शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात ३०० ते ४०० रोजंदारीही सुटत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:16 IST

कोरोना परिणाम : गाड्या सुरू असल्या तरी विक्रेते व व्यवसायिकांचे अर्थचक्र बिघडलेलेच जळगाव : कोरोनापूर्वी दिवसभरात ३०० ते ४०० ...

कोरोना परिणाम : गाड्या सुरू असल्या तरी विक्रेते व व्यवसायिकांचे अर्थचक्र बिघडलेलेच

जळगाव : कोरोनापूर्वी दिवसभरात ३०० ते ४०० रुपये

रोजंदारीही आरामात यायची. स्टेशनवरील सर्व विक्रेते, हमाल बांधव व कॅन्टीन चालकांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळायचे. मात्र, कोरोनामुळे याचा येथील विक्रेते, हमाल बांधव व कॅन्टीन व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या रेल्वेगाड्या सुरू असल्या तरी दिवसभरात ३०० ते ४०० रोजंदारीही सुटत नसून, १५० ते २०० रुपयांवर रोजंदारी आली असल्याची खंत जळगाव रेल्वे स्टेशनवरील विक्रेते, हमाल बांधव व व्यावसायिकांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.

कोरोनामुळे गेल्या वर्षी सहा महिने रेल्वे सेवा ठप्प होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर गेल्या वर्षी दिवाळीनंतर टप्प्या-टप्प्याने ही सेवा सुरू झाली. सध्या स्थतीला आता लांब पल्ल्याच्या बहुतांश रेल्वेगाड्या सुरू आहेत. गाड्या सुरू झाल्यामुळे या गाड्यांवर अवलंबून असलेले हमाल बांधव, विविध प्रकारचे विक्रेते, कॅन्टीन व पुस्तकांचे स्टॉल पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, असे असले तरी कोरोनापूर्वी व्यवसायाला जो प्रतिसाद होता. तो प्रतिसाद आता राहिला नसल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. कोरोनामुळे प्रवासी बाहेरचे खाणे-पिणे टाळत असल्यामुळे, साहजिकच वडापाव, समोसा, कचोरी या व्यावसायिकांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

हमाल बांधव म्हणतात, दिवसाला फक्त १०० ते १५० रुपयेच मिळतात..

जळगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने नियुक्त केलेले अधिकृत २२ हमाल बांधव आहेत. यातील काही हमाल बांधव दिवसाला स्टेशनवर थांबतात तर काही रात्री थांबतात. रेल्वे प्रशासनाने ठरविलेल्या नियमानुसार लहान व मोठे ओझे पाहून हमाली घेत असल्याचे संजय गवळी, सादिक खाटीक व इतर हमाल बांधवांनी सांगितले. कोरोनापूर्वी रेल्वेला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी राहत असल्याने दिवसभरात ३०० ते ४०० रुपये मिळायचे. मात्र, कोरोनामुळे आता बहुतांश प्रवासी हमाल बांधवांमार्फत सामानाची वाहतूक न करता स्वतः नेतात. तसेच स्टेशनवर सरकते जिने, लिफ्ट व रॅम्प झाल्यामुळे अनेक प्रवासी हमाल बांधवांची मदत न घेता स्वतः सामान नेतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा हमाल बांधवांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला असून, दिवसाला १०० ते १५० रोजंदारी मिळत असल्याचे सांगितले. तर कधी कधी तेवढे पैसेही मिळत नसल्याचे या हमाल बांधवांनी सांगितले.

इन्फो :

तर पॅसेंजर बंदमुळे अधिकच नुकसान

स्टेशनवरील चहा व विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सांगितले की, वर्षभरापासून भुसावळ विभागातून विविध ठिकाणी धावणाऱ्या १६ पसेंजर बंद आहेत. या गाड्या सुरू असताना ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक प्रवासात खाद्यपदार्थ खरेदी करतात. त्यामुळे खाद्यपदार्थ, चहा विक्रेते व कॅन्टीन चालकांचाही बऱ्यापैकी व्यवसाय व्हायचा. मात्र, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने निम्मा व्यवसाय बुडत आहे. पॅसेंजर बंदमुळे अधिकच नुकसान मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याने, रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसनंतर आता पॅसेंजर गाड्याही सुरू करण्याची मागणी या व्यावसायिकांमधून होत आहे.

इन्फो :

स्टेशनवर सध्या पाच कॅन्टीन व ४० विक्रेते

जळगाव रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थांचे पाच

कॅन्टीन असून व ४० विक्रेते या सर्व ठिकाणी कामाला आहेत. साधारण एका कॅन्टीनवर सात ते आठ कामगार असून, प्रत्येक कामगार त्याच्या सोयीनुसार स्टेशनवर व्यवसाय करतो. यात

हे कामगार कॅन्टीनवरील चहा, कचोरी, समोसा, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट व इतर तळलेल्या पदार्थांचा समावेश असतो. जो कामगार जास्त पदार्थ विक्री करेल त्याला त्यानुसार कमिशन दिले जात असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

इन्फो :

कोरोनाच्या पूर्वी दिवसभरात कधी ३०० तर कधी ४०० रुपये रोज पडायचा.मात्र, आता कोरोनामुळे व्यवसाय कमी झाला आहे. सध्या फार फार तर २०० ते २५० रुपये रोज पडत आहे. त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.

गणेश पाटील, चहा विक्रेता

मी गेल्या अनेक वर्षापासून गाडीत विविध खाद्यपदार्थ विक्री करतो. कोरोनापूर्वी दिवसाला सहजच ५०० रुपये रोजंदारी सुटायची. मात्र,आता कोरोनामुळे बहुतांश नागरिक बाहेरील पदार्थ खाण्यास टाळत असल्याने व त्यात पॅसेंजर बंद असल्याने निम्यावर व्यवसाय आला आहे.

रोहित आमले, खाद्यपदार्थ विक्रेता

सध्या रेल्वेगाड्या सुरू असल्या तरी पूर्वीसारखा व्यवसाय नाही. कोरोनापूर्वी जो व्यवसाय होत होता तो आता नाही. दिवसभरात सर्व खर्च वगैरे काढून २०० ते ३०० रुपये रोज पडत आहे.

विनोद जैन, व्यावसायिक