शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

‘त्या’ पोलिसांचा बडतर्फीचा आदेश शासनाकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST

जळगाव : लॉकडाऊनकाळातील दारू तस्करी केल्याचा ठपका ठेवून सेवेतून बडतर्फ केलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे ...

जळगाव : लॉकडाऊनकाळातील दारू तस्करी केल्याचा ठपका ठेवून सेवेतून बडतर्फ केलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे या तिघांना राज्य शासनाने सेवेत सामावून घेतले असून तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा आदेश रद्द केलेला आहे.

गेल्या वर्षी एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊनकाळात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्गावर अवैध दारूचा साठा पकडला होता. नशिराबाद येथील गोदामातून शहरातील काही दारू दुकाने व पाळधी येथे हा साठा नेण्यात येत होता. या तस्करीत पोलिसांनी मदत केल्याचा ठपका ठेवून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते, तर तालुका पोलीस ठाण्याचे भारत शांताराम पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालावरून तिघांना पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी बडतर्फ केले होते तर भारत पाटील यांना निलंबित केले होते. निरीक्षक शिरसाठ यांचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला होता.

कारवाईविरोधात न्यायालय व शासनाकडे अपील

या कारवाईविरोधात निरीक्षक शिरसाठ यांच्यासह सुरवाडे, पाटील व जाधव यांनी उच्च न्यायालय व राज्य शासनाकडे धाव घेतली होती. गृहविभागाकडे वेळोवेळी झालेल्या सुनावणीत पोलीस अधिकारी व या चारही जणांनी आपले म्हणणे, कागदपत्रे सादर केले. १७ जून २०२१ रोजी अंतिम सुनावणी होऊन ६ ऑगस्ट रोजी गृहविभागाने बडतर्फीची शिक्षा रद्द करून सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या तिघांना सेवेत सामावून घेत मुख्यालयात नियुक्ती दिली. दरम्यान, शिरसाठ यांच्याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

कोट...

शासनाच्या आदेशानुसार तीन कर्मचाऱ्यांना आज सेवेत सामावून घेण्यात आले आहे. निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्याबाबत मात्र अजून शासनाचे आदेश प्राप्त झालेले नाही. तिघांना मुख्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे.

-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक