शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

जालना : कोरोनाच्या निर्बंधांनंतर सर्वच व्यवहार हळूहळू सुरू झाले आहेत. एसटीची चाकेही रस्त्यावर धावत आहेत. सध्या जालना जिल्ह्यात २०० ...

जालना : कोरोनाच्या निर्बंधांनंतर सर्वच व्यवहार हळूहळू सुरू झाले आहेत. एसटीची चाकेही रस्त्यावर धावत आहेत. सध्या जालना जिल्ह्यात २०० बसपैकी १६० बस सुरू आहेत. अद्यापही ४० बस आगारातच उभ्या असून, अनेक गावांतील नागरिकांना बस सुरू नसल्याने टमटमचा आधार घ्यावा लागत आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने निर्बंध हटविले आहेत. सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. एसटी बसही सुरू झाल्या आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असतानाही काही गावांमध्ये अद्यापही बस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना टमटमने प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळाने तातडीने बस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

या गावांना टमटमचा आधार

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद, हिसोडा, तडेगाव, पिंपळगाव, पारध वालसावंगी या गावांमधील काही फेऱ्या बंद आहेत. परतूर तालुक्यातील उस्मानपूर, रायपूर, आंबा, डोलारा, कावजवळा, बामणी वलखेड, श्रीधर जवळा, नांद्रा, वाढोणा आदी गावांत अद्यापही बस सुरू नाही. अंबड तालुक्यातील गोंदी, साडेगाव, कोठाळा आदी गावांतील बस बंद आहेत.

जिल्ह्यातील काही गावांना अद्यापही बस सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने बस सुरू कराव्यात. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

- सागर शेंडगे, प्रवासी

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. आता सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बस सुरू कराव्यात.

-सूरज धबडकर, प्रवासी

५७ हजार कि.मी. प्रवास, पण फक्त शहरांचाच

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात १६० बस सुरू आहेत. या बसने जवळपास ५७ हजार कि.मी.चा प्रवास केला आहे; परंतु हा प्रवास फक्त शहरी भागासाठी झाला आहे. अद्यापही ग्रामीण भागात बस सुरू करण्यात आल्या नाहीत. शासनाने निर्बंध लादल्यामुळे अद्यापही अनेक बस बंद आहेत.

जिल्ह्यात २०० बस आहेत. त्यापैकी १६० बस सुरू आहेत. यातून दररोज १६ ते १७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. निर्बंध लादल्याने अनेक बस बंद झाल्या आहेत. ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही.

प्रदीप नेहूल, विभाग नियंत्रक, जालना