शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

१५०२ गावांची पैसेवारी ५० च्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील एकूण १५०२ गावांची पैसेवारी डिसेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात एकाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील एकूण १५०२ गावांची पैसेवारी डिसेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात एकाही गावात दुष्काळसदृश स्थिती नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये ५०पैशांच्या वर पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महसुली गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १५०२ महसुली गावे आहेत. त्यात एकाही गावात दुष्काळसदृश स्थिती आढळून आलेली नाही. प्रत्येक वर्षी शासनाकडून जिल्ह्यातील गावांचा आढावा घेऊन ही आकडेवारी जाहीर केली जाते.

ही पैसेवारी नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी अशा तीन टप्प्यांमध्ये जाहीर केली जाते. त्यानुसार दुष्काळाची स्थिती जाहीर केली जाते. यंदा दुष्काळाचे निकष बदलले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांतील पर्जन्यमान पाहता यंदा जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नाही. यात दोन प्रकार असतात त्यानुसार एका ठिकाणी पैसेवारी ही २५ पैसेपेक्षा कमी असते. तेथे दुष्काळसदृश स्थितीचा अंदाज असतो. त्यानुसार त्या गावांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. मात्र यंदा एकाही गावात अशी परिस्थिती नसल्याचे महसूल विभागाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

२०१६ मध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता तयार झाली. त्यानुसार दुष्काळाची व्याख्या पाच पद्धतीने केली गेली आहे. त्यानुसार पाऊस पडला नाही तर दुष्काळ जाहीर केला जातो. तर इतर चार संकेत हे कृषी विभागाशी संबधित आहे. ६८३ मिली एवढा सरासरी पाऊस जिल्ह्याचा आहे. यंदा त्यापेक्षा दोनशे मिली पाऊस जास्त झाला आहे. त्यामुळे पैसेवारीदेखील जाहीर करण्यात आली आहे.

ज्या गावांची पैसेवारी कमी असते त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या अध्यादेशांनुसार मदत केली जाते. त्यांना टँकर पुरवणे आणि इतर मदत केली जाते.

आकडेवारी (सर्व गावे ५० पैसेपेक्षा जास्त)

तालुका गावांची संख्या

जळगाव ९२

जामनेर १५३

एरंडोल ६३

धरणगाव ८९

पारोळा ११४

भुसावळ ५४

बोदवड ५१

मुक्ताईनगर ८१

यावल ८४

रावेर १२०

पाचोरा १२९

भडगाव ६३

अमळनेर १५४

चोपडा ११६

चाळीसगाव १३७