शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

महाकाय प्रकल्पासाठी सर्वेक्षण वर्षभरात

By admin | Updated: March 2, 2015 12:59 IST

भूजल पातळी उंचावण्यासाठी राज्यभरासह देशात अभिनव ठरणार्‍या तापी आणि सातपुड्यादरम्यानच्या 'मेगा रिचार्ज' मंजूर झाल्यास मंजूर झाल्यास वर्षभरात सर्वेक्षण पूूर्ण होईल.

जळगाव : भूजल पातळी उंचावण्यासाठी राज्यभरासह देशात अभिनव ठरणार्‍या तापी आणि सातपुड्यादरम्यानच्या 'मेगा रिचार्ज' (महाकाय पुनर्भरण) प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी २१ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्या दीड वर्षापासून राज्य शासनाच्या अर्थमंत्रालयाकडे विचाराधीन आहे, हा निधी मंजूर झाल्यास वर्षभरात सर्वेक्षण पूूर्ण होईल आणि या महाकाय योजनेच्या कामाला गती येईल, असे आश्‍वासक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात, तापी ते सातपुड्यादरम्यानच्या क्षेत्रात गेल्या ४0-५0 वर्षांपासून ऊस, केळी आदी पिकांसाठी भूजलाचा प्रचंड उपसा सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी १ ते २ मीटर पाणी पातळी खोल जात आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेऊन हे क्षेत्र गेल्या ५-६ वर्षांपासून 'डार्क झोन' म्हणून घोषित झालेले असून विहीर वा ट्यूबवेल करण्यावर निर्बंध आहेत. हे क्षेत्र भूवैज्ञानिकांच्या दृष्टीने 'बझारा झोन' (भरपूर पाणी जमिनीत जिरणे, झिरपणे आणि काही तासात ते विहिरींना येणे) म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे हा प्रकल्प वरदान ठरणारा आहे.त्यासाठी माजी खासदार व विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि तापी पाटबंधारे महामंडळाचे माजी अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. राज्याचे जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न पाहता या प्रकल्पाला गती लाभेल, असे मानले जात आहे.

-------------------

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.डी.सिंग आणि त्यांचे साहाय्यक आर.पी.सिंग आणि केंद्रीय भूजल मंडळाचे संचालक पी.के.सिंग या जलतज्ज्ञांसह सुमारे १0 जणांच्या उच्चपदस्थांनी बुधवारी बर्‍हाणपूर ते चोपडा दरम्यानच्या क्षेत्राची पाहणी केली. त्यात तापी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी अभियंता पी.आर. भामरे, मुख्य अभियंता एम.एम. शिंदे आदींचाही समावेश होता. नंतर गुरुवारी या प्रकल्पासंबंधी जैन हिल्सला बैठकही झाली. खरिया घुटीला तापीवर वळण बंधारा बांधला जाईल, त्यातून तापीचे पाणी २३२ किलोमीटर लांबीच्या कॅनॉलने थेट चोपडा तालुक्याच्या पश्‍चिम टोकाला अनेर नदीपर्यंत जाईल. सातपुड्याच्या डोंगरात उगम पावणार्‍या नदी, नाल्यांमध्ये ते सोडले जाईल. याकामी भूसंपादन, पुनर्वसन जवळपास शून्य असेल, साहजिकच येत्या काही वर्षात हे पाणी भूगर्भात जिरून पाणी पातळी वाढून पूर्ववत होऊ शकेल. पाणीटंचाई इतिहासजमा होत वर्षभर पिके घेता येतील.