शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

खरीपनंतर आता रब्बीचा हंगामही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असून, बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असून, बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. आता अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे रब्बी हंगाम देखील वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामातील नुकसानभरपाई देखील अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसताना आता रब्बीचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरिपातील नुकसानभरपाई रब्बीत भरून काढण्याची आशा देखील अवकाळी पावसाने फोल ठरविल्या आहेत.

यंदा हवामान बदल परिणामाचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. अतिवृष्टीमुळे खरीप तर आता अवकाळीमुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत जात आहेत. रब्बीची लागवड झाल्यानंतर डिसेंबर महिन्यातच अवकाळीने हजेरी लावली; मात्र तेव्हा फारसा फटका रब्बीच्या पिकांना बसला नव्हता; मात्र पिकांची चांगली वाढ झाली असून, त्यात दाणे तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच पाऊस झाल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

हरभऱ्याचा खार धुतला गेला, गव्हाची वाढही थांबणार

बुधवारी झालेल्या पावसामुळे हरभऱ्याचा खार धुतला गेला आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या दाणे लागण्याच्या प्रक्रियेला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असून, दाणे लहान व बारीकच राहण्याची शक्यता आहे. तर थंडीच गायब असल्याने गव्हाचीही वाढ खुंटली आहे. दादर व मक्याला देखील पावसाचा फटका बसला असून, जळगाव तालुक्यातील गिरणा व तापी पट्ट्यात रात्री पावसासोबतच हवेचा जोर देखील जास्त असल्याने दादर आडवी पडली आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे मक्यावर अळीचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता आहे.

काय आहे पावसाचे कारण

जम्मू-काश्मीर व त्याला लागून असलेल्या हिमाचल प्रदेश भागात पश्चिमी विक्षोभ तयार झाला आहे. हा विक्षोभ आता राजस्थानकडे सरकला आहे. त्यातच अरबी व बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे राजस्थानजवळ तयार झालेल्या विक्षोभाजवळच एकमेकांना आदळत आहेत. यामुळे महाराष्ट्रपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, यामुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, अजून ११ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरही १५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असून, किमान तापमान देखील १८ ते २० अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे.