शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

आता कोरोनासोबत जगावे लागणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST

रक्ताची नाती ही या काळात दुरावली, जी परकी वाटत होती ती जवळची झाली. या काळात सर्व जगच जणू भेदरलेले ...

रक्ताची नाती ही या काळात दुरावली, जी परकी वाटत होती ती जवळची झाली. या काळात सर्व जगच जणू भेदरलेले होते. माणसं पहिल्यांदाच इतकी भयंकर हादरली होती. प्रारंभी कोरोनाची कमालीची भीती होती. कालांतराने कोरोनाबद्दल असलेल्या समज-गैरसमजाबद्दलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतन-मंथन होऊ लागले होते. शेवटी आपल्याला कोरोनासोबत जगावे लागेल की काय, जणू अशा निष्कर्षाप्रत यावे लागले. किंबहुना आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागेल, अशी जणू मानसिकता होऊन गेली. म्हणून लोकांच्या मनातून कोरोनाबद्दलची बरीच भीती दूर झालेली दिसते. (असे असले तरी आपणास सर्वांना त्यासंदर्भात गांभीर्याने सतर्क राहावे लागेल.) दीड

वर्षापासून माणूस घरात राहून त्याचे दैनंदिन जीवनमान खोळंबले. त्याच्या मनाची कोंडी होऊ लागली होती. ती फोडण्यासाठी घराबाहेर पडणे आवश्यक होते.

आता हळूहळू जीवनमान व समाजमन बदलू लागले आहे. शासनानेही काही गोष्टी सैल केल्या.

त्यामुळे कोरोनानंतरची भरारी हळूहळू का असेना; पण ही भरारी सर्वच क्षेत्रात घेतली जातेय. पर्यटन, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रातही आता बरीचशी निर्बंध उठवली गेली.

धार्मिक, ऐतिहासिक, निसर्ग स्थळे इत्यादी स्थळे आता शासनाच्या काही नियमांचे पालन करून हळूहळू सुरू होताना दिसत आहेत.

साहित्य क्षेत्राची भरारी चार भिंतीत राहून वाचकांची अभिरुची काहीशी मंदावली होती. चांगले पुस्तक विकत घ्यायला किंवा वाचनालयातून आणायला संधी

नव्हती. त्यामुळे वाचकांचे मन बेचैन झाले होते. दरम्यान ग्रंथालये ओस पडली होती. आता वाचकांची पावले ग्रंथाकडे वळू लागली आहेत. त्यावेळी ऑनलाइन कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथन, विविध व्याख्याने, काव्यवाचन स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, इत्यादी स्वरूपाचे साहित्यिक कार्यक्रम होऊ लागली. त्यातून प्रबोधनाबरोबरच मनोरंजनही होऊ लागले. ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रमामुळे वाचकांच्या अभिरूचीला गती मिळाली. शिवाय काही संगीत मैफली, काही नाट्यप्रयोग,नाट्य अभिवाचन इत्यादी कार्यक्रम सुरू झालेले आहेत. कोरोना काळातील विविध क्षेत्रातील, विविध स्वरूपाची अनुभूती संवेदनशील कवी, लेखकांच्या लेखणीतून झिरपू लागली. कोरोना काळातील जीवघेण्या अनुभवांवर अनेक पुस्तके जन्माला आली. कोरोनामुळे मागील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आता मराठी रसिकांना चाहूल लागली आहे. त्यांना संमेलनाचे मनस्वी वेध लागले आहे.

- प्रा. डॉ.रमेश माने, अमळनेर.