शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेलेच

By admin | Updated: May 25, 2017 12:27 IST

तिस:या रेल्वे मार्गास प्रारंभ

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.25- केंद्रातील भाजपा आघाडी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षाच्या कार्य काळात महामार्गाच्या चौपदरीकरणासह जिल्ह्यातील अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होतील अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र ना चौपदरीकरण झाले ना रखडलेले प्रकल्प मार्गी लागले. जळगाव शहरातील उड्डाणपुलांचाही प्रश्न अद्याप कायम आहे. 
बलून बंधारे कधी होणार?
केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी जळगाव जिल्ह्यात येऊन 2016 मध्ये हवाई पाहणी केली. त्यांनी गिरणा नदीवर सात ठिकाणी बलून बंधारे बांधले जातील असे आश्वासन दिले. गिरणा खोरे हे नेहमी उपेक्षित राहीले आहे. गिरणा नदीचे पाणी अडविण्यासाठी फारसे प्रय} झालेच नाहीत जि.प. निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी सात बलून बंधा:यांचे काम एप्रिल 2017 मध्ये सुरू करू, असे म्हटले होते. पण एक वीटही अजून या बंधा:यांसाठी लावलेली नाही. 
जिल्ह्यातील  शिवाजीनगर, पिंप्राळा या प्रमुख उड्डाणपुलांचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. याचे कारण म्हणजे त्यांना निधी उपलब्ध करून दिला जात नाही. पंतप्रधान ग्राम सडक योजना जवळपास गुंडाळल्याची परिस्थिती आहे. ग्रामीण रस्त्यांना थेट केंद्राकडून निधी अशी ही कल्पना होती. परंतु पंतप्रधान रस्ते विकास योजनेला निधीच नाही. चोपडा, यावल, अमळनेर तालुक्यातील रस्ते अपूर्ण आहेत. खुद्द आमदारांनी याबाबतच्या तक्रारी खरीपपूर्व आढावा बैठकीत अलीकडेच केल्या होत्या. चिखली ते फागणे यादरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकण होणार म्हणून दोन वर्षापासून विविध निर्णय जाहीर झाले. पण काम सुरु झालेले नाही. आता येत्या जुलै महिन्यात ही प्रक्रिया होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल केव्हा?
जळगाव शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे. हा उड्डाणपूल उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. आतार्पयत का उभारला नाही? असा प्रश्न विरोधकांनी अनेकदा केला. हा पूल आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे.  हजारो वाहनधारक, ग्रामस्थांना व निम्म्या जळगावकरांना या पुलावरून अवजड वाहतूक होत नसल्याने हकनाक त्रास सहन करावा लागतो. खासदारांनी कधी या पुलाबाबतचा मुद्दा जाहीरपणे मांडलेला दिसून येत नाही. 
टेक्सटाईल क्लस्टरची फक्त घोषणा
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी खान्देशच्या कापसाचा मुद्दा मांडला होता. आता कापूस गुजरातेत न्यावा लागणार नाही, जळगावातच टेक्सटाईल उद्योग उभारू, असे मोदींनी जळगावात लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या जाहीर सभेत म्हटले होते. नंतर स्वत: खासदार ए.टी.पाटील यांनी 2014 मध्ये जिल्ह्यात बुलडाणाच्या धर्तीवर लहान टेक्सटाईल क्लस्टर आणण्याचा प्रयत्न असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले होते. परंतु हे क्लस्टरही सुरू झाले नाही. अजूनही गुजरातमध्येच जिल्ह्याचा कापूस जातो. 
जलपुनर्भरण योजना केंद्रीय प्रकल्पात समाविष्ट
महाकाय जलपुनर्भरण योजना ही केंद्रीय प्रकल्पास समाविष्ट झालेली आहे. 2016 मध्ये केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी या योजनेची पाहणी करून हा एकमेव महाकाय पुनर्भरण प्रकल्प असून, ही महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावण्यासाठी निधी कमी पडणार नाही, असे जिल्हा नियोजन भवनातील आढावा बैठकीत म्हटले होते. पण या प्रकल्पासंबंधीच्या कामाच्या हालचाली दिसून येत नाहीत.