने गजर्ना करेल, ज्या वेळी चंद्र व सूर्याचे अस्तित्व संपुष्टात येईल त्याचवेळी हा दशरथ पुत्र श्रीराम वधाला जाईल! किती अर्थपूर्ण संवाद. 
असा असतो साज
पायात पैठण, नऊवार, घुंगरू (पैंजण) अंगात कोट (राजे महाराजे परिधान करत ते) गळय़ात मोत्यांच्या माळा, डोक्यावर मुकूट (पताकांनी व मोत्यांनी सजवलेला) निमदेव मानवाला अयोग्यदायी व औषधोपचारात महत्त्वाचा वृक्ष या झाडांच्या पाल्यांनी सजवलेला परिणामी निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेशच देतो तर मोरपीस मुकुटावर असलेले भगवान श्रीकृष्ण कंसाचा वध करतात व कर्ण-अजरुनाच्या युद्धात अजरुनाने विचारलेला प्रश्न ‘काका-चुलते सगे सोयरे न जाण। मी न करे गोत्र हत्या । तर श्रीकृष्ण अजरुनाला संबोधतात हे जे सर्व घडत आहे त्यांचा करता करवीता मीच आहे, ‘तू फक्त निमित्तास कारण आहे! या संवादाने अजरुनाच्या मनातील मोह छेदला जातो व मोठय़ा उत्साहाने धनुष्य खेचतो. कमरेवर मोत्यांचा व रेशमी (रंगीबेरंगी) दो:यांचा पट्टा. रामलीला सुरू होण्याच्या अगोदर चार दिशेला दिवे लावून भजनी मंडळ महादेवाची मूर्ती घेऊन गावात ईडापीडा जाऊन आरोग्य संपन्न  प्राप्त होवो, यासाठी प्रार्थना करतात. 
- जगदीश बियाणी