शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

आरुषीचे प्रेत प्रांत कार्यालयात आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

सात्री गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने त्याचे पुनर्वसन सुरू आहे. त्यामुळे शासन या गावाला कोणत्याही सुविधा देत ...

सात्री गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने त्याचे पुनर्वसन सुरू आहे. त्यामुळे शासन या गावाला कोणत्याही सुविधा देत नाही आणि पुनर्वसन प्रक्रिया कासवाच्या गतीने सुरू आहे.

तीन वेळा प्रस्ताव व्यपगत झाले. उपमुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीनंतरदेखील पाटबंधारे महामंडळाने बैठकीतील निर्णयाची अंमलबाजवणी न केल्याने पुनर्वसन रखडले आहे. सात्री येथून बाहेर जाण्यासाठी कोणताच रस्ता नाही. निंभोरा कलाली गावाकडून जायचे असेल तर चार किमी पायी दऱ्या-खोऱ्यातून शेतातून जावे लागते.

पावसाळ्यात तेथे पाय फसतात आणि बोरी नदीवर पूल नसल्याने पुरातून जाता येत नाही. वर्षानुवर्षापासून ही समस्या भेडसावत असूनसुद्धा प्रशासन लक्ष देत नाही. म्हणून संतप्त गावकरी उपविभागीय कार्यालयावर धडकले होते. मुलीच्या नातेवाइकांनी आक्रोश केला होता.

पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी प्रशासनाने या मुलीचे प्रेत सात्री गावापर्यंत नेऊन अंत्यसंस्कार करून दाखवावे, असे आव्हानच दिले होते. उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू करून आपत्ती व्यवस्थापनाची बोट मागवून शव गावात नेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र मंत्रालयातून परवानगी आणि किचकट प्रक्रियेमुळे बोट वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही.

अखेरीस प्रशासनाने महेंद्र बोरसे यांनाच विनंती करत ज्या लोकांनी आरुषीचे प्रेत आणले, त्यांनाच ते घेऊन जाण्यासाठी विनंती केली. या वेळी निम्न तापी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी मुकुंद चौधरी, अभियंता डी.सी. पाटील हेदेखील हजर होते. सीमा अहिरे यांनी लवकरच पुनर्वसनासंदर्भात बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि निंभोऱ्याकडून या गावांसाठी विशेष रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. प्रांत, तहसीलदार, तलाठी पथक यांनी डांगरी गावापर्यंत प्रेत नेले. तेथून त्याच गावकऱ्यांनी नदीतून प्रेत परत सात्री येथे नेऊन अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, गावात ७० लोक आजारी होते. गावातील आशा स्वयंसेवक आजारी पडल्याने कोणालाच औषधी मिळू शकली नव्हती. आजारी असतानाही आसाराम युवराज भिल, आनंदा पुंजू भिल, सोपान गुलाब भिल, सुखदेव रावण भिल, अजय किशोर भिल या तरुणांनी नदीतून आरुषीला डांगरी येथे आणून तेथून ग्रामीण रुग्णालयात आणले होते. या वेळी केस पेपर काढूनही आजारी लोकांना कर्मचारी वेळेवर उपचार करत नसल्याने त्यांचा संताप अधिकच वाढला होता.

उपविभागीय कार्यालयात डॉक्टरांबद्दल नाराजी व्यक्त केल्याने डॉ. प्रकाश ताळे, डॉ. आशिष पाटील, जितेंद्र जाधव, परिचारिका वळवी यांनी आंदोलकांना उपविभागीय कार्यालयात येऊन आजारी आंदोलकांवर उपचार केले. त्यादरम्यान डॉ. गिरीश गोसावी यांनी आपले पथक निंभोरामार्गे चार किमी गाऱ्यातून पायी चालवून सात्री येथे पाठवून उपचार सुरू केले होते.

वर्षानुवर्षाची व्यथा मांडताना बोरसे यांनी सांगितले की, नदीतून प्रवास करताना टोकदार खडी, काच, काटे पायात टोचल्याने २२ लोकांना गँगरीन होऊन ते अपंग झाले आहेत. तरी प्रशासनाला जाग आली नाही.

घटना अतिशय दुर्दैवी आहे, यापुढे असे होणार नाही याची काळजी प्रशासनाला घेण्याचे आदेश देतो व पुनर्वसन तत्काळ करून गावचे स्थलांतर केले जाईल.

- अनिल पाटील, आमदार, अमळनेर