शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेलेच

By admin | Updated: May 25, 2017 12:27 IST

तिस:या रेल्वे मार्गास प्रारंभ

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.25- केंद्रातील भाजपा आघाडी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षाच्या कार्य काळात महामार्गाच्या चौपदरीकरणासह जिल्ह्यातील अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होतील अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र ना चौपदरीकरण झाले ना रखडलेले प्रकल्प मार्गी लागले. जळगाव शहरातील उड्डाणपुलांचाही प्रश्न अद्याप कायम आहे. 
बलून बंधारे कधी होणार?
केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी जळगाव जिल्ह्यात येऊन 2016 मध्ये हवाई पाहणी केली. त्यांनी गिरणा नदीवर सात ठिकाणी बलून बंधारे बांधले जातील असे आश्वासन दिले. गिरणा खोरे हे नेहमी उपेक्षित राहीले आहे. गिरणा नदीचे पाणी अडविण्यासाठी फारसे प्रय} झालेच नाहीत जि.प. निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी सात बलून बंधा:यांचे काम एप्रिल 2017 मध्ये सुरू करू, असे म्हटले होते. पण एक वीटही अजून या बंधा:यांसाठी लावलेली नाही. 
जिल्ह्यातील  शिवाजीनगर, पिंप्राळा या प्रमुख उड्डाणपुलांचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. याचे कारण म्हणजे त्यांना निधी उपलब्ध करून दिला जात नाही. पंतप्रधान ग्राम सडक योजना जवळपास गुंडाळल्याची परिस्थिती आहे. ग्रामीण रस्त्यांना थेट केंद्राकडून निधी अशी ही कल्पना होती. परंतु पंतप्रधान रस्ते विकास योजनेला निधीच नाही. चोपडा, यावल, अमळनेर तालुक्यातील रस्ते अपूर्ण आहेत. खुद्द आमदारांनी याबाबतच्या तक्रारी खरीपपूर्व आढावा बैठकीत अलीकडेच केल्या होत्या. चिखली ते फागणे यादरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकण होणार म्हणून दोन वर्षापासून विविध निर्णय जाहीर झाले. पण काम सुरु झालेले नाही. आता येत्या जुलै महिन्यात ही प्रक्रिया होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल केव्हा?
जळगाव शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे. हा उड्डाणपूल उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. आतार्पयत का उभारला नाही? असा प्रश्न विरोधकांनी अनेकदा केला. हा पूल आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे.  हजारो वाहनधारक, ग्रामस्थांना व निम्म्या जळगावकरांना या पुलावरून अवजड वाहतूक होत नसल्याने हकनाक त्रास सहन करावा लागतो. खासदारांनी कधी या पुलाबाबतचा मुद्दा जाहीरपणे मांडलेला दिसून येत नाही. 
टेक्सटाईल क्लस्टरची फक्त घोषणा
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी खान्देशच्या कापसाचा मुद्दा मांडला होता. आता कापूस गुजरातेत न्यावा लागणार नाही, जळगावातच टेक्सटाईल उद्योग उभारू, असे मोदींनी जळगावात लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या जाहीर सभेत म्हटले होते. नंतर स्वत: खासदार ए.टी.पाटील यांनी 2014 मध्ये जिल्ह्यात बुलडाणाच्या धर्तीवर लहान टेक्सटाईल क्लस्टर आणण्याचा प्रयत्न असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले होते. परंतु हे क्लस्टरही सुरू झाले नाही. अजूनही गुजरातमध्येच जिल्ह्याचा कापूस जातो. 
जलपुनर्भरण योजना केंद्रीय प्रकल्पात समाविष्ट
महाकाय जलपुनर्भरण योजना ही केंद्रीय प्रकल्पास समाविष्ट झालेली आहे. 2016 मध्ये केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी या योजनेची पाहणी करून हा एकमेव महाकाय पुनर्भरण प्रकल्प असून, ही महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावण्यासाठी निधी कमी पडणार नाही, असे जिल्हा नियोजन भवनातील आढावा बैठकीत म्हटले होते. पण या प्रकल्पासंबंधीच्या कामाच्या हालचाली दिसून येत नाहीत.