शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

महिनाभरात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ८५८ ने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST

आनंद सुरवाडे जळगाव : जिल्हाभरात कुपोषित बालकांच्या जुलै महिन्यातील सर्व्हेक्षणाची संपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्या ...

आनंद सुरवाडे

जळगाव : जिल्हाभरात कुपोषित बालकांच्या जुलै महिन्यातील सर्व्हेक्षणाची संपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढून १३४५ वर पोहोचली आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या महिनाभरातच ही संख्या ८५८ ने वाढली आहे. दरम्यान, याबाबीमुळे नेमक्या उपाययोजना गेल्या कुठे ? प्रशासन, लोकप्रतिनिधी करताय काय? निधी जातोय कुठे असे असंख्य प्रश्न यातून समोर आले आहेत.

जिल्हाभरात कुपोषित बालकांचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना नवीन सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात जिल्हाभरात हा सर्व्हे घेण्यात आला. त्यात २ लाख ४७ हजार ७८३ बालकांचे वजन घेण्यात आले. आरोग्य विभागाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून हा सर्व्हे घेण्यात आला. दरम्यान, १५ ऑगस्टनंतर पुन्हा एकदा जिल्हाभरात हा सर्व्हे होणार असून त्यात आणखी काही बालके समोर येणार आहे.

गंभीर आकडे

कमी वजनाची बालके : २५१४८(गेल्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत १०४१ ने वाढ)

तीव्र कमी वजनाची बालके : ४२२८ (गेल्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत ८५६ ने वाढ)

मध्यम कुपोषित ६२०२ (गेल्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत ३२५१ ने वाढ)

तीव्र कुपोषित बालके १३४५ (गेल्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत ८५८ ने वाढ)

लोकप्रतिनिधी करताय काय?

आसराबारी येथे कुपोषित बालकाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. आता त्याकडे गांर्भियाने बघण्याची गरज आहे. मात्र, कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून याचा पाठपुरावा होत नसल्याची गंभीर माहिती आहे. यात आमदार, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य या भागातील लोकप्रतिनिधी नेमके करताय काय? हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या भागातील जि. प. सदस्यांनी एकाही सर्वसाधरण सभेत किंवा कोणत्याही सभेत कुपोषणाचा मुद्दा मांडलेला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या बाबतीत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.

अहवाल आज सादर होणार

आसराबारी येथील कुपोषित बालकाच्या मृत्यूप्रकरणात जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या समितीने या ठिकाणी जावून चौकशी केली आहे. त्यांचा चौकशी अहवाल हा बुधवारी जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकरणात नेमकी कारवाई कुणावर होणार कुणावर ठपका ठेवण्यात आला आहे?. याबाबत उद्या स्पष्टता होणार आहे.

चोपडा, यावलमध्येच परिस्थिती गंभीर

आदिवासी गावांचा समावेश असलेल्या चोपडा व यावल तालुक्यातच कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. विशेष बाब म्हणजे मृत्यू झालेला बालक यावल तालुक्यातीलच रहिवासी आहे. शिवाय या भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची जबाबदारी ही प्रभारी अधिकाऱ्यांवर असून या भागात अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा प्रकार यातून समोर आला आहे. चोपड्यात गेल्या सर्व्हेक्षणात ३५ तीव्र कुपोषित बालके होती ही संख्या १७३ वर पोहोचली आहे. तर यावल तालुक्यात गेल्या सर्व्हेक्षणात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३९ होती. ती वाढून १८३ वर पोहोचली आहे. तर चाळीसगावात तीव्र कुपोषित बालकांची संख्या २१४ नोंदविली गेली आहे जी सर्वाधिक आहे.