शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST

आनंद सुरवाडे स्टार डमी : ९२१ जळगाव : पावसाळा सुरू झाला असून, याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता ...

आनंद सुरवाडे

स्टार डमी : ९२१

जळगाव : पावसाळा सुरू झाला असून, याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत विविध विषाणूजन्य आजारांसह पोटांच्या विकारांमध्येही वाढ होत असते, अशा वेळी विशेषत: पावसाळ्यात आहाराच्या बाबतीत अधिक दक्षता घेतलेली आरोग्यासाठी अतिउत्तम असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार, विषाणूजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. वातावरणातील ओलाव्यामुळे ते वातावरणात अधिक काळ जिवंत राहातात, अशा वेळी लागण होण्याचा धोका अधिक असतो. यात उलटी, जुलाब, ताप हे विकार अधिक उद्भवतात. शिवाय आहाराकडे लक्ष दिले गेले नाही तर पोटाच्या विकारांमध्ये वाढ होते. त्यामुळे पावसाळ्यात याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.

पावसाळ्यात हे खायला हवे

- पावसाळ्यात साजूक तुपाचा आहारात समावेश करावा, तूप हे गाईचे असावे.

- पोळी व भातापेक्षा ज्वारीचा अधिक वापर आहारात असावा, गहू व तांदूळ त्यामानाने पचायला जड असतात.

-तुरीच्या डाळीपेक्षा मुगाची डाळ आहारात असावी, त्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही.

- हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचा जेवण बनविणात वापर करावा

- जेवण हे गरम गरम केल्यास या दिवसांमध्ये चांगले असते, शिवाय पाणी नेहमी उकळून थंड करून प्यावे.

- फळभाज्यांवर अधिक भर द्यायला हवा

पावसाळ्यात हे खाणे टाळा

- पावसाळ्यात पचनास जड असे पदार्थ टाळावेत, तेलकट खाऊ नये.

- आंबवलेले पदार्थ टाळावेत, टमाट्याचे प्रमाण कमी करावे.

- आयुर्वेदानुसार हिरव्या पालेभाज्यांचे सेवन पावसाळ्यात करू नये.

- गहू, तांदूळ यांचे प्रमाण कमी करावे.

- लोणचे खाणे शक्यतोवर टाळावे.

- जेवढी भूक असेल त्यापेक्षा कमी जेवण करावे, कारण या दिवसांमध्ये पचनशक्ती ही कमी झालेली असते.

रस्त्यावरचे खाणे धोकादायक

- पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे जीवाणू व विषाणू हे वातावरणात अधिक काळ जिवंत राहतात, अशा वेळी त्यांच्यामुळे होणारे आजारही वाढतात. रस्त्यावरील पदार्थ हे निर्जंतूक नसतात, त्यामुळे त्यांच्यापासून अधिक धोका असतो.

- समोसा, कचोरी, असे पदार्थ खाल्याने आम्ल पित्ताचा त्रास अधिकच वाढतो.

- भेळपुरी, पाणीपुरी असे उघड्यावरचे पदार्थ तर पूर्णत: बंद करावेत.

कोट

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वात वाढतो आणि वातच सर्व आजारांचे कारण होतो. या कालावधीत पचनशक्ती कमी झालेली असते. तेव्हा पचनास हलके व कमी जेवण करावे. आंबवलेले पदार्थ, गोड, तेलकट, अतिथंड पदार्थ खाणे टाळावेत. आहारात ज्वारीचा समावेश करावा. गाईचे तूप आहारात घ्यावे. रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळावेत.

- डॉ. मिलिंद कांबळे, सहायक प्राध्यापक आयुर्वेद महाविद्यालय

कोट

पावसाळा सुरू झाला आहे. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्याने तसेच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्याने आहाराचे योग्य नियोजन असायला पाहिजे. जेवणात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या गोष्टी असाव्यात. पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे. त्याचप्रमाणे मांसाहारी पदार्थ शक्यतो टाळायला हवे. डाळी, अंडी, मोड आलेली कडधान्ये, यांना प्राधान्य द्यावे.

- डॉ. शाल्मी खानापूरकर, सहायक प्राध्यापिका, औषधवैद्यक शास्त्र विभाग