शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाच्या आणि निधीच्या अभावाने अनेक प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

अमळनेर : रखडलेले आणि नादुरुस्त प्रकल्प वेळेवर निधी न मिळाल्याने त्यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे, त्यातील तांत्रिक अडचणींमुळे ...

अमळनेर : रखडलेले आणि नादुरुस्त प्रकल्प वेळेवर निधी न मिळाल्याने त्यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे, त्यातील तांत्रिक अडचणींमुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही त्याचे फलित योग्य मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहेत.

२०१८ पर्यंत निम्न तापी प्रकल्प २७५१ कोटींपर्यंत गेला होता. मेरी कडून नदी पात्रातील कामाचे संकल्प चित्र तयार करून घेण्यासाठी यंत्रणेला अनेक वर्षे लागली. त्यांनतर या कामाला काही वर्षे उलटल्याने त्याचे ॲनालिसिस करण्यासाठी आयआयटी पवईकडे देण्यात आले होते. आयआयटी पवईने प्रकल्पाची इम्पोर्टन्स व्हॅल्यू चांगली असल्याचे सांगितल्याने सीडीओ मेरी कडे आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने त्यांच्या व शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आता संकल्प चित्र आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या आयआयटी पवई किंवा तत्सम यंत्रणेकडून करून घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे त्याशिवाय नदी पात्रातील काम शक्य नाही. पुनर्वसनाच्या बाबतीतही कोविड मुळे आणि भूमिअभिलेख विभागाकडे यंत्रणा नसल्याने अनेक ठिकाणची मोजणी थांबली आहे. तर सात्री गावाच्या पुनर्वसनाचे बांधकाम ही थांबले आहे.

निम मांजरोद पूल

निम्न तापी प्रकल्पाच्या खाली जळगाव व धुळे जिल्ह्याला तसेच अमळनेर व शिरपूर तालुक्याला जोडणारा निम मांजरोद पूल लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर घेण्यात आला होता तो देखील आता तापी महामंडळाने त्यांच्या खर्चातून लागल्याने पुलाचे काम रद्द झाले आहे.

सानेगुरुजी उपसा सिंचन योजना

निम्न तापी प्रकल्पाच्या सध्य स्थितीतील आहे त्या जलसाठ्यावर उपसा करून शेतीतील सिंचन वाढवण्यासाठी बोहरा येथील सानेगुरुजी उपसा सिंचन योजना दुरुस्त करण्यासाठी आधी तीन कोटी रुपयेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला कामाबाबत मात्र काही प्रगती नाही पुन्हा लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे 11 कोटींची सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळवण्यात आली मात्र यासाठी स्वतंत्र लेखाशीर्षखाली हा निधी मंजूर करावा लागणार आहे. निम्न तापी प्रकल्पातून हे काम होणे शक्य नाही त्यामुळे सानेगुरुजी उपसा सिंचन योजना देखील बासनात गुंडाळून पडलेली आहे.

बोरी वरील बंधारे

मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत येणारा बोरी नदीवरील भिलाली गावाच्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याला सव्वा तीन कोटींची मूळ प्रशासकीय मान्यता २०१२ मध्ये देण्यात आली होती मात्र दिरंगाई आणि भरपूर मंजूर कामे व निधीचा अभाव यामुळे त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता ११ कोटींपर्यंत गेली होती त्याचे कामही झाले तरी पाट्या टाकण्यास अडचण येत असल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी असल्याचे समजते त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही गुणवत्तेबाबत संशय निर्माण होतो. तीच बाब फापोरे बंधाऱ्याच्या बाबतीत आहे.

बेटावदजवळील बंधाऱ्याला गळती

पांझरा नदीवरील बेटावद जवळ असलेला बंधाऱ्याला दोन ते तीन वर्षांपासून गळतीअसल्याने कोट्यवधी लिटर पाणी वाहून जात असल्याने सिंचन, पाणी टंचाई याचे दुष्परिणाम होत आहेत. हा बंधारा धुळे जिल्ह्याच्या अखत्यारीतील असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि आता शहापूर गावाजवळ नवीन बंधारा मंजूर झाल्याचे समजते. सामान्य जनतेच्या कररूपी पैशातून प्रकल्प उभारले जातात मात्र पैशाचा अपव्यय आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेचा फंडा मलिदा चाखण्याचा प्रकार होत आहे.