शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

आता कोरोनासोबत जगावे लागणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST

रक्ताची नाती ही या काळात दुरावली, जी परकी वाटत होती ती जवळची झाली. या काळात सर्व जगच जणू भेदरलेले ...

रक्ताची नाती ही या काळात दुरावली, जी परकी वाटत होती ती जवळची झाली. या काळात सर्व जगच जणू भेदरलेले होते. माणसं पहिल्यांदाच इतकी भयंकर हादरली होती. प्रारंभी कोरोनाची कमालीची भीती होती. कालांतराने कोरोनाबद्दल असलेल्या समज-गैरसमजाबद्दलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतन-मंथन होऊ लागले होते. शेवटी आपल्याला कोरोनासोबत जगावे लागेल की काय, जणू अशा निष्कर्षाप्रत यावे लागले. किंबहुना आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागेल, अशी जणू मानसिकता होऊन गेली. म्हणून लोकांच्या मनातून कोरोनाबद्दलची बरीच भीती दूर झालेली दिसते. (असे असले तरी आपणास सर्वांना त्यासंदर्भात गांभीर्याने सतर्क राहावे लागेल.) दीड

वर्षापासून माणूस घरात राहून त्याचे दैनंदिन जीवनमान खोळंबले. त्याच्या मनाची कोंडी होऊ लागली होती. ती फोडण्यासाठी घराबाहेर पडणे आवश्यक होते.

आता हळूहळू जीवनमान व समाजमन बदलू लागले आहे. शासनानेही काही गोष्टी सैल केल्या.

त्यामुळे कोरोनानंतरची भरारी हळूहळू का असेना; पण ही भरारी सर्वच क्षेत्रात घेतली जातेय. पर्यटन, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रातही आता बरीचशी निर्बंध उठवली गेली.

धार्मिक, ऐतिहासिक, निसर्ग स्थळे इत्यादी स्थळे आता शासनाच्या काही नियमांचे पालन करून हळूहळू सुरू होताना दिसत आहेत.

साहित्य क्षेत्राची भरारी चार भिंतीत राहून वाचकांची अभिरुची काहीशी मंदावली होती. चांगले पुस्तक विकत घ्यायला किंवा वाचनालयातून आणायला संधी

नव्हती. त्यामुळे वाचकांचे मन बेचैन झाले होते. दरम्यान ग्रंथालये ओस पडली होती. आता वाचकांची पावले ग्रंथाकडे वळू लागली आहेत. त्यावेळी ऑनलाइन कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथन, विविध व्याख्याने, काव्यवाचन स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, इत्यादी स्वरूपाचे साहित्यिक कार्यक्रम होऊ लागली. त्यातून प्रबोधनाबरोबरच मनोरंजनही होऊ लागले. ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रमामुळे वाचकांच्या अभिरूचीला गती मिळाली. शिवाय काही संगीत मैफली, काही नाट्यप्रयोग,नाट्य अभिवाचन इत्यादी कार्यक्रम सुरू झालेले आहेत. कोरोना काळातील विविध क्षेत्रातील, विविध स्वरूपाची अनुभूती संवेदनशील कवी, लेखकांच्या लेखणीतून झिरपू लागली. कोरोना काळातील जीवघेण्या अनुभवांवर अनेक पुस्तके जन्माला आली. कोरोनामुळे मागील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आता मराठी रसिकांना चाहूल लागली आहे. त्यांना संमेलनाचे मनस्वी वेध लागले आहे.

- प्रा. डॉ.रमेश माने, अमळनेर.