शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

अमळनेर तालुक्याची विकासाकडे फिनिक्स झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST

संजय पाटील कोरोनानंतर अमळनेर तालुक्याने विकासात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली आहे. धरणाचे संकल्प चित्र प्राप्त झाले आहे. बाजार समितीचा ...

संजय पाटील

कोरोनानंतर अमळनेर तालुक्याने विकासात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली आहे. धरणाचे संकल्प चित्र प्राप्त झाले आहे. बाजार समितीचा विकास, भौतिक विकास, वृक्ष लागवडीतून रोजगार, विप्रो कंपनीच्या नव्या युनिटच्या माध्यमातून रोजगार या बाबी तालुक्यात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या ठरणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला निम्न तापी प्रकल्प पाडळसरे तालुक्यात हरित क्रांती घडविणार आहे. प्रकल्पाचे १३९.२४ मीटरपर्यंत काम झाले आहे.

२३ गाळे असून, २३ पैकी प्रस्तंभ १२ व १८ वगळून सर्व प्रस्तंभ १४० मीटरपर्यंत बांधले गेले आहेत. आजच्या घडीला १२.९७ दशलक्ष घनमीटर पाणी साठा असून, ३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. धरणाचे ४३ टक्के काम झाले आहे, तर उजव्या तीरावरील माती धरण पूर्ण झाले आहे. डाव्या तीरावरील ७० टक्के माती धरण पूर्ण झाले आहे.

चालू वर्षी १३५ कोटींचा निधी मंजूर आहे. निम्न तापी प्रकल्पाच्या प्रस्तंभांच्या संकल्प चित्रास मान्यता मिळत नसल्याने नदी पात्रातील काम थांबले आहे. संकल्प चित्र तयार झाले आहे. ऑक्टोबरमध्ये काम सुरू होणार आहे. आतापर्यंत तापीला आलेल्या पुरामुळे १८५० दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले आहे. धरणाचे काम पूर्ण झाले असते, तर वाहून जाणारे पाणी साठवून ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असते.

सन १९९७ मध्ये १४३.६४ कोटी रुपयांची प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. २४ वर्षांत त्याची किंमत आज ३४४४.०९ कोटींवर पोहोचली आहे. अमळनेर तालुक्यातील १०० गावांतील २७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. चोपडा तालुक्यातील ११ गावांतील १० हजार ५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल. पारोळा ६ गावे १६५४ हेक्टर, धरणगाव ४ गावे ११४६ हेक्टर, शिंदखेडा २ गावे २४०९ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. या प्रकल्पात ८ सरकारी उपसा

सिंचन योजनांचा शेती सिंचनासाठी लाभ होईल.

अमळनेर बाजार समिती तालुक्यात आर्थिक उलाढाल करणारी मोठी संस्था आहे. आजूबाजूच्या तालुक्यातून धान्याची आवक अमळनेरला येत असते. रोखीने पेमेंट देण्याची पद्धत असल्याने माल विकताच शेतकऱ्याला त्याच्या रकमेची तरतूद इतर कामांसाठी करता येते. यामुळेदेखील विकासात गती आली आहे. शेतकरी पुत्रांसाठी, तसेच व्यापाऱ्यांसाठी गाळ्यांची व्यवस्था केलेली आहे. पणन मंडळातर्फे बाजार समितीला पेट्रोल पंपाला मान्यता मिळाली आहे, तर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून गाळणचाळण यंत्रणा सुरू होत आहे. शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज सुरू होत आहे, तर शेतमालासाठी तारण योजना सुरू झाली आहे.

त्यामुळे दर कमी असल्यास माल न विक्री करता त्यांना कमी व्याजदराने पैसा उपलब्ध होणार आहे. कर्मचाऱ्यांचीदेखील आर्थिक कोंडी होत होती म्हणून बाजार समितीने कर्मचाऱ्यांना पीएफ देण्यात येऊन हमाल-मापाड्यांसह सर्वांचा विमा काढण्यात आला आहे. त्यांना सातवा वेतन आयोग लावला जात आहे.