शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

महाकाय प्रकल्पासाठी सर्वेक्षण वर्षभरात

By admin | Updated: March 2, 2015 12:59 IST

भूजल पातळी उंचावण्यासाठी राज्यभरासह देशात अभिनव ठरणार्‍या तापी आणि सातपुड्यादरम्यानच्या 'मेगा रिचार्ज' मंजूर झाल्यास मंजूर झाल्यास वर्षभरात सर्वेक्षण पूूर्ण होईल.

जळगाव : भूजल पातळी उंचावण्यासाठी राज्यभरासह देशात अभिनव ठरणार्‍या तापी आणि सातपुड्यादरम्यानच्या 'मेगा रिचार्ज' (महाकाय पुनर्भरण) प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी २१ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्या दीड वर्षापासून राज्य शासनाच्या अर्थमंत्रालयाकडे विचाराधीन आहे, हा निधी मंजूर झाल्यास वर्षभरात सर्वेक्षण पूूर्ण होईल आणि या महाकाय योजनेच्या कामाला गती येईल, असे आश्‍वासक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात, तापी ते सातपुड्यादरम्यानच्या क्षेत्रात गेल्या ४0-५0 वर्षांपासून ऊस, केळी आदी पिकांसाठी भूजलाचा प्रचंड उपसा सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी १ ते २ मीटर पाणी पातळी खोल जात आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेऊन हे क्षेत्र गेल्या ५-६ वर्षांपासून 'डार्क झोन' म्हणून घोषित झालेले असून विहीर वा ट्यूबवेल करण्यावर निर्बंध आहेत. हे क्षेत्र भूवैज्ञानिकांच्या दृष्टीने 'बझारा झोन' (भरपूर पाणी जमिनीत जिरणे, झिरपणे आणि काही तासात ते विहिरींना येणे) म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे हा प्रकल्प वरदान ठरणारा आहे.त्यासाठी माजी खासदार व विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि तापी पाटबंधारे महामंडळाचे माजी अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. राज्याचे जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न पाहता या प्रकल्पाला गती लाभेल, असे मानले जात आहे.

-------------------

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.डी.सिंग आणि त्यांचे साहाय्यक आर.पी.सिंग आणि केंद्रीय भूजल मंडळाचे संचालक पी.के.सिंग या जलतज्ज्ञांसह सुमारे १0 जणांच्या उच्चपदस्थांनी बुधवारी बर्‍हाणपूर ते चोपडा दरम्यानच्या क्षेत्राची पाहणी केली. त्यात तापी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी अभियंता पी.आर. भामरे, मुख्य अभियंता एम.एम. शिंदे आदींचाही समावेश होता. नंतर गुरुवारी या प्रकल्पासंबंधी जैन हिल्सला बैठकही झाली. खरिया घुटीला तापीवर वळण बंधारा बांधला जाईल, त्यातून तापीचे पाणी २३२ किलोमीटर लांबीच्या कॅनॉलने थेट चोपडा तालुक्याच्या पश्‍चिम टोकाला अनेर नदीपर्यंत जाईल. सातपुड्याच्या डोंगरात उगम पावणार्‍या नदी, नाल्यांमध्ये ते सोडले जाईल. याकामी भूसंपादन, पुनर्वसन जवळपास शून्य असेल, साहजिकच येत्या काही वर्षात हे पाणी भूगर्भात जिरून पाणी पातळी वाढून पूर्ववत होऊ शकेल. पाणीटंचाई इतिहासजमा होत वर्षभर पिके घेता येतील.