शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST

आनंद सुरवाडे स्टार डमी : ९२१ जळगाव : पावसाळा सुरू झाला असून, याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता ...

आनंद सुरवाडे

स्टार डमी : ९२१

जळगाव : पावसाळा सुरू झाला असून, याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत विविध विषाणूजन्य आजारांसह पोटांच्या विकारांमध्येही वाढ होत असते, अशा वेळी विशेषत: पावसाळ्यात आहाराच्या बाबतीत अधिक दक्षता घेतलेली आरोग्यासाठी अतिउत्तम असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार, विषाणूजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. वातावरणातील ओलाव्यामुळे ते वातावरणात अधिक काळ जिवंत राहातात, अशा वेळी लागण होण्याचा धोका अधिक असतो. यात उलटी, जुलाब, ताप हे विकार अधिक उद्भवतात. शिवाय आहाराकडे लक्ष दिले गेले नाही तर पोटाच्या विकारांमध्ये वाढ होते. त्यामुळे पावसाळ्यात याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.

पावसाळ्यात हे खायला हवे

- पावसाळ्यात साजूक तुपाचा आहारात समावेश करावा, तूप हे गाईचे असावे.

- पोळी व भातापेक्षा ज्वारीचा अधिक वापर आहारात असावा, गहू व तांदूळ त्यामानाने पचायला जड असतात.

-तुरीच्या डाळीपेक्षा मुगाची डाळ आहारात असावी, त्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही.

- हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचा जेवण बनविणात वापर करावा

- जेवण हे गरम गरम केल्यास या दिवसांमध्ये चांगले असते, शिवाय पाणी नेहमी उकळून थंड करून प्यावे.

- फळभाज्यांवर अधिक भर द्यायला हवा

पावसाळ्यात हे खाणे टाळा

- पावसाळ्यात पचनास जड असे पदार्थ टाळावेत, तेलकट खाऊ नये.

- आंबवलेले पदार्थ टाळावेत, टमाट्याचे प्रमाण कमी करावे.

- आयुर्वेदानुसार हिरव्या पालेभाज्यांचे सेवन पावसाळ्यात करू नये.

- गहू, तांदूळ यांचे प्रमाण कमी करावे.

- लोणचे खाणे शक्यतोवर टाळावे.

- जेवढी भूक असेल त्यापेक्षा कमी जेवण करावे, कारण या दिवसांमध्ये पचनशक्ती ही कमी झालेली असते.

रस्त्यावरचे खाणे धोकादायक

- पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे जीवाणू व विषाणू हे वातावरणात अधिक काळ जिवंत राहतात, अशा वेळी त्यांच्यामुळे होणारे आजारही वाढतात. रस्त्यावरील पदार्थ हे निर्जंतूक नसतात, त्यामुळे त्यांच्यापासून अधिक धोका असतो.

- समोसा, कचोरी, असे पदार्थ खाल्याने आम्ल पित्ताचा त्रास अधिकच वाढतो.

- भेळपुरी, पाणीपुरी असे उघड्यावरचे पदार्थ तर पूर्णत: बंद करावेत.

कोट

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वात वाढतो आणि वातच सर्व आजारांचे कारण होतो. या कालावधीत पचनशक्ती कमी झालेली असते. तेव्हा पचनास हलके व कमी जेवण करावे. आंबवलेले पदार्थ, गोड, तेलकट, अतिथंड पदार्थ खाणे टाळावेत. आहारात ज्वारीचा समावेश करावा. गाईचे तूप आहारात घ्यावे. रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळावेत.

- डॉ. मिलिंद कांबळे, सहायक प्राध्यापक आयुर्वेद महाविद्यालय

कोट

पावसाळा सुरू झाला आहे. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्याने तसेच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्याने आहाराचे योग्य नियोजन असायला पाहिजे. जेवणात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या गोष्टी असाव्यात. पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे. त्याचप्रमाणे मांसाहारी पदार्थ शक्यतो टाळायला हवे. डाळी, अंडी, मोड आलेली कडधान्ये, यांना प्राधान्य द्यावे.

- डॉ. शाल्मी खानापूरकर, सहायक प्राध्यापिका, औषधवैद्यक शास्त्र विभाग