शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

पांढरे सोने झळाळले ! कापसाची यंदा विक्रमी ६० लाख क्विंटलची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 13:22 IST

कापूस उत्पादनात आघाडीवर असलेले विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

ठळक मुद्दे गेल्या हंगामात चार लाख २१ हजार क्विंटल एवढीच खरेदी तीच खरेदी यंदा सहा लाख क्विंटलवर पोहोचली. सुती धाग्याला मिळाला ऐतिहासिक भाव

- संजय देशमुख

जालना : राज्यात कापसाचे उत्पादन घेणाऱ्या १८ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ६० लाख क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाचा फटका बसला नसता तर कापसाचे बंपर उत्पादन झाले असते, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मागील वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत केवळ १८ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यातुलनेत यावर्षी अधिक खरेदी केली. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार आहे.

कापूस उत्पादनात आघाडीवर असलेले विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या हंगामात चार लाख २१ हजार क्विंटल एवढीच खरेदी झाली होती. तीच खरेदी यंदा सहा लाख क्विंटलवर पोहोचली. यंदा सीसीआयने राज्यात कापूस खरेदीसाठी ८८ खरेदी केंद्र सुरू केले होते. आजघडीला त्यांच्याकडे कापूस साठविण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने जास्तीत जास्त जिनिंग चालकांशी संपर्क करून त्यांच्याकडे सूत काढण्यासाठी तसेच कपाशीच्या गाठी तयार करण्यासाठी दिला जात आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला असता, शंभरपेक्षा अधिक खाजगी जिनिंग आहेत. त्यात काही ठिकाणी कापसापासून धागा निर्मितीदेखील केली जाते. सध्या सीसीआयकडून कापसाला हमीभाव म्हणून पाच हजार ७०० रुपयांचा दर प्रतिक्विंटलला मिळत असल्याने आजपर्यंत सरासरी या दराने ६० लाख कापूस खरेदीची किंमत ही तीन हजार कोटी रुपयांपर्यंत जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील आतापर्यंतची कापूस खरेदीगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची मोठी खरेदी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २ लाख ७२ हजार ५५५ क्विंटल (१२ लाख ४७ हजार १७८), जालना ६ लाख ६७ हजार ८७३ (४ लाख २६ हजार ७५७), परभणी ८ लाख ४३ हजार २९४ (१० लाख ६६ हजार ६६०), बीड ३ लाख ६४ हजार ९०५ (२ लाख १२ हजार ३६६), हिंगोली १ लाख ४४ हजार १८१ (५० हजार ३४२), नांदेड जिल्ह्यात २ लाख २४ हजार ७५६ (६ लाख ७० हजार ७६२) कापसाची खरेदी केली आहे. यात कंसातील आकडेवारी ही मागील वर्षीच्या खरेदीचे आहेत.

सुती धाग्याला मिळाला ऐतिहासिक भावकापसापासून धागानिर्मिती उद्योगाला यंदा कोरोनानंतर चांगले दिवस आले ओहत. कधी नव्हे, तो सुती धगा ३०० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. यंदा जिनिंग उद्योगाने कात टाकली असून, सीसीआयकडून सूतनिर्मिती आणि गठाण तयार करण्यासाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने हा उद्योग यंदा तेजीत आहे.- संजय राठी, संचालक काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेक्सप्रोसिल

टॅग्स :Jalanaजालनाcottonकापूसagricultureशेती